शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
4
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
5
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
6
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
7
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
8
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
9
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
10
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
11
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
12
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
13
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
14
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
15
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
16
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
17
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
18
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
19
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
20
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."

काँग्रेसची कराड ते दिल्ली ‘स्मरण यात्रा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 01:18 IST

हाराष्ट्रासह देशाच्या विकासात काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने ६० वर्षांत केलेल्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने काँग्रेस पक्षाच्या तरुण पदाधिकाऱ्यांनी कराड ते दिल्ली ‘स्मरण यात्रा’ काढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्ट्रासह देशाच्या विकासात काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने ६० वर्षांत केलेल्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने काँग्रेस पक्षाच्या तरुण पदाधिकाऱ्यांनी कराड ते दिल्ली ‘स्मरण यात्रा’ काढली आहे. या यात्रेची सुरुवात राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील स्मृतिस्थळाला अभिवादन करून रविवारी (दि.८) झाल्याची माहिती आयोजक राजेश मुंडे यांनी दिली.देशाच्या स्वातंत्र्यानंतर काँगे्रस पक्षाने विकास केलाच नसल्याचा आरोप भाजपचे नेते सतत करतात. या आरोपांना उत्तर देण्यासाठी काँग्रेसच्या युवकांनी एकत्र येऊन कराड ते दिल्ली ‘स्मरण यात्रा’चे आयोजन केले आहे. या यात्रेत ज्याठिकाणी भेट देण्यात येईल, त्याठिकाणच्या काँग्रेस पक्षाच्या दिवंगत नेत्याला अभिवादन करून त्यांच्या स्मृतिस्थळावरील मूठभर माती घेण्यात येणार आहे. या अभिनव मोहिमेची सुरुवात महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील स्मृतिस्थळापासून करण्यात आली.या मोहिमेत कराड, वारणा, इस्लामपूर, सांगली, अकलूज, लातूर, नांदेड, गंगाखेड, वसमत, हिंगोली, पुसद, यवतमाळ, पवनार येथील गांधी आश्रम, नागपूर, काटोल, अकोला, बुलडाणा, सोयगाव, औरंगाबाद, वैजापूर, लोणी, संगमनेर, पुणे, मुंबई, नाशिक, धुळे, ग्वाल्हेर, दौसा येथून दिल्लीतील महात्मा गांधी यांची समाधी असलेल्या राजघाट येथे यात्रेचा समारोप २२ जुलै रोजी केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत होणारआहे.या यात्रेत निवडलेल्या ठिकाणी समृद्ध नेतृत्वाने केलेल्या कार्याला, कर्तृत्वाला उजाळा दिला जाणार आहे. यात यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, जवाहरलाल दर्डा, राजारामबापू पाटील, बाळासाहेब विखे पाटील, शंकरराव मोहिते पाटील, भाऊसाहेब थोरात, तात्यासाहेब कोरे, डॉ. रफिक झकेरिया यांच्यासह इतर नेतृत्वांनी महाराष्ट्रासह देश सक्षम केल्याची जाणीव करून देण्यात येणार असल्याचेही राजेश मुंढे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :congressकाँग्रेसdelhiदिल्ली