शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

आचारसंहितेत सेनेचे मनपा आयुक्तांवर दबावतंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 23:40 IST

बीड बायपास रोडवरील पाडापाडीसंदर्भात सोमवारी सकाळी शिवसेनेच्या मनपातील पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक आमदारांनी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्यावर चक्क दबावतंत्राचा वापर केला. बायपासवरील कारवाईने शिवसेनेची मते खराब होतील, अशी भीतीही दाखविण्यात आली. काहीही करा कारवाई थांबवा, असा सज्जड दमही आयुक्तांना देण्यात आल्याची माहिती मनपातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देबंद खोलीत खलबते : मनपा पदाधिकाऱ्यांसह आमदारांची उपस्थिती

औरंगाबाद : बीड बायपास रोडवरील पाडापाडीसंदर्भात सोमवारी सकाळी शिवसेनेच्या मनपातील पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक आमदारांनी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्यावर चक्क दबावतंत्राचा वापर केला. बायपासवरील कारवाईने शिवसेनेची मते खराब होतील, अशी भीतीही दाखविण्यात आली. काहीही करा कारवाई थांबवा, असा सज्जड दमही आयुक्तांना देण्यात आल्याची माहिती मनपातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.सोमवारी सकाळी मनपा आयुक्त सुटीवरून परत येताच स्थायी समिती सभापतींच्या अ‍ॅन्टी चेंबरमध्ये आयुक्तांसोबत एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस मनपातील सेनेचे तिन्ही पदाधिकारी, पश्चिमचे आमदारही उपस्थित होते. तब्बल एक तासापेक्षा अधिक वेळ खलबते करण्यात आले. काही पदाधिकाऱ्यांनी आवाजही चढविला होता. बीड बायपास हा एकमेव मुद्दा बैठकीत गाजत होता. आयुक्तांनी सेना पदाधिकाºयांना ठोस असे कोणतेच आश्वासन दिले नाही. बायपासवरील कारवाई थांबविण्याचे आश्वासनही दिले नाही. मी पाहतो, बघतो अशी उत्तरे आयुक्तांनी दिल्याचे सूत्रांनी नमूद केले. आचारसंहितेत शिवसेनेकडून अशा पद्धतीचे दबावतंत्र टाकता येऊ शकते का? अशी चर्चा मनपा वर्तुळात होती. स्थायी समिती सभापतींच्या अ‍ॅन्टी चेंबरमधून आयुक्त सर्वप्रथम बाहेर आले. मला विभागीय आयुक्तांकडे बैठकीसाठी जायचे आहे, म्हणून त्यांनी काढता पाय घेतला. आयुक्त गेल्यावर थोड्या वेळाने सेनेचे पदाधिकारी बाहेर आले. बाहेर पत्रकार असल्याची कुणकुण अगोदरच सेना पदाधिकाºयांना लागली होती. बैठकीतून बाहेर येताच पश्चिमच्या आमदारांनी पत्रकारांसमोर खुलासा केला की, आयुक्त वेळकाढू धोरण स्वीकारत आहेत. पडेगाव कचरा प्रकल्पाला गती द्यावी, विविध प्रलंबित विकास कामांना गती द्यावी, बायपासवरील कारवाईचे समर्थनही आमदारांनी केले. जबाबदाºया विविध अधिकाºयांवर सोपविण्यापेक्षा आयुक्तांनी स्वत: काही जबाबदारी घ्यावी, असा सल्ला दिल्याचेही त्यांनी नमूद केले. चिरंजीव प्रसाद, ओम प्रकाश बकोरिया यांच्यामुळेच बायपासवरील कारवाई करण्यात आली. या कारवाईला ब्रेक लागू नये अशी अपेक्षाही त्यांनी पत्रकारांसमोर व्यक्त केली. वास्तविक पाहता पत्रकारांनी बायपासच्या मुद्यावर एकाही सेना पदाधिकाºयांना छेडले नव्हते.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEnchroachmentअतिक्रमण