शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
3
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
4
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
5
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
6
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
7
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
8
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
9
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
10
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
11
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
12
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
13
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
14
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
15
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
16
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
17
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
18
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
19
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
20
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती

काँग्रेसही ११३ जागा लढविणार

By admin | Updated: April 7, 2015 01:29 IST

औरंगाबाद : मनपा निवडणुकीत बहुचर्चित काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार नाही, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. कारण काँग्रेसने सर्वच्या सर्व ११३ जागांवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

औरंगाबाद : मनपा निवडणुकीत बहुचर्चित काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार नाही, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. कारण काँग्रेसने सर्वच्या सर्व ११३ जागांवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.ज्या उमेदवारांचे पक्षाने तिकीट पक्के केले, त्यांना बोलावून बी फॉर्म देण्यास आज दुपारपासून प्रारंभ करण्यात आला. हे काम आमदार सुभाष झांबड यांच्या सिडको निवासस्थानातून सुरू झाले. याठिकाणी निरीक्षक सचिन सावंत, बाळासाहेब देशमुख, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम व आ. सुभाष झांबड हे स्वत: उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत बी फॉर्म वाटपाचे काम सुरू होते. या प्रतिनिधीशी बोलताना सचिन सावंत व आ. सुभाष झांबड यांनी सांगितले की, काँग्रेसमध्ये कुठेही मतभिन्नता वा गटबाजी नाही. आम्हाला सर्व वॉर्डांतून उमेदवारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातील निवडून येण्याची क्षमता लक्षात घेऊन तिकिटे पक्की करण्यात आली व त्या संबंधित उमेदवारांना निरोप देऊन बोलावून घेण्यात आले व त्यांना बी फॉर्मचे वाटप सुरू करण्यात आले. आ. झांबड यांच्या निवासस्थानासमोर उमेदवारांची गर्दी पाहावयास मिळाली. जितेंद्र देहाडे, डॉ. पवन डोंगरे, अ‍ॅड. सय्यद अक्रम व राजकुमार जाधव आदी मंडळी सचिन सावंत, बाळासाहेब देशमुख यांना सहकार्य करीत होती. अर्ज भरल्यानंतर उद्या दुपारी आम्ही सर्व उमेदवारांची नावे जाहीर करू, असे झांबड यांनी सांगितले. १० ते १५ जागांचा वाद सुरू आहे. त्यातल्या काही जागांवर युवक काँग्रेसने दावा केला आहे. हा वाद आम्ही लवकरच संपवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उमेदवारी यादी आधीच जाहीर न करता तिकीट पक्के झालेल्या उमेदवाराला बी फॉर्म देण्याच्या या पद्धतीमुळे संभाव्य बंडखोरीला आळा बसेल, असे मानले जात आहे.