शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

'माझ्या विरोधात षडयंत्र', मनोज जरांगेंचा गंभीर आरोप; 'असंतुष्ट' समन्वयकांवरही साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 13:49 IST

मी 'मॅनेज' होत नाही, त्यामुळे अशा असंतुष्ट समन्वयकांना हाताशी धरून माझ्या विरोधात 'ट्रॅप' लावला जात आहे.

छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणासाठी निर्णायक आंदोलन मुंबईत होणार आहे. अंतरवालीपासून निघणाऱ्या आरक्षण दिंडीस आता केवळ चार दिवस बाकी आहेत. मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चेनंतर सरकारचे शिष्टमंडळ आज नवीन ड्राफ्ट देणार आहे. याच दरम्यान, जरांगे यांनी आपल्या विरोधात मोठा 'ट्रॅप' लावला  जात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मी 'मॅनेज' होत नसल्याने काही असंतुष्ट मराठा समन्वयक हाताशी धरून सरकार षडयंत्र आखत असल्याची खात्रीलायक माहिती असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले. अधिकृत नावे आल्यास सगळे बाहेर काढतो, असा इशारा देखील जरांगे यांनी 'असंतुष्ट' समन्वयकांना दिला. ते एक वृत्तवाहिनी प्रतिनिधीसोबत संवाद साधत होते.

आमदार बच्चू कडू यांनी सोमवारी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. चर्चेतून काही बदल जरांगे यांनी सुचवले. त्यानंतर नवीन ड्राफ्ट घेऊन आज आमदार बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे जरांगे यांना भेटणार आहेत. एकीकडे सरकारच्या स्तरावरुन वेगवान घडामोडी सुरू असताना दुसरीकडे जरांगे यांनी आपल्या विरोधात मोठे षडयंत्र होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्रसिद्धीसाठी हापापले काही समन्वयक वेगळी भूमिका घेत आहेत. मुंबई, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर , अहमदनगर, शिर्डी येथे काहीजण विनाकारण बैठक घेत आहेत. सध्या कठीण काळ असून समाजासोबत रहा, समाजाचे कल्याण करा, जातीसाठी काम करा, तुम्हाला राजकारण करायचे आहे, पण त्यासाठी समाजाचे वाटोळे करू नका. यात कोण कोण आहे ? कशासाठी हे होत आहे ? तुमच्या मागे कोणता नेता आहे ? याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. अधिकृत माहिती मिळाल्यास सर्व जाहीर करेल,असा इशारा देखील जरांगे यांनी 'असंतुष्ट' समन्वयकांना दिला. तसेच मला नेता बनायचे नाही, समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर मी हिमालयात जाईल, अशी स्पष्ट भूमिका जरांगे यांनी मांडली.

सर्व समाज स्वयंसेवक, विरोधकांना थेट बाहेर काढासध्याच्या आंदोलनाने काहींच्या दुकानदाऱ्या बंद झाल्या आहेत. मी 'मॅनेज' होत नाही, त्यामुळे अशा असंतुष्ट समन्वयकांना हाताशी धरून माझ्या विरोधात 'ट्रॅप' लावला जात आहे. एवढेच नाही तर आरक्षण दिंडीत हिंसाचार घडू शकतो. माझे समाजाला एकच सांगणे आहे. सर्व समाजच स्वयंसेवक आहे. काही मोजकी पन्नास साठ जण समाज नाहीत. वेगळी भूमिका घेणाऱ्यांना थेट बाहेर काढा, असे आवाहनही जरांगे यांनी केले.

'सगेसोयरे'वर तोडगा निघाला- आमदार बच्चू कडूमराठा आरक्षण आणि तोडग्याबाबत काल मुख्यमंत्री आणि माझी जवळपास चार तास बैठक झाली. यात जरांगे यांच्या मागण्या आणि सगेसोयरे या विषयावरही चर्चा झाली. बैठकीतून एक समाधानकारक तोडगा निघाला असून त्याचा ड्राफ्ट आम्ही आणला आहे. या तोडग्यामुळे जरांगे यांचे समाधान होईल, असा विश्वास बच्चू कडू यांनी जरांगे यांची आज पुन्हा भेट घेण्याच्या पूर्वी व्यक्त केला. तसेच जरांगे यांनी आंदोलन मागे घ्यावं अशी आम्ही विनंती करणार असल्याचेही बच्चू कडू म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना