शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कंत्राटदाराने वर्गीकरण केलेला कचरा घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 23:28 IST

बंगळुरू येथील कंपनीने वर्गीकरण केलेलाच कचरा घ्यावा, सक्तीने याची सवय लावा, असे आदेश मंगळवारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले.

औरंगाबाद : शहरात कचऱ्याचे वर्गीकरण अजिबात होत नाही. मिक्स कचरा जमा करण्याचे प्रमाण तब्बल ८० टक्के आहे. बंगळुरू येथील कंपनीने वर्गीकरण केलेलाच कचरा घ्यावा, सक्तीने याची सवय लावा, असे आदेश मंगळवारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले. शहरात कॅरिबॅग बंदीची अंमलबजावणी आणखी प्रभावीपणे करावी, असेही त्यांनी नमूद केले.

शहरातील कचराकोंडी फोडण्यासाठी शासनाने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समिती स्थापन केली आहे. सुनील केंद्रेकर यांनी मंगळवारी समितीची बैठक घेतली.

कचरा प्रक्रिया केंद्राची उभारणी, वर्गीकरण आदींचा अत्यंत बारकाईने त्यांनी आढावा घेतला. बैठकीला जिल्हाधिकारी उदय चौधरी, संनियंत्रण समितीचे सचिव तथा मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक उपस्थित होते.

बैठकीनंतर मनपा आयुक्तांनी सांगितले की, विभागीय आयुक्तांनी संपूर्ण कामाचा आढावा घेतला. वर्गीकरण केलेला कचराच कंत्राटदाराने स्वीकारला पाहीजे, तशी त्याला सक्ती करा, असे आदेश दिले. कचरा प्रक्रिया केंद्राची उभारणी कुठपर्यंत आली याची माहिती घेतली. चिकलठाणा येथील प्रक्रिया केंद्रात सुरू असलेल्या कामाबद्दलही त्यांनी माहिती घेतली.

हर्सूल येथील प्रकल्पाला अद्याप स्थायी समितीने मान्यता दिली नाही हेदेखील विभागीय आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यानंतर त्यांनी स्थायी समितीच्या सभापती जयश्री कुलकर्णी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. चिकलठाणा येथील प्रक्रिया केंद्राच्या कामासाठी २६ कोटी रुपये खर्च झाला. शासनाने ९१ कोटींचा डीपीआर मंजूर केला असला तरी महापालिकेला २६ कोटी ५० लाख रुपयेच मिळाले होते. हा निधी दोन महिन्यांपूर्वीच संपला आहे.

नवीन कामांसाठी मनपाकडे निधी नाही. शासनाकडून उर्वरित निधी आला नाही. कांचनवाडी येथे कचºयापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पाच्या कंत्राटदाराला ५ कोटी रुपये द्यायचे आहेत, ही बाबदेखील विभागीय आयुक्तांच्या लक्षात आणून दिली, असे डॉ. निपुण विनायक यांनी सांगितले. कॅरिबॅग बंदीवर विशेष लक्ष द्या, अशी सूचना विभागीय आयुक्तांनी केली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद