शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

महावितरणचा नियंत्रण कक्ष आजपासून चोवीस तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 13:32 IST

पावसाळ्यात वीज ग्राहकांच्या तक्रारींचे तात्काळ निरसन करण्यासाठी महावितरण कंपनीने स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय

ठळक मुद्देया नियंत्रण कक्षात २४ तास कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. सदरचे नियंत्रण कक्ष हे मिलकॉर्नर येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयात असेल. 

औरंगाबाद : पहिल्याच पावसाने महावितरण कंपनीची झोप उडविली. अनेक फीडर बंद पडले, अनेक ठिकाणी ताराही तुटल्या. महावितरणचे अभियंते- कर्मचारी दुरुस्तीसाठी धावले. अशा वेळी उपकेंद्रांमध्ये कोणीच नाही, असा गैरसमज नागरिकांचा झाला. या पार्श्वभूमीवर आजपासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला जाणार असून, तो चोवीस तास कार्यरत असेल.

यासंदर्भात मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले की, पावसाळ्यात वीज ग्राहकांच्या तक्रारींचे तात्काळ निरसन करण्यासाठी महावितरण कंपनीने स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियंत्रण कक्षात २४ तास कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. सदरचे नियंत्रण कक्ष हे मिलकॉर्नर येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयात असेल. 

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने शहराला झोडपले. महावितरण कंपनीचे अनेक फीडर बंद पडले, तर कुठे झाडाच्या फांद्या पडून तारा तुटल्या. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी अनेक कर्मचारी, अधिकारी घटनास्थळी धावले. मात्र, दरम्यानच्या काळात नियंत्रण कक्षात कोणीच नव्हते. अशा वेळी ग्राहकांनी सदरच्या संबंधित उपकेंद्रांमध्ये फोन केले. 

त्यावेळी अनेकदा फोन उचलण्यात आले नाहीत. शनिवारी पावसामुळे अनेक ठिकाणच्या तुटलेल्या विजेच्या तारा, इन्सुलेटर, कंडक्टर दुरुस्तीच्या कामाला कर्मचारी- अभियंते तिकडे गेले होते. ग्राहकांचा गैरसमज होऊ नये व तक्रारींचे तात्काळ निवारण व्हावे, यासाठी उद्यापासून सुरू करण्यात येणारा नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरू ठेवला जाणार आहे. यासंदर्भात रविवारी दुपारी महावितरणच्या मुख्यालयात मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

टॅग्स :mahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबादRainपाऊस