शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

काँग्रेस-राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली!

By admin | Updated: October 22, 2016 00:31 IST

राजेश भिसे , जालना जालना नगर परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून, २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

राजेश भिसे , जालनाजालना नगर परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून, २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. तर युती आणि आघाडीसाठी बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची जागा वाटपाबाबत शुक्रवारी तब्बल तीन तास बैठक झाली. पाच जागांवरुन मतभेद झाल्याने चर्चा फिस्कटल्याचे सूत्रांनी सांगितले. आघाडीसाठी दोन्ही पक्षांचे बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. तर शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी युतीबाबत ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका घेतल्याचे चित्र आहे.जालना शहरातील वॉर्ड पुनर्रचना करण्यात आली. त्यानुसार ६० वॉर्ड झाले असून, ३० प्रभाग पाडण्यात आले आहेत. प्रत्येक प्रभागात दोन वॉर्ड याप्रमाणे शहराची रचना करण्यात आली आहे.विशेष म्हणजे यंदा पालिकेत पन्नास टक्के महिलांची संख्या राहणार आहे. तसेच नगराध्यक्ष पद हेही सर्वसाधारण महिला वर्गासाठी राखीव होऊन तेही जनतेतून निवडले जाणार असल्याने प्रस्थापितांनी चाचपणी सुरु केली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी उमेदवारी अर्ज विक्री आणि मुलाखतींचा कार्यक्रमही सुरु केला आहे. ‘पॉकेट’ असलेल्या वॉर्डबद्दल राजकीय पक्ष निश्चिंत असले तरी युती आणि आघाडीवरच पुढील राजकीय गणिते सत्तेच्या सारीपाटात महत्त्वाची ठरणार आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची शुक्रवारी आघाडी करुन जागा वाटपाबाबत चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी २० जागांची मागणी केली तर काँग्रेस नेत्यांनी १५ जागांवर सहमती दर्शविल्याचे सूत्रांनी सांगितले. राष्ट्रवादीने दावा केलेल्या पाच जागांवर काँग्रेसचे सिटींग नगरसेवक असल्याने पेच निर्माण झाला. यातून मध्यम मार्ग काढला जाऊ शकतो का यावरही बराच खल झाला. जवळपास ३ तास चर्चा झाली मात्र तोडगा निघू न शकल्याने चर्चा फिस्कटली आणि आघाडीचा निर्णय होऊ शकला नाही. आगामी दोन दिवसांत आघाडीचा निर्णय होईल, असा दावा दोन्ही पक्षांतील ज्येष्ठ नेत्यांनी लोकमतशी बोलताना केला. बैठकीस काँग्रेसतर्फे माजी आ. कैलास गोरंट्याल, विजय चौधरी, राम सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आ. राजेश टोपे, जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, शहराध्यक्ष राजेश राऊत, बबलू चौधरी उपस्थित होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आघाडी करण्यासह जागा वाटपाबाबत बैठक झाली. काही जागांवर मतभेद निर्माण झाले असले तरी ही केवळ चर्चेची पहिलीच फेरी असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्या त्या भागांत काम केले आहे. त्यांनाही न्याय देण्याच्या दृष्टिने आम्हाला भूमिका घ्यावी लागणार आहे. आगामी काही दिवसांत याबाबत सकारात्मक निर्णय होईल या दिशेने वाटाघाटी केल्या जातील. आघाडीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील आहे. पण कार्यकर्त्यांना न्याय देण्यास पक्षाचे प्राधान्य राहील, अशी भूमिका माजी मंत्री तथा आ. राजेश टोपे यांनी लोकमतशी बोलताना मांडली. शकुंतला नगर, लक्ष्मीनारायण पुरा, इन्कमटॅक्स कॉलनी, मोदीखाना आणि पाणीवेस परिसर या वॉर्डांवर राष्ट्रवादीने दावा केला. तर याच वॉर्डांमध्ये सद्यस्थितीत काँग्रेसचे नगरसेवक आहेत. या भागांतून काँगे्रस उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा दावा काँग्रेसतर्फे करण्यात आला. तर याच वॉर्डांतून पाच वर्षे राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी तयारी केली होती. आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते परिस्थिती कशी हातळतात, याकडे राजकीय तज्ज्ञांचे लक्ष लागून आहे.