शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

औरंगाबादकरांना दिलासा...कोरोनाचा जोर ओसरतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 11:42 IST

जिल्ह्यात मार्च महिन्यापासून सतत चढता क्रम असणाऱ्या कोरोनाचा सप्टेंबर अखेरपासून उतरता क्रम सुरू आहे.  परिणामी, रुग्णदुपटीचा कालावधीही वाढत असल्याने औरंगाबादकरांना दिलासा मिळत आहे. 

संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : जिल्ह्यात मार्च महिन्यापासून सतत चढता क्रम असणाऱ्या कोरोनाचा सप्टेंबर अखेरपासून उतरता क्रम सुरू आहे.  परिणामी,  रुग्णदुपटीचा कालावधीही वाढत असल्याने औरंगाबादकरांना दिलासा मिळत आहे. या सगळ्यात दररोज मृत्यू सुरुच आहे. परंतु ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची गरज असलेल्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याने लवकरच मृत्यूचे प्रमाणही कमी होईल, असा विश्वास आरोग्य यंत्रणेकडून व्यक्त होत आहे.

औरंगाबादेत १५ मार्च रोजी कोरोनाच्या पहिल्या रुग्णाचे निदान झाले. तेव्हापासून सप्टेंबरच्या मध्यापर्यंत रुग्णसंख्येचा आलेख वाढताच  होता.  दरदिवशी २०० ते ४०० च्या घरात रुग्णांचे निदान होत गेले. त्यातही औरंगाबादेत जून महिना उजडताच कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढीचा वेग वाढला हाेता. मार्च ते मे अशा ३ महिन्यांत आढळलेली रुग्णसंख्या जूनच्या २२ दिवसांतच दुप्पट झाली. गेल्या ७ महिन्यांत रुग्णसंख्येने ३५  हजारांपर्यंतची मजल मारली आहे.

मात्र आता सप्टेंबरअखेरीस रुग्णसंख्या कमी होण्यास सुरुवात झाली. प्रत्यक्षात चाचण्या कमी होत आहेत की रुग्णसंख्या कमी होत आहे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. परंतु चाचण्यात घट करण्यात आलेली नसल्याचा दावा आरोग्य यंत्रणेकडून केला जात आहे. रुग्णसंख्या घटल्याने  आयसीयू बेड, ऑक्सिजन बेडसह शेकडो जनरल बेड रिक्त आहेत. जिल्ह्यात २५ सप्टेंबर रोजी ६ हजार रुग्णांवर उपचार सुरु होते. उपचार  सुरु  असलेल्या रुग्णांची संख्या शुक्रवारी सोडतीन हजार होती. यावरूनच कोरोनाचा जोर ओसरताना दिसत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल