शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

कंत्राटदारांनी आणले ‘विघ्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 00:10 IST

महापालिकेच्या लेखा विभागाने मागील सहा महिन्यांपासून एकाही कंत्राटदाराला बिल दिले नाही. शासन अनुदानावर पगार करणे आणि महिनाभर शांत बसणे एवढेच काम या विभागाने सुरू केले आहे. लेखा विभागाच्या या कारभाराला कंटाळलेल्या कंत्राटदारांनी शनिवारी सकाळी मुख्य लेखाधिकारी सु.गं. केंद्रे यांना घेराव घातला. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना कामे थांबविण्यात येत असल्याचे पत्रही देण्यात आले. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात मनपा प्रशासन संकटात सापडली आहे.

ठळक मुद्देकामबंद : ऐन गणेशोत्सवात औरंगाबाद मनपा प्रशासन संकटात; सहा महिन्यांपासून बिले नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेच्या लेखा विभागाने मागील सहा महिन्यांपासून एकाही कंत्राटदाराला बिल दिले नाही. शासन अनुदानावर पगार करणे आणि महिनाभर शांत बसणे एवढेच काम या विभागाने सुरू केले आहे. लेखा विभागाच्या या कारभाराला कंटाळलेल्या कंत्राटदारांनी शनिवारी सकाळी मुख्य लेखाधिकारी सु.गं. केंद्रे यांना घेराव घातला. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना कामे थांबविण्यात येत असल्याचे पत्रही देण्यात आले. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात मनपा प्रशासन संकटात सापडली आहे.लेखा विभागाकडे ११५ कोटी रुपयांची बिले सध्या थकली आहेत. वेगवेगळ्या विभागांमध्ये आणखी ५५ ते ६० कोटींची बिले थकली आहेत. लवकरच ही बिलेही लेखा विभागात येऊन धडकणार आहेत. थकबाकीचा आकडा दीडशे कोटींपर्यंत जाईल. विकास कामांची बिले देण्याचे कोणतेच नियोजन प्रशासन, लेखा विभागाने केलेले नाही. ज्येष्ठता यादीनुसार बिले देण्यात येणार असल्याचे वारंवार कंत्राटदारांना सांगण्यात येत आहे. मनपा खरोखरच ज्येष्ठता यादीनुसार बिले देणार असेल, तर ज्यांची बिले दीड ते दोन वर्षांपासून थकीत आहेत, त्यांना आजपर्यंत पैसे का मिळाले नाहीत, याचे उत्तर प्रशासनाकडे नाही. विकासकामे करण्यासाठी कंत्राटदारांनी खिशातील पैसा लावला आहे. आता जेव्हा पैसे देण्याची वेळ आल्यावर प्रशासन हात वर करीत आहे. त्यामुळे शनिवारी कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष बंडू कांबळे व इतर सदस्यांनी मुख्य लेखाधिकारी केंद्रे यांना घेराव घातला. केंद्रे यांनी मंगळवारी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.अत्यावश्यक सेवांची कामे बंदपथदिवे, पाणीपुरवठा ही अत्यावश्यक सेवा आहे. या दोन्ही सेवांशी निगडित कंत्राटदारांनी बंडाचा झेंडा रोवला. शनिवारी विद्युत, पाणीपुरवठा विभागातील कंत्राटदारांनी कामे बंद करण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत थकबाकी मिळणार नाही, तोपर्यंत नवीन कामे करणार नाही, अशी भूमिका कंत्राटदारांनी घेतली आहे. शनिवारी सायंकाळी संस्थान गणपती येथे काही लाईट लावायचे होते. कंत्राटदारांनी कामे करण्यास नकार दिला. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात प्रशासन अधिक संकटात सापडले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMuncipal Corporationनगर पालिका