शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

गटई कामगारांचे साहित्य धूळ खात

By admin | Updated: February 8, 2015 00:09 IST

जिल्ह्यातील गटई कामगारांसाठी सामाजिक व न्याय विभाग आणि संत रविदास महामंडळातर्फे ढोर, मोची चर्मकार आदी समाजातील व्यक्तींना देण्यात येणारे पत्र्याचे

गजानन वानखडे , जालनाजिल्ह्यातील गटई कामगारांसाठी सामाजिक व न्याय विभाग आणि संत रविदास महामंडळातर्फे ढोर, मोची चर्मकार आदी समाजातील व्यक्तींना देण्यात येणारे पत्र्याचे स्टॉल धूळ खात पडून असल्याने अनेक लाभार्थी या पासून वंचित आहेत.या समाजातील अनेक व्यक्ती चमड्यापासून पादत्राणे तयार व दुरूस्ती करण्याचे कामे करतात. रस्त्यांच्या कडेला बसून ऊन, पावसात आपला उदरनिर्वाह चालवतात.त्यांना ऊन, वारा, पावसापासून सरंक्षण मिळावे आणि त्यांचे साहित्यही सुरक्षित राहावे, समाजाची उन्नती व्हावी या उद्देशाने सामाजिक न्याय विभागाच्या वतीने १०० टक्के शासकीय अनुदानावर महापालिका, नगरपालिका, छावणी क्षेत्र, ग्रामपंचायत क्षेत्रात स्टॉल देण्याची शासनाची योजना आहे. परंतु २०११ -१२ यावर्षातल्या ६० लाभार्थी, आणि२०१३ -१४ चे २३० लाभार्थीं अशा २९० लाभार्थ्यांना पत्र्याचे टॉल मिळाले नाहीत. सन २००८ -९ या वर्षात शासनाकडून जिल्हातील ४१२ लाभार्थ्यांसाठी आलेल्या ४१२ स्टॉलपैकी अद्यापही ४१ स्टॉल वाटपाविना सामाजिक न्याय विभागाच्या गोदामात धुळखात पडून आहेत.या साहित्याचे संबंधित लाभार्थ्यांना तातडीने वितरण व्हावे, अशी मागणी प्रशासनाकडे केली जात आहे. सन २०१२ - १३ व २०१३ -१४ या वर्षाच्या लाभार्थ्यांना टपरी स्टॉल मिळावे यासाठी आपल्या कार्यालयाने वारंवार शासनाकडे, तसेच संत रोहिदास महामंडळाकडे पत्रव्यववहार केला. त्यासाठी काही वेळा मी स्वत: मुंबईला जाऊन प्रलंबित कामासाठी चकरा मारल्या. पंरतु अद्यापही या वर्षाचे साहित्य मिळाले नाही. लाभार्थी यापासून वंचित आहेत. २०१२ -१३ वर्षाचे १२२ लाभार्थ्यांसाठी १२२ टपरी स्टॉल ३० जानेवारी रोजी सामाजिक न्याय विभागाला प्राप्त झाले आहेत. त्यासाठी लाभार्थ्यांच्या याद्यांचे काम सुरू आहे. तात्काळ लाभार्थ्यांना साहित्य मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहे. कामपूर्ण होताच लाभार्थ्यांना तात्काळ स्टॉलचे वाटप करण्यात येईल.बी.एन.वीर, सहाय्यक समाजकल्याण आयुक्त, जालना