शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
2
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
3
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
4
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
5
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
6
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
7
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
8
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
9
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
10
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
11
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
12
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
13
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
14
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
15
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
16
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
17
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
18
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
19
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

काँग्रेसची कराड ते दिल्ली ‘स्मरण यात्रा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 01:18 IST

हाराष्ट्रासह देशाच्या विकासात काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने ६० वर्षांत केलेल्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने काँग्रेस पक्षाच्या तरुण पदाधिकाऱ्यांनी कराड ते दिल्ली ‘स्मरण यात्रा’ काढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्ट्रासह देशाच्या विकासात काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने ६० वर्षांत केलेल्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने काँग्रेस पक्षाच्या तरुण पदाधिकाऱ्यांनी कराड ते दिल्ली ‘स्मरण यात्रा’ काढली आहे. या यात्रेची सुरुवात राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील स्मृतिस्थळाला अभिवादन करून रविवारी (दि.८) झाल्याची माहिती आयोजक राजेश मुंडे यांनी दिली.देशाच्या स्वातंत्र्यानंतर काँगे्रस पक्षाने विकास केलाच नसल्याचा आरोप भाजपचे नेते सतत करतात. या आरोपांना उत्तर देण्यासाठी काँग्रेसच्या युवकांनी एकत्र येऊन कराड ते दिल्ली ‘स्मरण यात्रा’चे आयोजन केले आहे. या यात्रेत ज्याठिकाणी भेट देण्यात येईल, त्याठिकाणच्या काँग्रेस पक्षाच्या दिवंगत नेत्याला अभिवादन करून त्यांच्या स्मृतिस्थळावरील मूठभर माती घेण्यात येणार आहे. या अभिनव मोहिमेची सुरुवात महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील स्मृतिस्थळापासून करण्यात आली.या मोहिमेत कराड, वारणा, इस्लामपूर, सांगली, अकलूज, लातूर, नांदेड, गंगाखेड, वसमत, हिंगोली, पुसद, यवतमाळ, पवनार येथील गांधी आश्रम, नागपूर, काटोल, अकोला, बुलडाणा, सोयगाव, औरंगाबाद, वैजापूर, लोणी, संगमनेर, पुणे, मुंबई, नाशिक, धुळे, ग्वाल्हेर, दौसा येथून दिल्लीतील महात्मा गांधी यांची समाधी असलेल्या राजघाट येथे यात्रेचा समारोप २२ जुलै रोजी केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत होणारआहे.या यात्रेत निवडलेल्या ठिकाणी समृद्ध नेतृत्वाने केलेल्या कार्याला, कर्तृत्वाला उजाळा दिला जाणार आहे. यात यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, जवाहरलाल दर्डा, राजारामबापू पाटील, बाळासाहेब विखे पाटील, शंकरराव मोहिते पाटील, भाऊसाहेब थोरात, तात्यासाहेब कोरे, डॉ. रफिक झकेरिया यांच्यासह इतर नेतृत्वांनी महाराष्ट्रासह देश सक्षम केल्याची जाणीव करून देण्यात येणार असल्याचेही राजेश मुंढे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :congressकाँग्रेसdelhiदिल्ली