शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

कारखान्यांची सीईटीपी प्रकल्पात जोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 19:17 IST

काही कंपन्या रसायनमिश्रीत सांडपाणी थेट नाल्यात सोडत असल्याने अनेक सेक्टरमधील गटारी तुंबल्या आहेत.

वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक क्षेत्रातील १३४ कारखान्यांनी सीईटीपी प्रकल्पात जोडणी केलेली असून, ६० कंपन्या टँकरद्वारे या प्रकल्पात पाणी साणून सोडतात. मात्र, काही कंपन्या रसायनमिश्रीत सांडपाणी थेट नाल्यात सोडत असल्याने अनेक सेक्टरमधील गटारी तुंबल्या आहेत. औद्योगिक वसाहतीतील विविध सेक्टरमध्ये हे चित्र पहावयास मिळते.

वाळूज उद्योनगरीत जवळपास ३ हजार लहान मोठे कारखाने आहेत. पूर्वी बहुतांश कंपन्या सांडपाण्याची नाल्यात वा उघड्यावर विल्हेवाट लावत होत्या. पावसाच्या पाण्याबरोबर काही कंपन्या सांडपाणी कंपन्यातून बाहेर सोडत असल्याच्या तक्रारी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांतून केल्या जात होत्या. परिसरातील जलसाठे दूषित झाले आहेत. रसायनयुक्त सांडपाणी जमिनीत पाझरुन विहिरी व हातपंपाचे पाणीही दूषित झाले आहे. याबाबतच्या तक्रारी वाढल्याने एमआयडीसीकडून या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. दशकापूर्वी वाळूज उद्योगनगरीत बीओटी तत्वावर १० एमएलडी क्षमतेचा सीईटीपी प्रकल्प उभारण्यात आला आहे.

या प्रकल्पात सांडपाणी सोडण्यासाठी पाईपलाईनही टाकलेली आहे. मात्र, सीईटीपी प्रकल्पात जोडणीचा खर्च वाचविण्यासाठी काही कारखानदार छुप्या पद्धतीने सांडपाण्याची उघड्यावर विल्हेवाट लावत असल्याचे प्रकार पुन्हा वाढले आहे.

दोन महिन्यांपासून वाळूजमहानगर परिसरातील घाणेगाव, करोडी, शरणापूर आदी ठिकाणी टँकरद्वारे रसायनयुक्त सांडपाणी सोडले जात आहे. यामुळे जमिनी नापीक होण्याचा धोका वाढल्याने तसेच मुक्या जनावरांच्या जिवीतास धोका निर्माण झाल्याच्या तक्रारी नागरिक व शेतकऱ्यांची प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे केल्या आहेत. विशेष म्हणजे प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी काही ठिकाणी घटनास्थळी भेट देऊन पंचनामे करुन पाण्याचे नमुने घेतले आहेत. मात्र प्रयोग शाळेचा अहवाल उघड केला जात नसल्याने या परिसरातील नागरिकात उलट-सुलट चर्चा सुरु आहे.

 

टॅग्स :MIDCएमआयडीसीWalujवाळूजpollutionप्रदूषण