शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

‘बांधकाम’चीच आडकाठी

By admin | Updated: December 11, 2014 00:41 IST

उस्मानाबाद : कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनच्या इमारतीचे हस्तांतरण मागील काही महिन्यांपासून रखडले आहे

उस्मानाबाद : कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनच्या इमारतीचे हस्तांतरण मागील काही महिन्यांपासून रखडले आहे. इमारतीमध्ये दहा ठिकाणी उणिवा असतानाही बांधकाम विभाग उणिवा दूर न करताच हस्तांतरणाचा प्रयत्न करीत असल्याचे संयुक्त पाहणीवेळी उघड झाले. सदर दहा त्रुटींची येत्या १५ ते ३० दिवसात पूर्तता करून या इमारतीचे हस्तांतरण करण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. येथील सामाजिक न्यायभवनची इमारत हस्तांतरणाअभावी पूर्णपणे कार्यान्वीत करण्यात आलेली नाही. सामाजिक न्याय विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये यावरून मागील काही महिन्यापासून टोलवाटोलवी सुरू आहे. विशेष म्हणजे याचा फटका विद्यार्थ्यांसह या इमारतीत सुरू होणाऱ्या विविध मागासवर्गीय महामंडळाच्या कार्यालयांना सोसावा लागत आहे. ‘लोकमत’ने मागील काही दिवसापासून हा विषय लावून धरल्यानंतर विविध सामाजिक संस्था, संघटनांनी याप्रकरणी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत समाजकल्याण अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर सदर इमारतीची संयुक्त पाहणी पाहणी करण्यात आली. यावेळी सदर इमारतीच्या कामामध्ये सुमारे दहा प्रकारच्या उणिवा असल्याचे दिसून आले. या उणिवांची पूर्तता सार्वजनिक बांधकाम विभागाने येत्या पंधरा ते तीस दिवसात करावी. त्यानंतर इमारतीचे हस्तांतरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, लेखी आश्वासनाप्रमाणे अपूर्ण व निकृष्ठ दर्जाची कामे संबंधित विभागाने दिलेल्या मुदतीत पूर्ण करून सामाजिक न्यायभवन जनतेसाठी खुले करावे, अन्यथा, सदर मुदतीनंतर भारिप-बहुजन महासंघाच्या वतीने पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष मिलींद रोकडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. (प्रतिनिधी)४सामाजिक न्याय भवनच्या इमारतीची संयुक्त पाहणी केली असता इमारतीतील अंतर्गत रस्त्याचे काम अर्धवट असल्याचे आढळून आले. इमारतीभोवतालच्या रस्त्याचे सुशोभिकरण करण्यात आलेले नाही. इमारती सभोवताली वृक्षारोपणही झालेले नाही. इमारतीसभोवतालचा परिसर स्वच्छ केलेला नाही. इमारतीच्या पाठीमागील ड्रेनेजचे झाकण व्यवस्थित बसविण्यात आलेले नाही. इमारती सभोवतालीच्या रस्त्याचे सपाटीकरण करणे आवश्यक आहे. इमारतीसभोवतालच्या गटारीवरती झाकण बसविलेले नाही. या बरोबरच विद्युत जनित्राचे झाकणही बसवावयाचे शिल्लक आहे. इमारतीच्या प्रवेशद्वारावरील दिव्यांना विद्युत कनेक्शन दिलेले नाही. याबरोबरच बोअरवेल ते पाण्याच्या साठवण हौदापर्यंत पाईपलाईन करण्यात आली नाही.