शहरं
Join us  
Trending Stories
1
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
2
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
3
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
4
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
5
आधी कारने धडक, मग १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; गुरुग्राममध्ये डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला!
6
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
7
प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
8
डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?
9
"विश्वास ठेवा, दुसरा कुठलाही हेतू नाही" माओवाद्यांनी आत्मसमर्पणासाठी मागितली १५ फेब्रुवारीपर्यंतची वेळ
10
IND vs SA: टीम इंडियाच्या फलंदाजांची घसरगुंडी, दुसरीकडे करूण नायरची सूचक पोस्ट, म्हणाला...
11
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
12
'३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बांधायचेच राहिले...'; बिझनेसमन धर्मेंद्रची शेवटची इच्छा होती...
13
महिंद्रा-टाटासह 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले! बाजारात अचानक का वाढला विक्रीचा दबाव?
14
दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला; अफगाणिस्तानातून आलेल्या विमानाची चुकीच्या रनवेवर लँडिंग
15
IND vs SA 2nd Test Day 3 Stumps : बावुमानं टीम इंडियाला फॉलोऑन देणं टाळलं; कारण...
16
नगरपरिषद निवडणूक होण्यापूर्वीच भाजपाच्या १०० सदस्यांची बिनविरोध निवड; विरोधकांचा हल्लाबोल
17
शर्टच्या आतून लावला बॉम्ब, गेटजवळ पोहचताच दाबले डेटोनेटर, पाकिस्तानातील आत्मघाती हल्ल्याचा फोटो
18
सावधान! सरकार नवीन काहीतरी आणते, लोक फसतात; आता 'SIR फॉर्म' स्कॅमचे जाळे टाकू लागले सायबर भामटे
19
डॉक्टर, सुशिक्षित तरुणांना पाकिस्तानी 'आका'ने दिली ट्रेनिंग; लाल किल्ला स्फोटातील आरोपींचे जैश-ए-मोहम्मदशी थेट कनेक्शन!
20
“मेट्रोसारखी सुंदर लोकल ट्रेन मुंबईकरांना देणार, लवकरच कायापालट”; CM फडणवीसांचे आश्वासन
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदारांनी आणले ‘विघ्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 00:10 IST

महापालिकेच्या लेखा विभागाने मागील सहा महिन्यांपासून एकाही कंत्राटदाराला बिल दिले नाही. शासन अनुदानावर पगार करणे आणि महिनाभर शांत बसणे एवढेच काम या विभागाने सुरू केले आहे. लेखा विभागाच्या या कारभाराला कंटाळलेल्या कंत्राटदारांनी शनिवारी सकाळी मुख्य लेखाधिकारी सु.गं. केंद्रे यांना घेराव घातला. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना कामे थांबविण्यात येत असल्याचे पत्रही देण्यात आले. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात मनपा प्रशासन संकटात सापडली आहे.

ठळक मुद्देकामबंद : ऐन गणेशोत्सवात औरंगाबाद मनपा प्रशासन संकटात; सहा महिन्यांपासून बिले नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेच्या लेखा विभागाने मागील सहा महिन्यांपासून एकाही कंत्राटदाराला बिल दिले नाही. शासन अनुदानावर पगार करणे आणि महिनाभर शांत बसणे एवढेच काम या विभागाने सुरू केले आहे. लेखा विभागाच्या या कारभाराला कंटाळलेल्या कंत्राटदारांनी शनिवारी सकाळी मुख्य लेखाधिकारी सु.गं. केंद्रे यांना घेराव घातला. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना कामे थांबविण्यात येत असल्याचे पत्रही देण्यात आले. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात मनपा प्रशासन संकटात सापडली आहे.लेखा विभागाकडे ११५ कोटी रुपयांची बिले सध्या थकली आहेत. वेगवेगळ्या विभागांमध्ये आणखी ५५ ते ६० कोटींची बिले थकली आहेत. लवकरच ही बिलेही लेखा विभागात येऊन धडकणार आहेत. थकबाकीचा आकडा दीडशे कोटींपर्यंत जाईल. विकास कामांची बिले देण्याचे कोणतेच नियोजन प्रशासन, लेखा विभागाने केलेले नाही. ज्येष्ठता यादीनुसार बिले देण्यात येणार असल्याचे वारंवार कंत्राटदारांना सांगण्यात येत आहे. मनपा खरोखरच ज्येष्ठता यादीनुसार बिले देणार असेल, तर ज्यांची बिले दीड ते दोन वर्षांपासून थकीत आहेत, त्यांना आजपर्यंत पैसे का मिळाले नाहीत, याचे उत्तर प्रशासनाकडे नाही. विकासकामे करण्यासाठी कंत्राटदारांनी खिशातील पैसा लावला आहे. आता जेव्हा पैसे देण्याची वेळ आल्यावर प्रशासन हात वर करीत आहे. त्यामुळे शनिवारी कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष बंडू कांबळे व इतर सदस्यांनी मुख्य लेखाधिकारी केंद्रे यांना घेराव घातला. केंद्रे यांनी मंगळवारी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.अत्यावश्यक सेवांची कामे बंदपथदिवे, पाणीपुरवठा ही अत्यावश्यक सेवा आहे. या दोन्ही सेवांशी निगडित कंत्राटदारांनी बंडाचा झेंडा रोवला. शनिवारी विद्युत, पाणीपुरवठा विभागातील कंत्राटदारांनी कामे बंद करण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत थकबाकी मिळणार नाही, तोपर्यंत नवीन कामे करणार नाही, अशी भूमिका कंत्राटदारांनी घेतली आहे. शनिवारी सायंकाळी संस्थान गणपती येथे काही लाईट लावायचे होते. कंत्राटदारांनी कामे करण्यास नकार दिला. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात प्रशासन अधिक संकटात सापडले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMuncipal Corporationनगर पालिका