शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

काँग्रेसच्या संपर्कमंत्र्यांचा औरंगाबादशी संपर्कच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 12:17 IST

संघटनात्मक बांधणीसाठी पावले उचलण्याची गरज

ठळक मुद्देसंपर्कमंत्री अमित देशमुख एकदाही आले नाहीमनपा निवडणुकीनिमित्त का होईना ते येतील, असे वाटले होते

- स.सो. खंडाळकर

औरंगाबाद : काँग्रेसचेऔरंगाबादचे संपर्कमंत्री अमित देशमुख यांची संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यापासून औरंगाबादला दर्शनच झाले नाही, संपर्क तर दूरच. याबद्दल राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. औरंगाबाद मनपा निवडणुकीनिमित्त का होईना ते येतील, असे वाटले होते; पण आलेच नाहीत. सध्या कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे, काय होते नि काय नाही, अशी भीती असतानाही ‘काळजी घ्या’, असे ते शहरात येऊन सांगतील, असे वाटले होते; पण तसेही घडताना दिसत नाही.

त्या त्या जिल्ह्यांसाठी संपर्कमंत्री नेमून पक्ष संघटना वाढविण्यास मदत करणे, सरकारच्या योजनांचा प्रचार-प्रसार करणे, त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांशी, जनता-जनार्दनाशी संपर्क वाढविणे हा संपर्कमंत्र्यांच्या नियुक्तीमागचा उद्देश; पण तो कुठेही साध्य होताना दिसत नाही, हे औरंगाबादच्या संपर्कमंत्र्यांच्या निष्क्रियतेवरून लक्षात आल्याशिवाय राहत नाही.  आधीच काँग्रेसची स्थिती खराब आधीच औरंगाबादच्या काँग्रेसची स्थिती खराब आहे. मनपा निवडणुकीसाठी जेमतेम इच्छुकांचा काँग्रेसकडे ओढा दिसला. अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्यापासून जिल्हा काँग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्ष नाही. तो कधी नेमला जाणार, याची शाश्वती नाही. शहराध्यक्षांबद्दल मुस्लिम-दलित समाजात प्रचंड नाराजी आहे. शहराचा अध्यक्ष मुस्लिम चेहरा असावा, असा जोर वाढूनही विद्यमान पक्षनेतृत्व त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करताना दिसत आहे. मध्यंतरी बदल घडणार असे चित्र असताना प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. कार्यकर्त्यांच्या भावनाही कोणी जाणून घेण्यास तयार नाही. संपर्कमंत्र्यांनी यात लक्ष घालण्याची गरज असते; पण औरंगाबादच्या संपर्कमंत्र्यांना एकदाही औरंगाबादला यायला वेळ मिळला नाही, याबद्दल नाराजी तर व्यक्त होतच आहे; पण कमालीचे आश्चर्य व्यक्त होत आहे. विलासराव देशमुखांचे औरंगाबादवर विशेष प्रेम... माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे औरंगाबादवर विशेष प्रेम होते. औरंगाबादसाठी काही करण्याची त्यांची ऊर्मी होती. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांच्या निधनानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये पैठणगेटसारख्या मध्यवर्ती ठिकाणी गोविंदभार्इंचा पुतळा उभा राहिला. कारण यासाठी स्वत: विलासरावांनी पुढाकार घेतला. शिवाय काही संस्था उभारणीमध्ये त्यांचा वाटा आहे. अमित देशमुख यांना विलासराव देशमुख यांचा वारसा लाभलेला आहे आणि योगायोगाने त्यांच्याकडे औरंगाबादचे संपर्कमंत्री पद लाभलेले आहे. खरेतर या संधीचे सोने व्हायला हवे असे काँग़्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना वाटत आहे, पण तसे चित्र सध्या तरी दिसत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी  आहे. 

नाही तर तात्काळ संपर्कमंत्री बदला...अमित देशमुख यांना वेळच नसेल, ते वारंवार औरंगाबादला येऊ शकत नसतील तर त्यांना बदलणे हाच यावरचा योग्य उपाय दिसतो. त्यापेक्षा किती तरी वेळा अशोक चव्हाण औरंगाबादला येऊन जात असतात. त्यांचे औरंगाबादशी असलेले नाते जुनेच आहे. त्यांचे घराणे मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणचे.४ जायकवाडी जलाशयाचे शिल्पकार असलेले शंकरराव चव्हाण यांना मराठवाड्यातील जनता कधीच विसरू शकत नाही. त्यांचे चिरंजीव अशोकराव चव्हाण हे औरंगाबादच्या संपर्कमंत्रीपदाची जबाबदारी लीलया पेलू शकतात व त्यांचा इथल्या काँग्रेसला काही फायदाही होऊ शकतो. सध्या तर कोरोनाचा हैदोस चालू आहे. तीन महिन्यांपुरती मनपा निवडणूक पुढे ढकलली गेली आहे, त्याआधी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी पावले उचलण्याची गरज आहे, हे सर्वांनाच पटते; पण प्रत्यक्षात काय होईल, हे कुणीही सांगू शकत नाही.  

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAmit Deshmukhअमित देशमुखcongressकाँग्रेस