शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शेतकऱ्यांना दिलासा ! रबी हंगामासाठी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून ७०० क्युसेकचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 18:59 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समिती बैठकीत सोमवारी सिंचनासाठी पहिले आवर्तन सोडण्याचा निर्णय

ठळक मुद्देसिंचन क्षेत्रासाठी १७०  दलघमी पाणी सोडण्यास मान्यतापहिले आवर्तन २० ते २२ दिवस सुरू राहणार

पैठण : जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या रब्बी हंगामातील पिकासाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे. ७०० क्युसेक क्षमतेने डाव्या कालव्यातून विसर्ग करण्यात येत आहे. 

मराडवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समिती बैठकीत सोमवारी सिंचनासाठी पहिले आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत जायकवाडीच्या डाव्या कालव्या अंतर्गत येणाऱ्या लाभक्षेत्रातील १२०००० हे. सिंचन क्षेत्रासाठी १७०  दलघमी पाणी सोडण्यास मान्यता देण्यात आली असून पहिले आवर्तन २० ते २२ दिवस सुरू राहणार आहे. डाव्या कालव्या प्रमाणे जायकवाडीच्या उजव्या कालव्यावरील लाभक्षेत्रासाठी मागणी आल्यास पाणी सोडण्यास मान्यता मिळाली असल्याचे जायकवाडीचे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले. सध्या रब्बी हंगामातील गहू , बाजरी , तूर , हरभरा या पिकांसाठी पाणी लाभदायक ठरणार असल्याने जायकवाडी लाभक्षेत्रात येणाऱ्या औरंगाबाद, जालना, परभणी, बीड व अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांंना मोठा दिलासा मिळाला आहे. 

धरणातील पाणी ३१ जुलै २०२१ पर्यंत पुरेल असे नियोजन....या वर्षी  खरीप हंगामा अखेर दि. १५ ऑक्टोबर २०२० रोजीपर्यंत धरणात १००% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे धरणावर अवलंबून असलेल्या सर्व पिण्याचे व औद्योगिक  पाणीपुरवठा योजनांना ३१ जुलै २०२०  अखेर पर्यंत पाणी पुरेल असे नियोजन करण्यात आले असल्याचे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

रब्बी हंगामात तीन तर उन्हाळ्यात पाच आवर्तने......धरणाच्या उपयुक्त पाणीसाठ्यातून रब्बी हंगामात तिन तर  उन्हाळी हंगामात पाच आवर्तने देणे प्रस्तावित असून जलाशयासह डावा आणि उजवा कालव्यावर १४६९०० हे.  क्षेत्र सिंचित करणे नियोजित आहे.  त्याकरिता अनुक्रमे   ६१८ दलघमी व ५३० दलघमी असे एकूण ११४८ दलघमी पाणीवापर  होईल असे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादWaterपाणीagricultureशेती