शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

कचऱ्याच्या डीपीआरमध्ये सोयीनुसार बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 17:44 IST

शहरातील कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा म्हणून राज्य शासनाने तब्बल ९० कोटी रुपये महापालिकेला देण्याची घोषणा केली. त्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या संस्थेने डीपीआर (प्रकल्प अहवाल) तयार केला. या प्रकल्प अहवालात मनपा अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी सोयीनुसार पन्नास बदल केलेले आहेत.

ठळक मुद्दे ९० कोटी रुपयांच्या डीपीआरमध्ये तीन टप्पे ठरविण्यात आले आहेत. शासनाने १० कोटींचा निधीही मनपाला दिला आहे.

औरंगाबाद : शहरातील कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा म्हणून राज्य शासनाने तब्बल ९० कोटी रुपये महापालिकेला देण्याची घोषणा केली. त्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या संस्थेने डीपीआर (प्रकल्प अहवाल) तयार केला. या प्रकल्प अहवालात मनपा अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी सोयीनुसार पन्नास बदल केलेले आहेत. राज्य शासन, केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या निकषाबाहेर जाऊन आराखडा तयार करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नवनियुक्त आयुक्त डॉ. निपुण विनायक आता या प्रकरणात कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे. 

महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी आढावा बैठक घेतली. घनकचऱ्याचा अहवाल तयार करणाऱ्या पीएमसीने (प्रकल्प व्यवस्थापन समिती) सविस्तर अहवाल नमूद केला. पीएमसीच्या कामावर महापौरांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. ९० कोटी रुपयांच्या डीपीआरमध्ये तीन टप्पे ठरविण्यात आले आहेत. शासनाने १० कोटींचा निधीही मनपाला दिला आहे. मनपा प्रशासनाने २७ मशीन खरेदीसाठी निविदा प्रसिद्ध केली होती; परंतु दोन वेळा निविदा प्रसिद्ध होऊनही त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आता तिसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध केली आहे. 

केंद्रीय पद्धतीचे कचरा प्रकल्प उभारण्यासाठीही अद्याप निविदाच काढलेली नाही. वाहन खरेदीची निविदा प्रसिद्ध झालेली नाही. डीपीआरमध्ये ओला-सुका कचरा वेगवेगळा देण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी एक कोटीची तरतूद आहे. त्याचीही निविदा निघालेली नसल्याची माहिती बैठकीत समोर आली. घनकचरा व्यवस्थापन असो किंवा केंद्रीय पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया करणे; मनपाने सर्वच आघाड्यावर वाट लावून ठेवली आहे. आता नवनियुक्त आयुक्त याला कोणते वळण देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

शहरात तीन प्रकल्प घनकचरा व्यवस्थापनाच्या डीपीआरनुसार ३०० मेट्रिक टन क्षमतेचा गॅसनिर्मिती प्रकल्प चिकलठाणा येथे उभारण्यात येणार होता; परंतु आता त्यात बदल करण्यात आला असून, दीडशे-दीडशे टन क्षमतेचे तीन प्रकल्प तेही खतनिर्मितीचे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हर्सूल, पडेगाव आणि चिकलठाणा येथे हे प्रकल्प उभारण्यात येतील. कांचनवाडी येथे ३० मेट्रिक टन क्षमतेचा गॅसनिर्मिती प्रकल्प उभारला जाणार आहे. 

नऊ जागा अखेर निश्चितपडेगाव, मध्यवर्ती जकात नाका, फरशी मैदान एन-७, कलाग्रामच्या बाजूला, विठ्ठलनगर, देशमुखनगर, कांचनवाडी आणि रमानगर येथे कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या २७ मशीन बसविण्यात येणार असल्याचे महापौर घोडेले यांनी सांगितले. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्नMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद