शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

डीएमआयसीसोबत समृद्धी महामार्गाच्या ‘कनेक्टिव्हिटी’चा गुंता सुटता सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 19:35 IST

Samruddhi Mahamarga ‘एमआयडीसी’चे संचालक मंडळ पेचात  

ठळक मुद्देदर्जेदार सुविधा मिळाल्या पाहिजेत, त्याही फुकट!

औरंगाबाद : दर्जेदार सुविधा मिळाल्या पाहिजेत, त्याही फुकट, अशा मानसिकतेतून समृद्धी महामार्गाच्या कनेक्टिव्हिटीचा गुंता वाढत चालला आहे. ‘नागपूर-मुंबई’ व्हाया औरंगाबाद या सुपर एक्स्प्रेसवे अर्थात समृद्धी महामार्गाला ‘डीएमआयसी’ची ‘कनेक्टिव्हिटी’ देण्यास राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) तयारी दर्शविली खरी. मात्र, समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम आणि इंटरचेंजच्या कामाचे पैसे देण्याच्या अटीवरून ‘एमआयडीसी’च्या संचालक मंडळासमोर पेच निर्माण झाला आहे. 

झाले असे की, ‘डीएमआयसी’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक वसाहतीमध्ये बहुराष्ट्रीय तसेच देशातील मोठ्या उद्योगांना आकर्षित करण्यासाठी ‘एमआयडीसी’ने समृद्धी महामार्गाच्या कनेक्टिव्हिटीबाबत चार महिन्यांपूर्वी राज्य रस्ते विकास महामंडळासमोर प्रस्ताव मांडला होता. तोपर्यंत या महामार्गाचे काम टप्प्याटप्प्याने नाशिक जिल्ह्याच्या सीमेपर्यंत पोहोचले होते. तरीही उद्योगमंत्री सुभाष देसाई व आदित्य ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर कनेक्टिव्हिटी देण्यासाठी ‘एमएसआरडीसी’ने सशर्त तयारी दर्शविली. या ‘सुपर एक्स्प्रेस वे’च्या निकषानुसार जोडणाऱ्या रस्त्याचे डिझाईन ‘एमआयडीसी’ला दिले. दिलेल्या डिझाईननुसार रस्त्याचे काम ‘एमआयडीसी’ने करावे. कनेक्टिव्हिटीच्या ठिकाणी इंटरचेंजचे काम ‘मेगा इंजिनिअरिंग ही’ समृद्धी महामार्गाची कंत्राटदार संस्था करेल. या कामासाठी लागणारा अंदाजित २० ते २५ कोटी रुपयांची रक्कम ‘एमआयडीसी’ने द्यावी, या अटी ‘एमएसआरडीसी’ने घातल्या आहेत. नेमक्या या अटी एमआयडीसीला रुचलेल्या दिसत नाहीत. 

‘एमआयडीसी’च्या कार्यालयीन सूत्रांनी सांगितले की, ‘एमएसआरडीसी’ने कनेक्टिव्हिटी देण्यासाठी मान्यता दिली असली, तरी त्यांचा हा खर्चिक प्रस्ताव एमआयडीच्या संचालक मंडळाच्या विचाराधीन आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. संचालक मंडळ काय निर्णय घेते, त्यावर सर्वकाही अवलंबून आहे. त्यामुळे तूर्तास तरी भूसंपादनाची प्रक्रिया हाती घेण्यात आलेली नाही. ही कनेक्टिव्हिटी शेंद्रा व जयपूर औद्योगिक वसाहतीमध्ये आहे. 

पावसामुळे रखडले बोगद्याचे काम‘एमएसआरडीसी’चे अधीक्षक अभियंता ए.बी. साळुंके यांनी सांगितले की, पावसामुळे समृद्धी महामार्ग व बोगद्याच्या कामात थोडा व्यत्यय आला होता. आता पाऊस थांबलाय. आता गतीने काम सुरू होईल. सावंगीजवळ बोगदा तयार केला जात आहे. बोगद्याच्या कामासाठी डोंगर कोरणारी मशीन हैदराबाद येथून मागविण्यात आली आहे. पावसामुळे ती इथपर्यंत पोहोचू शकत नव्हती. दोन मशीनच्या माध्यमातून एकाच वेळी दोन्ही बाजूने बोगद्याचे काम आठवडाभरात सुरू होईल. डिसेंबरअखेरपर्यंत बोगदा तयार होईल.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गDMICदिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरAurangabadऔरंगाबाद