शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

‘वंदे भारत’ रेल्वेची निर्मिती लातूरमध्ये: अश्विनी वैष्णव; ‘गती शक्ती’ने मराठवाडा जोडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 10:20 IST

लातूर येथील रेल्वेच्या कारखान्यात जागतिक पातळीवरील सुसज्ज अशी ‘वंदे भारत’ रेल्वेची निर्मिती होईल.

लोकमत न्यूज नेटवर्क

औरंगाबाद: लातूर येथील रेल्वेच्या कारखान्यात जागतिक पातळीवरील सुसज्ज अशी ‘वंदे भारत’ रेल्वेची निर्मिती होईल. त्यासाठी निविदा प्रक्रिया झाली असून नोव्हेंबरपासून  निर्मिती सुरू होईल, अशी घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी केली.

औरंगाबादेत पीटलाइनच्या पायाभरणी समारंभात ते बोलत होते. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकारमंत्री अतुल सावे, खा. इम्तियाज जलील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आदी उपस्थित होते.  

अश्विनी वैष्णव म्हणाले, प्रारंभी महिन्यात तीन रेल्वे, त्यानंतर पाच रेल्वे, अशा टप्प्याटप्प्याने  निर्मिती वाढविली जाईल. ‘वंदे भारत’ रेल्वे सध्या चेअर कार आहे. पुढे स्लीपर रेल्वेचीही निर्मिती केली जाईल, मराठवाड्यात जो भाग जोडलेला नाही, त्यांना ‘गती शक्ती’ योजनेंतर्गत जोडले जाईल. मराठवाड्यासाठी आवश्यक रेल्वे प्रकल्प देण्यासाठी वचनबद्ध आहे.   

औरंगाबाद स्टेशनवर ‘रुफ प्लाझा’     औरंगाबाद रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासासाठी १८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. देशातील २०० स्टेशनवर ‘रुफ प्लाझा’ बनणार आहे. यात औरंगाबादेचाही समावेश आहे. यामध्ये एक एकर जागेत एकप्रकारे हवेत जमीन तयार करण्यात येणार आहे. त्यावर ‘रुफ प्लाझा’ असेल. रेल्वे रुळांवर छत असेल आणि त्या छतावर ‘वेटिंग एरिया’ असेल. 

शिर्डीसाठी भारत गौरव यात्रा रेल्वे

साईबाबांवर आधारित भारत गौरव यात्रा रेल्वे दक्षिण भारतातून शिर्डीसाठी सुरू करण्यात आली आहे. धार्मिक, पर्यटन, ऐतिहासिक जागांसाठी भारत गौरव रेल्वे चालविण्यात येणार आहे, असे वैष्णव म्हणाले.   

डिसेंबरपर्यंत धावणार विद्युत रेल्वे  

डिसेंबरपर्यंत विद्युत रेल्वे धावेल. मनमाड ते औरंगाबादपर्यंतच्या लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचा ‘डीपीआर’ तयार झाला असून, तो रेल्वे बोर्डाला सादरही करण्यात आला आहे, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसAurangabadऔरंगाबादAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवIndian Railwayभारतीय रेल्वे