शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

कोरोनामुळे स्वत:चे वाहन घेण्यावर भर; दसरा-दिवाळीदरम्यान नवीन बाराशे वाहने येणार रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 15:41 IST

दसरा - दिवाळी आधीच शहरात वाहन खरेदीसाठी विविध कंपन्यांच्या अधिकृत वितरकांच्या शोरूमवर ग्राहकांची वर्दळ वाढली आहे.

ठळक मुद्देशहरात दसरा- दिवाळीदरम्यान सुमारे ९ हजार वाहने विक्री होतील, यात २०० कोटींची उलाढाल अपेक्षितसप्टेंबर महिन्यात शहरात सर्व कंपन्यांची दुचाकी, चारचाकी मिळून ५५००० वाहने विक्री झाली.

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळणे अत्यावश्यक झाले आहे. परिणामी, शहरवासी सार्वजनिक वाहनातून प्रवास करण्यापेक्षा स्वतःच्या हक्काच्या वाहनातून सुरक्षित प्रवास करण्यावर भर देत आहेत. यामुळेच वाहन खरेदीसाठी शोरूममध्ये वर्दळ वाढली आहे. दसरा- दिवाळीदरम्यान सुमारे ९ हजार वाहने विक्री होतील, यात २०० कोटींची उलाढाल होईल, असा होरा वितरक व्यक्त करीत आहेत. 

दसरा - दिवाळी आधीच शहरात वाहन खरेदीसाठी विविध कंपन्यांच्या अधिकृत वितरकांच्या शोरूमवर ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. कारण काही कंपन्यांच्या कार खरेदीसाठी कमीतकमी ५ आठवड्यांची वेटिंग आहे.  चेंबर ऑफ ऑथोराईज ऑटोमोबाईल डीलर्स संघटनेचे अध्यक्ष राहुल पगरिया यांनी सांगितले की, सप्टेंबर महिन्यात शहरात सर्व कंपन्यांची दुचाकी, चारचाकी मिळून ५५००० वाहने विक्री झाली. शोरूमवर होणारी बुकिंग लक्षात घेता दसरा-दिवाळीदरम्यान ९ हजार नवीन वाहने रस्त्यावर येतील. त्यात १२०० पेक्षा अधिक कारचा समावेश असेल. कार खरेदीत मागील दसरा-दिवाळीच्या तुलनेत १० टक्के वाढ दिसून येत आहे. 

शहरात विविध कंपन्यांच्या ४ लाख ते ७५ लाख  रुपयांपर्यंतच्या कार उपलब्ध आहेत. त्यात ५ लाख ते १० लाखांदरम्यानच्या कार विक्रीचे प्रमाण  ७० टक्के  राहील. तसेच शहरात ५० हजार ते १ लाख रुपयांदरम्यान दुचाकी आहेत. त्यापैकी  ५० हजार ते ७० हजारांदरम्यानच्या सुमारे  ७० टक्के दुचाकी विकल्या जाणार आहेत. ६५ टक्के ग्राहक वित्तसंस्थेकडून कर्ज घेतात. मायलेज जास्त, १२५ सीसीवरील वाहनांवर डिस्काऊंट, कमीत कमी डाऊनपेमेंट व बँकांनी कमी केलेला व्याजदर यामुळे वाहन खरेदीला प्रोत्साहन मिळत आहे. 

महिन्याकाठी ३ हजारांवर नोंदणी यंदा एप्रिल ते जुलै या ४ महिन्यांत केवळ ४ हजार ७९७ नव्या वाहनांची आरटीओ कार्यालयात नोंदणी झाली. ही ४ महिने म्हणजे कोरोनाच्या प्रादुर्भाव सुरू होऊन रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होण्याचा कालावधी होता. त्यामुळे वाहन विक्रीवर परिणाम झाला; परंतु जुलैपासून अनेक बाबी अनलॉक होत गेल्या. त्यामुळे वाहन खरेदीकडे नागरिकांचा कल वाढू लागला आहे. ऑगस्टपासून वाहन नोंदणीची स्थिती पूर्वीप्रमाणे होण्यास सुरुवात झाली आहे. एप्रिल ते जुलैच्या तुलनेत वाहन नोंदणीत ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये वाढ झाल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी सांगितले.

850 नवीन ट्रॅक्टर ग्रामीण भागात दिसतीलग्रामीण भागातून ट्रॅक्टरची मागणी वाढत आहे. सप्टेंबर महिन्यात ६६० ट्रॅक्टर विक्री झाले. यावरून याची प्रचीती येते. दसरा- दिवाळीदरम्यान नवीन  ८५० ट्रॅक्टर ग्रामीण भागात धावतील, असेही वितरकांनी सांगितले.

वर्ष २०१९ ची स्थितीएप्रिल ते जुलै या ४ महिन्यांत  तब्बल २४ हजार ४७६ नव्या वाहनांची नोंदणी झाली होती, तर ऑगस्टमध्ये ४ हजार ४९, सप्टेंबरमध्ये ३ हजार ९३३ आणि ऑक्टोबरमध्ये ६ हजार ५३१ वाहनांची नोंदणी झाली होती.

वर्ष २०२० ची स्थितीएप्रिल ते जुलै या ४ महिन्यांत सर्व प्रकारच्या केवळ ४ हजार ७९७ नव्या     वाहनांची नोंदणी झाली. ऑगस्टमध्ये ३ हजार ११९, सप्टेंबरमध्ये ३ हजार ८४२ वाहनांची नोंदणी झाली  आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याDiwaliदिवाळी 2022