शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

महावितरणचा नियंत्रण कक्ष आजपासून चोवीस तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 13:32 IST

पावसाळ्यात वीज ग्राहकांच्या तक्रारींचे तात्काळ निरसन करण्यासाठी महावितरण कंपनीने स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय

ठळक मुद्देया नियंत्रण कक्षात २४ तास कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. सदरचे नियंत्रण कक्ष हे मिलकॉर्नर येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयात असेल. 

औरंगाबाद : पहिल्याच पावसाने महावितरण कंपनीची झोप उडविली. अनेक फीडर बंद पडले, अनेक ठिकाणी ताराही तुटल्या. महावितरणचे अभियंते- कर्मचारी दुरुस्तीसाठी धावले. अशा वेळी उपकेंद्रांमध्ये कोणीच नाही, असा गैरसमज नागरिकांचा झाला. या पार्श्वभूमीवर आजपासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला जाणार असून, तो चोवीस तास कार्यरत असेल.

यासंदर्भात मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले की, पावसाळ्यात वीज ग्राहकांच्या तक्रारींचे तात्काळ निरसन करण्यासाठी महावितरण कंपनीने स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियंत्रण कक्षात २४ तास कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. सदरचे नियंत्रण कक्ष हे मिलकॉर्नर येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयात असेल. 

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने शहराला झोडपले. महावितरण कंपनीचे अनेक फीडर बंद पडले, तर कुठे झाडाच्या फांद्या पडून तारा तुटल्या. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी अनेक कर्मचारी, अधिकारी घटनास्थळी धावले. मात्र, दरम्यानच्या काळात नियंत्रण कक्षात कोणीच नव्हते. अशा वेळी ग्राहकांनी सदरच्या संबंधित उपकेंद्रांमध्ये फोन केले. 

त्यावेळी अनेकदा फोन उचलण्यात आले नाहीत. शनिवारी पावसामुळे अनेक ठिकाणच्या तुटलेल्या विजेच्या तारा, इन्सुलेटर, कंडक्टर दुरुस्तीच्या कामाला कर्मचारी- अभियंते तिकडे गेले होते. ग्राहकांचा गैरसमज होऊ नये व तक्रारींचे तात्काळ निवारण व्हावे, यासाठी उद्यापासून सुरू करण्यात येणारा नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरू ठेवला जाणार आहे. यासंदर्भात रविवारी दुपारी महावितरणच्या मुख्यालयात मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

टॅग्स :mahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबादRainपाऊस