शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

कंत्राटदारांनी आणले ‘विघ्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 00:10 IST

महापालिकेच्या लेखा विभागाने मागील सहा महिन्यांपासून एकाही कंत्राटदाराला बिल दिले नाही. शासन अनुदानावर पगार करणे आणि महिनाभर शांत बसणे एवढेच काम या विभागाने सुरू केले आहे. लेखा विभागाच्या या कारभाराला कंटाळलेल्या कंत्राटदारांनी शनिवारी सकाळी मुख्य लेखाधिकारी सु.गं. केंद्रे यांना घेराव घातला. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना कामे थांबविण्यात येत असल्याचे पत्रही देण्यात आले. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात मनपा प्रशासन संकटात सापडली आहे.

ठळक मुद्देकामबंद : ऐन गणेशोत्सवात औरंगाबाद मनपा प्रशासन संकटात; सहा महिन्यांपासून बिले नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेच्या लेखा विभागाने मागील सहा महिन्यांपासून एकाही कंत्राटदाराला बिल दिले नाही. शासन अनुदानावर पगार करणे आणि महिनाभर शांत बसणे एवढेच काम या विभागाने सुरू केले आहे. लेखा विभागाच्या या कारभाराला कंटाळलेल्या कंत्राटदारांनी शनिवारी सकाळी मुख्य लेखाधिकारी सु.गं. केंद्रे यांना घेराव घातला. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना कामे थांबविण्यात येत असल्याचे पत्रही देण्यात आले. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात मनपा प्रशासन संकटात सापडली आहे.लेखा विभागाकडे ११५ कोटी रुपयांची बिले सध्या थकली आहेत. वेगवेगळ्या विभागांमध्ये आणखी ५५ ते ६० कोटींची बिले थकली आहेत. लवकरच ही बिलेही लेखा विभागात येऊन धडकणार आहेत. थकबाकीचा आकडा दीडशे कोटींपर्यंत जाईल. विकास कामांची बिले देण्याचे कोणतेच नियोजन प्रशासन, लेखा विभागाने केलेले नाही. ज्येष्ठता यादीनुसार बिले देण्यात येणार असल्याचे वारंवार कंत्राटदारांना सांगण्यात येत आहे. मनपा खरोखरच ज्येष्ठता यादीनुसार बिले देणार असेल, तर ज्यांची बिले दीड ते दोन वर्षांपासून थकीत आहेत, त्यांना आजपर्यंत पैसे का मिळाले नाहीत, याचे उत्तर प्रशासनाकडे नाही. विकासकामे करण्यासाठी कंत्राटदारांनी खिशातील पैसा लावला आहे. आता जेव्हा पैसे देण्याची वेळ आल्यावर प्रशासन हात वर करीत आहे. त्यामुळे शनिवारी कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष बंडू कांबळे व इतर सदस्यांनी मुख्य लेखाधिकारी केंद्रे यांना घेराव घातला. केंद्रे यांनी मंगळवारी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.अत्यावश्यक सेवांची कामे बंदपथदिवे, पाणीपुरवठा ही अत्यावश्यक सेवा आहे. या दोन्ही सेवांशी निगडित कंत्राटदारांनी बंडाचा झेंडा रोवला. शनिवारी विद्युत, पाणीपुरवठा विभागातील कंत्राटदारांनी कामे बंद करण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत थकबाकी मिळणार नाही, तोपर्यंत नवीन कामे करणार नाही, अशी भूमिका कंत्राटदारांनी घेतली आहे. शनिवारी सायंकाळी संस्थान गणपती येथे काही लाईट लावायचे होते. कंत्राटदारांनी कामे करण्यास नकार दिला. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात प्रशासन अधिक संकटात सापडले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMuncipal Corporationनगर पालिका