शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

कारखान्यांची सीईटीपी प्रकल्पात जोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 19:17 IST

काही कंपन्या रसायनमिश्रीत सांडपाणी थेट नाल्यात सोडत असल्याने अनेक सेक्टरमधील गटारी तुंबल्या आहेत.

वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक क्षेत्रातील १३४ कारखान्यांनी सीईटीपी प्रकल्पात जोडणी केलेली असून, ६० कंपन्या टँकरद्वारे या प्रकल्पात पाणी साणून सोडतात. मात्र, काही कंपन्या रसायनमिश्रीत सांडपाणी थेट नाल्यात सोडत असल्याने अनेक सेक्टरमधील गटारी तुंबल्या आहेत. औद्योगिक वसाहतीतील विविध सेक्टरमध्ये हे चित्र पहावयास मिळते.

वाळूज उद्योनगरीत जवळपास ३ हजार लहान मोठे कारखाने आहेत. पूर्वी बहुतांश कंपन्या सांडपाण्याची नाल्यात वा उघड्यावर विल्हेवाट लावत होत्या. पावसाच्या पाण्याबरोबर काही कंपन्या सांडपाणी कंपन्यातून बाहेर सोडत असल्याच्या तक्रारी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांतून केल्या जात होत्या. परिसरातील जलसाठे दूषित झाले आहेत. रसायनयुक्त सांडपाणी जमिनीत पाझरुन विहिरी व हातपंपाचे पाणीही दूषित झाले आहे. याबाबतच्या तक्रारी वाढल्याने एमआयडीसीकडून या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. दशकापूर्वी वाळूज उद्योगनगरीत बीओटी तत्वावर १० एमएलडी क्षमतेचा सीईटीपी प्रकल्प उभारण्यात आला आहे.

या प्रकल्पात सांडपाणी सोडण्यासाठी पाईपलाईनही टाकलेली आहे. मात्र, सीईटीपी प्रकल्पात जोडणीचा खर्च वाचविण्यासाठी काही कारखानदार छुप्या पद्धतीने सांडपाण्याची उघड्यावर विल्हेवाट लावत असल्याचे प्रकार पुन्हा वाढले आहे.

दोन महिन्यांपासून वाळूजमहानगर परिसरातील घाणेगाव, करोडी, शरणापूर आदी ठिकाणी टँकरद्वारे रसायनयुक्त सांडपाणी सोडले जात आहे. यामुळे जमिनी नापीक होण्याचा धोका वाढल्याने तसेच मुक्या जनावरांच्या जिवीतास धोका निर्माण झाल्याच्या तक्रारी नागरिक व शेतकऱ्यांची प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे केल्या आहेत. विशेष म्हणजे प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी काही ठिकाणी घटनास्थळी भेट देऊन पंचनामे करुन पाण्याचे नमुने घेतले आहेत. मात्र प्रयोग शाळेचा अहवाल उघड केला जात नसल्याने या परिसरातील नागरिकात उलट-सुलट चर्चा सुरु आहे.

 

टॅग्स :MIDCएमआयडीसीWalujवाळूजpollutionप्रदूषण