शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

मनपाकडून बांधकाम परवानगी बंद; ३000 कोटींचे व्यवसाय होणार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 01:18 IST

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व बांधकामांची परवानगी स्थगित केल्यानंतर औरंगाबाद महापालिकेने त्याची अंमलबजावणी म्हणून सर्व प्रकारच्या बांधकाम परवानगी देणे बंद केल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व बांधकामांची परवानगी स्थगित केल्यानंतर औरंगाबाद महापालिकेने त्याची अंमलबजावणी म्हणून सर्व प्रकारच्या बांधकाम परवानगी देणे बंद केल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनीसोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. महापालिकेच्या या निर्णयामुळे शहरातील बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून बांधकाम व्यवसायासह त्यावर अवलंबून असलेल्या इतर व्यवसायांची मिळून सुमारे तीन हजार कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होण्याची भीती व्यक्त होत आहे.दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकारकडून आपली बाजू न्यायालयात मांडण्यात येणार आहे. असे असताना औरंगाबाद महापालिकेने आपल्या स्तरावर निर्णय कसा काय घेतला याचीही चर्चा शहरात चालू आहे.महापालिकेने सोमवारपासून बांधकाम परवानगी देणे बंद केले आहे. बांधकाम परवानगीसाठी नागरिक आणि बांधकाम व्यावसायिकांकडून नवीन प्रस्ताव दाखल करून घेण्यात येतील. सर्व सोपस्कर पूर्ण करून सर्व फायली मंजूरही करून ठेवण्यात येतील. मात्र या फायलींना अंतिम मंजुरी मिळणार नाही, असा निर्णय महापालिकेने घेतला आहे.महाराष्टÑ, मध्यप्रदेश, उत्तराखंड आदी राज्यांमध्ये घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात राज्य शासनांनी कोणतेच धोरण ठरविले नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने संबंधित राज्यांच्या सरकारला दंड ठोठावत तेथील सर्व बांधकामे त्वरित बंद करण्याचे आदेश शुक्रवारी दिले. या आदेशामुळे महाराष्टÑातील रिअल इस्टेट उद्योगात एकच खळबळ उडाली. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादेतही दरवर्षी शेकडो गृहप्रकल्प उभे राहतात. नोटाबंदी, जीएसटीनंतर बांधकाम - उद्योग क्षेत्र आता नवीन भरारी घेत असतानाच सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येऊन धडकला. काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय ?घनकचरा व्यवस्थापनाचे योग्य धोरण तयार केले जात नाही, तोपर्यंत महाराष्टÑासह काही राज्यांमध्ये नवीन बांधकामांवर बंदीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ३१ आॅगस्ट २०१८ रोजी दिला आहे. न्या. मदन बी. लोकूर आणि न्या. एस. अब्दुल नझीर यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे.काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी अद्यापही घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार घनकचरा व्यवस्थापनाचे योग्य धोरण तयार केले नाही, ही दुर्दैवी बाब आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे. जनहिताचा विचार करून राज्यांनी घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार घनकचरा व्यवस्थापनाचे योग्य धोरण तयार करावे.दोन वर्षांनंतरही घनकचरा व्यवस्थापनाचे धोरण तयार न करणे ही बाब दुर्दैवी (पॅथेटिक) आहे. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांनी घनकचरा व्यवस्थापनाचे योग्य धोरण तयार करेपर्यंत नवीन बांधकामांवर बंदी राहील, असे सर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. या संदर्भात आता ९ आॅक्टोबर २०१८ रोजी पुढील सुनावणी होणार आहे.आयुक्तांची सही आज होणारसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारपासून बांधकाम परवानग्या देण्याचे काम थांबविले आहे. यासंदर्भातील आदेशावर सोमवारी आयुक्तांची सही होऊ शकली नाही. उद्या आयुक्त डॉ. निपुण विनायक यांची सही झाल्यावर आदेश काढण्यात येणार आहेत, असे प्रभारी नगररचना सहसंचालक सुमित खरवडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.क्रेडाईने चालू बांधकामे थांबविलीसर्वोच्च न्यायालयाचा कुठेच अवमान होऊ नये म्हणून क्रेडाई या बांधकाम व्यावसायिक संघटनेने सर्व सदस्यांना चालू बांधकामेही थांबविण्याचे आदेश दिले. क्रेडाईचे शहरात १५० सदस्य आहेत. प्रत्येक सदस्याचा किमान एक तरी लहान-मोठा गृहप्रकल्प सुरूच आहे. दिवाळीत ग्राहकांना फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. या निर्णयामुळे अंतिम टप्प्यात पोहोचलेले प्रकल्पही रखडले आहेत. क्रेडाईचे सदस्य नसलेले शहरात लहान-मोठे मिळून ३०० पेक्षा अधिक बांधकाम व्यावसायिक आहेत. बंद कामांमुळे किमान ३ हजार कोटींची उलाढाल ठप्प होणार आहे.-रवी वट्टमवार, अध्यक्ष, क्रेडाई, औरंगाबाद.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका