शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीविरोधात काँग्रेसचा मोर्चा

By admin | Updated: January 6, 2017 23:58 IST

उस्मानाबाद : केंद्र शासनाच्या नोटबंदी निर्णयाच्या निषेधार्थ शुक्रवारी काँग्रेसच्या वतीने आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कचेरीवर मोर्चा काढला.

उस्मानाबाद : केंद्र शासनाच्या नोटबंदी निर्णयाच्या निषेधार्थ शुक्रवारी काँग्रेसच्या वतीने आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कचेरीवर मोर्चा काढला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. प्रवेशद्वारात थांबलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यास मज्जाव केली. त्यामुळे पोलिस आणि मोर्चेकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात प्रवेश न दिल्याने आंदोलकांनी इमारतीवर निवेदन डकविले. मोर्चेकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे काही काळ तणावाचे वातावरण होते.नोटबंदीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे असूनही त्यांना काढता येत नाहीत. शेतीमालाचे दरही प्रचंड कोसळले आहेत. दोन ते तीन रूपये किलो दराने टोमॅटो विकावे लागत आहेत. त्याचेही पैसे दहा ते पंधरा दिवसापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पडत नाहीत. असे असतानाही केंद्र सरकारकडून कुठल्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. एकीकडे कॅशलेसच्या गोष्टी केल्या जात आहेत. परंतु, ग्रामीण भागात यासाठी आवश्यक सुविधा नाहीत. दहा ते पंधरा गावांमध्ये मिळून बँकेची एखाददुसरी शाखा आहे. तेथेही ‘कॅश’चा तुटवडा आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांसह लहान व्यावसायिकांना दोन ते चार हजार रूपयांसाठी बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. एवढे करूनही वेळेत पैसे मिळतील याची शाश्वती नसल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. अर्थव्यवस्थेच्या या सर्व दुरवस्थेला भाजपा सरकारने घेतलेल्या नोटाबंदीचा निर्णय जबाबदार असल्याचा आरोप करीत काँग्रेसच्या वतीने आज जिल्हाभरात आंदोलने केली. दुपारी साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. हा मार्चा जिल्हा कचेरीच्या प्रवेशद्वारात दाखल झाला. यावेळी गेटमध्ये थांबलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांना आतमध्ये प्रवेश करण्यास नकार दिला. त्यावर संतप्त झालेले कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. मोर्चेकऱ्यांची संतप्त भूमिका लक्षात घेऊन त्यांना आतमध्ये प्रवेश दिला. मोर्चेकरी जिल्हाधिकाऱ्यांना घेराओ घालण्यासाठी जात असतानाच त्यांना इमारतीच्या प्रवेशद्वारातच रोखण्यात आले. ‘तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात जाता येणार नाही’, असे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आल्यानंतर मोर्चेकरी अधिक संतप्त झाले. आणि त्यांनी जिल्हा कचेरीच्या आवारातच ठिय्या मांडला. अधिकाऱ्यांनी मोर्चाच्या ठिकाणी येऊन निवेदन स्वीकारावे, अशी त्यांनी भूमिका घेतली. परंतु, ते खाली न आल्याने शेवटी मोर्चेकऱ्यांनी इमारतीला निवेदन डकविले. यानंतरही परिस्थिती सुरळीत झाली नाही तर काँग्रेसच्या वतीने याहीपेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. मोर्चामध्ये काँग्रेसचे पक्ष निरीक्षक तुकाराम रेंगे-पाटील, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष अ‍ॅड. धीरज पाटील, माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, माजी नगराध्यक्ष मधुकर तावडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. उस्मानाबादसोबतच जवळपास सर्वच तालुक्याच्या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. (प्रतिनिधी)