शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला न्यायच मिळत नाही; अमित देशमुख यांचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2022 12:13 IST

एखाद्याची हवा असेलही, पण ती फार काळ टिकणार नाही, हे लक्षात ठेवा.

औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारच्या मित्रपक्षांमध्ये मोठी स्पर्धा आहेच, पण यात काँग्रेसला न्याय मिळत नाही. ठरलेल्या सूत्रांनुसार वाटा मिळत नाही, असा हल्लाबोल सोमवारी येथे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री व औरंगाबाद जिल्ह्याचे काँग्रेसचे संपर्कमंत्री अमित देशमुख यांनी चढवला. जिल्हा काँग्रेसतर्फे आयोजित डिजिटल सदस्य नोंदणीकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी ते चिकलठाणा एमआयडीसीतील सागर रिसोर्टमध्ये बोलत होते. कार्यकर्त्यांना न्याय देण्यात विलंब होतोय याची कबुली देत, पण याचा विसर पडलेला नाही, याची जाणीवही यावेळी त्यांनी करून दिली.

भाजपमध्ये वगैरे जाण्याचा अजिबात हेतू नाही. काँग्रेसलाच गतवैभव प्राप्त करून देऊ, असा शब्द यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी दूध संघाच्या निवडणुकीच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर दिला. सहकार क्षेत्रात पक्षीय राजकारणापेक्षा ‘सहकार’ महत्त्वाचा असतो. त्यामुळे माझ्यापर्यंतही तक्रारी आल्या, पण या निवडणुकीत कल्याण काळे यांनी जे काही केले ते चुकीचं केलं, असं वाटत नाही, अशा शब्दांत अमित देशमुख यांनी काळे यांना क्लीन चिट देताच काळे यांच्या जिंदाबादच्या घोषणा निनादल्या. यावेळी दूध संघाच्या नवनिर्वाचित काँग्रेसच्या संचालकांचा देशमुख यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. काळे हरफन मौला आहेत. काँग्रेसच्या दृष्टीने जिल्हा कमकुवत आहे, पण त्याला काळेच उभारी देऊ शकतील. याबद्दल शंकाकुशंका असतील असं वाटत नाही, असे सांगत व पाठीमागे वळून बघत देशमुख यांनी, यासाठी लाल सोफ्यावर बसलेल्यांमध्येसुद्धा समन्वय हवा, असा टोमणा मारताच सभागृहात हंशा पिकला.

औरंगाबाद जिल्ह्यात काँग्रेस संपल्यागत आहे. तिला ताकद द्या, अशी विनंती यावेळी बोलताना ग्रामीणचे निरीक्षक आमदार शिरीष चौधरी यांनी देशमुख यांना केली. जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके, माजी राज्यमंत्री अनिल पटेल, प्रदेश सेवादलाचे अध्यक्ष विलासबापू औताडे, महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा हेमा पाटील, नामदेव पवार, ॲड. सय्यद अक्रम, डॉ. जितेंद्र देहाडे, खालेद पठाण, रमेश पा. डोणगावकर, किरण पा. डोणगावकर आदींची मंचावर उपस्थिती होती. राहुल सावंत यांनी सूत्रसंचालन केले.

एखाद्याची हवा असेलही, पण ती फार काळ टिकणार नाहीमहाविकास आघाडीचं सरकार येऊन दोन वर्षे झाली, पण औरंगाबाद जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला, असं मला जाणवत नाही असे स्पष्टपणे नमूद करीत देशमुख म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्या संघटनेचे नाव काँग्रेस आहे. आज काँग्रेसचा इतिहास पुसून टाकण्यात येत आहे. एखाद्याची हवा असेलही, पण ती फार काळ टिकणार नाही, हे लक्षात ठेवा. सर्वधर्मसमभावाचा विचार बाजूला पडत आहे. एक विपरीत परिस्थिती निर्माण झाली आहे. उद्याच्या निवडणुका व्हाॅट्सॲप व फेसबुकवरच होतील. सध्या तरी हे माध्यम मोफत आहे. फिडबॅक घेण्याचं हे माध्यम आहे. नव्याने राजकारणात आलेल्यांना यांचा फायदा होईल, असा विश्वास त्यांनी दिला.

टॅग्स :Amit Deshmukhअमित देशमुखcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी