शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

औरंगाबादकरांना दिलासा...कोरोनाचा जोर ओसरतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 11:42 IST

जिल्ह्यात मार्च महिन्यापासून सतत चढता क्रम असणाऱ्या कोरोनाचा सप्टेंबर अखेरपासून उतरता क्रम सुरू आहे.  परिणामी, रुग्णदुपटीचा कालावधीही वाढत असल्याने औरंगाबादकरांना दिलासा मिळत आहे. 

संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : जिल्ह्यात मार्च महिन्यापासून सतत चढता क्रम असणाऱ्या कोरोनाचा सप्टेंबर अखेरपासून उतरता क्रम सुरू आहे.  परिणामी,  रुग्णदुपटीचा कालावधीही वाढत असल्याने औरंगाबादकरांना दिलासा मिळत आहे. या सगळ्यात दररोज मृत्यू सुरुच आहे. परंतु ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची गरज असलेल्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याने लवकरच मृत्यूचे प्रमाणही कमी होईल, असा विश्वास आरोग्य यंत्रणेकडून व्यक्त होत आहे.

औरंगाबादेत १५ मार्च रोजी कोरोनाच्या पहिल्या रुग्णाचे निदान झाले. तेव्हापासून सप्टेंबरच्या मध्यापर्यंत रुग्णसंख्येचा आलेख वाढताच  होता.  दरदिवशी २०० ते ४०० च्या घरात रुग्णांचे निदान होत गेले. त्यातही औरंगाबादेत जून महिना उजडताच कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढीचा वेग वाढला हाेता. मार्च ते मे अशा ३ महिन्यांत आढळलेली रुग्णसंख्या जूनच्या २२ दिवसांतच दुप्पट झाली. गेल्या ७ महिन्यांत रुग्णसंख्येने ३५  हजारांपर्यंतची मजल मारली आहे.

मात्र आता सप्टेंबरअखेरीस रुग्णसंख्या कमी होण्यास सुरुवात झाली. प्रत्यक्षात चाचण्या कमी होत आहेत की रुग्णसंख्या कमी होत आहे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. परंतु चाचण्यात घट करण्यात आलेली नसल्याचा दावा आरोग्य यंत्रणेकडून केला जात आहे. रुग्णसंख्या घटल्याने  आयसीयू बेड, ऑक्सिजन बेडसह शेकडो जनरल बेड रिक्त आहेत. जिल्ह्यात २५ सप्टेंबर रोजी ६ हजार रुग्णांवर उपचार सुरु होते. उपचार  सुरु  असलेल्या रुग्णांची संख्या शुक्रवारी सोडतीन हजार होती. यावरूनच कोरोनाचा जोर ओसरताना दिसत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल