शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

'संविधान म्हणजे आपली उर्जा'; औरंगाबादेत आहे हस्तलिखित संविधानाची हिंदी आणि इंग्रजी सत्यप्रत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 13:18 IST

प्रेमबिहारी नारायण रायजादा (सक्सेना) यांना कॅलिग्राफीची कला अवगत असल्यामुळे त्यांनी अतिशय सुबकपणे संविधान हे कॅलिग्राफी शब्दशैलीच्या माध्यमातून लिहून काढले.

- विजय सरवदेऔरंगाबाद : भारतीय संविधान म्हणजे केवळ लिखित ग्रंथ नव्हे, तो आपली ऊर्जा व श्वास आहे. त्यामुळेच तर आज सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून जग आपल्याकडे पाहते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले मूळ संविधान कसे असेल, याविषयी उत्सुकता असलेल्या विद्यार्थी व जागरूक नागरिकांना मूळ संविधानाची प्रतिकृती शहरातील एम.पी. लॉ कॉलेज व जवाहर कॉलनीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात पाहता येईल.

याविषयी उपप्राचार्य डॉ. श्रीकिशन मोरे यांनी सांगितले की, भारतीय संविधान हे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत स्वीकृत करण्यात आले व त्याच दिवशी सायंकाळी भारत सरकारने ते गॅझेटमध्ये प्रसिद्ध केले होते. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली आहे. मूळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसूची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. बाबासाहेबांनी संविधान लिहून तयार केले होते, पण संविधान हे हस्तलिखित असावे, अशी नेहरूंची इच्छा होती. प्रेमबिहारी नारायण रायजादा (सक्सेना) यांना कॅलिग्राफीची कला अवगत असल्यामुळे त्यांनी अतिशय सुबकपणे संविधान हे कॅलिग्राफी शब्दशैलीच्या माध्यमातून लिहून काढले. संविधान लिहिण्यासाठी २५४ दौत शाई आणि ३०३ पेन वापरण्यात आले. ही प्रत तयार झाल्यावर संसद सदस्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी २४ जानेवारी १९५० रोजी अधिवेशन बोलाविण्यात आले. मूळ प्रतीवर २७३ संसद सदस्यांच्या स्वाक्षऱ्या असून पृष्ठ क्रमांक २२३ वर संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सही आहे. मूळ संविधानाची प्रत संसदेत अतिशय सुरक्षितपणे ठेवण्यात आली असून भारत सरकारने त्याच्या काही मोजक्याच प्रतिकृती छापल्या आहेत. त्यातील इंग्रजी व हिंदी भाषेतील दोन प्रतिकृती संसदेतून एम.पी. लॉ कॉलेजमध्ये आणल्या आहेत. दुसरीकडे, जवाहर कॉलनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयातही अशाच प्रकारची संविधानाची इंग्रजी भाषेतील प्रतिकृती अतिशय सुरक्षितपणे ठेवण्यात आली आहे. आतापर्यंत अनेक साहित्यिक व रिपब्लिकन नेत्यांनी या प्रतीचे अवलोकन केल्याचे या वाचनालयाचे अध्यक्ष काशिनाथ जाधव यांनी सांगितले.

संविधानाची प्रतिकृतीएम.पी. लॉ कॉलेजमध्ये असलेल्या इंग्रजी भाषेतील संविधानाच्या प्रतिकृतीचे वजन ८ किलो असून उंची ४२.५ सेंमी, रुंदी ३२ सेंमी आणि जाडी ५ सेंमी एवढी आहे, तर हिंदी प्रतिकृतीचे वजन ५ किलो असून उंची ४२.५ सेंमी, रुंदी ३२ सेंमी आणि जाडी ३.५ सेंमी आहे.

संविधान ही शोभेची वस्तू नाहीदेशाने संविधान स्वीकारले, त्यास ७२ वर्षे पूर्ण होत आहेत. पण, अजूनही संविधानाची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी झाली, असे म्हणता येत नाही. देशातील शोषित, पीडित, वंचित समाजावर वेगवेगळ्या प्रकारे अन्याय-अत्याचार होतच आहेत. त्यामुळे प्रत्येकाने संविधानाचा अभ्यास करायला हवा. संविधान ही कपाटात ठेवण्याची शोभेची वस्तू नाही, असे विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते सचिन निकम म्हणाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादConstitution Dayसंविधान दिनDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर