शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
4
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
5
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
6
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
7
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
8
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
9
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
10
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
11
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
12
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
13
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
14
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
15
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
16
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
17
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
18
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
19
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
20
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...

डायलिसिससाठी कोरोना तपासणीची अट तापदायक; उशीर जीवावर बेतण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 19:20 IST

या रुग्णांना तात्काळ तपासण्या करून मिळण्याची व्यवस्था गरजेची बनली आहे.  

ठळक मुद्देनव्या नियमांचा रुग्णांना मनस्ताप शासकीय योजनेचा लाभ मिळत नसल्याने अडचण 

औरंगाबाद : घाटीतील डायलिसिस सुविधा कोविड रुग्णांसाठी राखीव झाल्याने कोरोनाबाधित नसलेल्या रुग्णांना खाजगी रुग्णालयांत फेऱ्या माराव्या लागत आहेत, तर डायलिसिस करण्यापूर्वी कोरोना तपासणी गरजेची केलेली असल्याने रुग्णांच्या अडचणीत आणखी भर पडली. अतिजोखमीच्या रुग्णांच्या डायलिसिसमध्ये उशीर झाल्यास त्यांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याने या रुग्णांना तात्काळ तपासण्या करून मिळण्याची व्यवस्था गरजेची बनली आहे.  

१७ टक्के लोकांत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मूत्रपिंडाचे विकार आढळतात. भारतीय मूत्रपिंंडविकार माहिती संकलन केंद्राच्या आकडेवारीनुसार औरंगाबादेत १७०० लोकांना डायलिसिसची गरज आहे. त्यापैकी निम्मे रुग्ण डायलिसिस करतात. त्या तुलनेत शहरात केवळ १५ पेक्षा कमी तज्ज्ञ, तर तेवढेच डायलिसिस सेंटर आहेत. डायलिसिसचे हिमोडायलिसिस आणि पेरिटोनियल म्हणजे पोटातील डायलिसिस, असे दोन प्रकार आहेत. हिमोडायलिसिसमध्ये मशीनद्वारे रुग्णालयात रक्ताच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया होते, तर पोटातील डायलिसिसमध्ये पोटात विशिष्ट प्रकारची नळी टाकली जाते. त्यातून द्रव टाकून रक्त शुद्धीकरण केले जाते. ही प्रक्रिया रुग्ण घरीच करू शकतो. त्यामुळे शहरात पोहोचू न शकणाऱ्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते. मात्र, या खर्चिक उपचाराला शासकीय योजनेचा लाभ मिळत नसल्याने अडचण आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सहा युनिटची सुविधा लवकरचघाटीत सुपरस्पेशालिटी ब्लॉकमध्ये सहा यंत्रांचे इन्स्टॉलेशन झाले आहे. तेथील पाणी शुद्धी प्रकल्पाच्या पाण्याच्या दोन तपासण्या झाल्या. त्यात दोष आढळून आल्याने आता नव्याने पुन्हा निर्जंतुकीकरण करून तपासण्या करण्यात येतील, अशी माहिती उपअधिष्ठाता डॉ. सुधीर चौधरी यांनी दिली. सुपरस्पेशालिटी ब्लॉकमधील डायलिसिस युनिट लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ते सुरू होईलपर्यंत पर्यायी व्यवस्था धूत रुग्णालयात केलेली आहे, असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.

तपासणीस उशीर झाल्यास जिवावर बेतण्याची शक्यताडायलिसिसपूर्वी कोरोनाची तपासणी अनिवार्य केल्याने मनपा तपासणी केंद्रावरून तपासणी केल्यावर अहवालाची प्रत डायलिसिस केंद्रावर दिली, तेव्हा डायलिसिस झाले. सुरक्षिततेसाठी ते गरजेचे असले तरी खेड्यातून येणाऱ्या व गंभीर रुग्णांना तपासणीत अडचणी आल्यास होणारा उशीर जिवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तपासणी अनिवार्य केली तशी विनाआडकाठीची स्वतंत्र व्यवस्था तपासणीसाठी असली पाहिजे, असे डायलिसिसवर असलेल्या एका महिला रुग्णाने सांगितले.

रुग्णाने अगोदरच तपासण्या कराव्यात; त्याला पर्याय नाहीपुढचे डायलिसिस कधी आहे हे रुग्णांना माहीत असते. त्यापूर्वी दोन दिवस अगोदरच रुग्णांच्या आवश्यक तपासण्या करून घेतल्या पाहिजेत. आधीच जोखमीचे रुग्ण असताना त्यांना ताप आल्यास क्ष किरण, रक्त तपासण्या केल्या जातात. त्यात शंका आल्यास मात्र कोरोनाच्या तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवले जाते. तो अहवाल यायला किमान २४ तास लागतात. त्यामुळे आधीच तपासणी करून घेणे गरजेचे आहे. अहवाल येईपर्यंत डायलिसिसची गरज पडल्यास अडचणीचे होते. यात उशीर झाल्यास रुग्ण दगावण्याच्याही घटना घडल्या आहेत, त्यामुळे रुग्णांनी अगोदरच तयारी करावी. -डॉ. सुहास बाविकर, नेफ्रोलॉजिस्ट 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यAurangabadऔरंगाबाद