शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
5
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
6
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
7
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
8
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
9
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
10
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
11
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
12
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
13
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
14
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
15
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
16
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
17
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
18
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
19
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
20
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी

शेतकऱ्यांना दिलासा ! रबी हंगामासाठी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून ७०० क्युसेकचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 18:59 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समिती बैठकीत सोमवारी सिंचनासाठी पहिले आवर्तन सोडण्याचा निर्णय

ठळक मुद्देसिंचन क्षेत्रासाठी १७०  दलघमी पाणी सोडण्यास मान्यतापहिले आवर्तन २० ते २२ दिवस सुरू राहणार

पैठण : जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या रब्बी हंगामातील पिकासाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे. ७०० क्युसेक क्षमतेने डाव्या कालव्यातून विसर्ग करण्यात येत आहे. 

मराडवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समिती बैठकीत सोमवारी सिंचनासाठी पहिले आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत जायकवाडीच्या डाव्या कालव्या अंतर्गत येणाऱ्या लाभक्षेत्रातील १२०००० हे. सिंचन क्षेत्रासाठी १७०  दलघमी पाणी सोडण्यास मान्यता देण्यात आली असून पहिले आवर्तन २० ते २२ दिवस सुरू राहणार आहे. डाव्या कालव्या प्रमाणे जायकवाडीच्या उजव्या कालव्यावरील लाभक्षेत्रासाठी मागणी आल्यास पाणी सोडण्यास मान्यता मिळाली असल्याचे जायकवाडीचे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले. सध्या रब्बी हंगामातील गहू , बाजरी , तूर , हरभरा या पिकांसाठी पाणी लाभदायक ठरणार असल्याने जायकवाडी लाभक्षेत्रात येणाऱ्या औरंगाबाद, जालना, परभणी, बीड व अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांंना मोठा दिलासा मिळाला आहे. 

धरणातील पाणी ३१ जुलै २०२१ पर्यंत पुरेल असे नियोजन....या वर्षी  खरीप हंगामा अखेर दि. १५ ऑक्टोबर २०२० रोजीपर्यंत धरणात १००% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे धरणावर अवलंबून असलेल्या सर्व पिण्याचे व औद्योगिक  पाणीपुरवठा योजनांना ३१ जुलै २०२०  अखेर पर्यंत पाणी पुरेल असे नियोजन करण्यात आले असल्याचे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

रब्बी हंगामात तीन तर उन्हाळ्यात पाच आवर्तने......धरणाच्या उपयुक्त पाणीसाठ्यातून रब्बी हंगामात तिन तर  उन्हाळी हंगामात पाच आवर्तने देणे प्रस्तावित असून जलाशयासह डावा आणि उजवा कालव्यावर १४६९०० हे.  क्षेत्र सिंचित करणे नियोजित आहे.  त्याकरिता अनुक्रमे   ६१८ दलघमी व ५३० दलघमी असे एकूण ११४८ दलघमी पाणीवापर  होईल असे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादWaterपाणीagricultureशेती