शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
4
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
5
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
6
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
7
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
8
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
9
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
10
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
11
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
12
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
13
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
14
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
15
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
16
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
17
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
18
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
19
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
20
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल

काँग्रेस सर्वसामान्यांचा पक्ष

By admin | Updated: December 28, 2015 23:51 IST

सिल्लोड : विकासाची दृष्टी व सर्वसामान्यांना घेऊन चालणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष असल्याचे प्रतिपादन आ. अब्दुल सत्तार यांनी सोमवारी सिल्लोड येथे केले

सिल्लोड : विकासाची दृष्टी व सर्वसामान्यांना घेऊन चालणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष असल्याचे प्रतिपादन आ. अब्दुल सत्तार यांनी सोमवारी सिल्लोड येथे केले. काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त सिल्लोडच्या गांधी भवन येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात माजी मंत्री आ. सत्तार बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार होते. जि.प.अध्यक्ष श्रीराम महाजन, नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख (भोकरदन), राज्य फेडरेशन उपाध्यक्ष प्रभाकर आबा काळे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना आ. अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसच्या इतिहासावर प्रकाश टाकला. पक्षासाठी योगदान व बलिदान देणाऱ्या महापुरुषांच्या जीवनकार्यास त्यांनी उजाळा दिला. देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात काँग्रेसचे मोठे योगदान असून मुख्य भूमिका निभावली आहे. काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य दीन-दलित, अल्पसंख्याक अशा १८ पगड जातींना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. या काँग्रेस पक्षाला संपविण्याच्या कोणी कितीही वल्गना केल्या तरी वल्गना करणारे संपले; मात्र काँग्रेस पक्ष आजही एका मोठ्या वटवृक्षाप्रमाणे ताठ मानेने उभा आहे. यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी वर्धापनदिनानिमत्त पक्षासाठी स्वत:ला वाहून घेतले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काँग्रेस पक्षासाठी भरीव योगदान देणारे दादाभाई नौरोजी, राष्ट्रपिता महात्मा गांधी, पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, जय जवान-जय किसानचे प्रणेते लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, मौलाना अब्दुल कलाम आझाद या महापुरुषांच्या प्रतिमेस श्रीराम महाजन व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.