शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

मनपाकडून बांधकाम परवानगी बंद; ३000 कोटींचे व्यवसाय होणार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 01:18 IST

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व बांधकामांची परवानगी स्थगित केल्यानंतर औरंगाबाद महापालिकेने त्याची अंमलबजावणी म्हणून सर्व प्रकारच्या बांधकाम परवानगी देणे बंद केल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व बांधकामांची परवानगी स्थगित केल्यानंतर औरंगाबाद महापालिकेने त्याची अंमलबजावणी म्हणून सर्व प्रकारच्या बांधकाम परवानगी देणे बंद केल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनीसोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. महापालिकेच्या या निर्णयामुळे शहरातील बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून बांधकाम व्यवसायासह त्यावर अवलंबून असलेल्या इतर व्यवसायांची मिळून सुमारे तीन हजार कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होण्याची भीती व्यक्त होत आहे.दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकारकडून आपली बाजू न्यायालयात मांडण्यात येणार आहे. असे असताना औरंगाबाद महापालिकेने आपल्या स्तरावर निर्णय कसा काय घेतला याचीही चर्चा शहरात चालू आहे.महापालिकेने सोमवारपासून बांधकाम परवानगी देणे बंद केले आहे. बांधकाम परवानगीसाठी नागरिक आणि बांधकाम व्यावसायिकांकडून नवीन प्रस्ताव दाखल करून घेण्यात येतील. सर्व सोपस्कर पूर्ण करून सर्व फायली मंजूरही करून ठेवण्यात येतील. मात्र या फायलींना अंतिम मंजुरी मिळणार नाही, असा निर्णय महापालिकेने घेतला आहे.महाराष्टÑ, मध्यप्रदेश, उत्तराखंड आदी राज्यांमध्ये घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात राज्य शासनांनी कोणतेच धोरण ठरविले नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने संबंधित राज्यांच्या सरकारला दंड ठोठावत तेथील सर्व बांधकामे त्वरित बंद करण्याचे आदेश शुक्रवारी दिले. या आदेशामुळे महाराष्टÑातील रिअल इस्टेट उद्योगात एकच खळबळ उडाली. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादेतही दरवर्षी शेकडो गृहप्रकल्प उभे राहतात. नोटाबंदी, जीएसटीनंतर बांधकाम - उद्योग क्षेत्र आता नवीन भरारी घेत असतानाच सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येऊन धडकला. काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय ?घनकचरा व्यवस्थापनाचे योग्य धोरण तयार केले जात नाही, तोपर्यंत महाराष्टÑासह काही राज्यांमध्ये नवीन बांधकामांवर बंदीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ३१ आॅगस्ट २०१८ रोजी दिला आहे. न्या. मदन बी. लोकूर आणि न्या. एस. अब्दुल नझीर यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे.काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी अद्यापही घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार घनकचरा व्यवस्थापनाचे योग्य धोरण तयार केले नाही, ही दुर्दैवी बाब आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे. जनहिताचा विचार करून राज्यांनी घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार घनकचरा व्यवस्थापनाचे योग्य धोरण तयार करावे.दोन वर्षांनंतरही घनकचरा व्यवस्थापनाचे धोरण तयार न करणे ही बाब दुर्दैवी (पॅथेटिक) आहे. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांनी घनकचरा व्यवस्थापनाचे योग्य धोरण तयार करेपर्यंत नवीन बांधकामांवर बंदी राहील, असे सर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. या संदर्भात आता ९ आॅक्टोबर २०१८ रोजी पुढील सुनावणी होणार आहे.आयुक्तांची सही आज होणारसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारपासून बांधकाम परवानग्या देण्याचे काम थांबविले आहे. यासंदर्भातील आदेशावर सोमवारी आयुक्तांची सही होऊ शकली नाही. उद्या आयुक्त डॉ. निपुण विनायक यांची सही झाल्यावर आदेश काढण्यात येणार आहेत, असे प्रभारी नगररचना सहसंचालक सुमित खरवडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.क्रेडाईने चालू बांधकामे थांबविलीसर्वोच्च न्यायालयाचा कुठेच अवमान होऊ नये म्हणून क्रेडाई या बांधकाम व्यावसायिक संघटनेने सर्व सदस्यांना चालू बांधकामेही थांबविण्याचे आदेश दिले. क्रेडाईचे शहरात १५० सदस्य आहेत. प्रत्येक सदस्याचा किमान एक तरी लहान-मोठा गृहप्रकल्प सुरूच आहे. दिवाळीत ग्राहकांना फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. या निर्णयामुळे अंतिम टप्प्यात पोहोचलेले प्रकल्पही रखडले आहेत. क्रेडाईचे सदस्य नसलेले शहरात लहान-मोठे मिळून ३०० पेक्षा अधिक बांधकाम व्यावसायिक आहेत. बंद कामांमुळे किमान ३ हजार कोटींची उलाढाल ठप्प होणार आहे.-रवी वट्टमवार, अध्यक्ष, क्रेडाई, औरंगाबाद.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका