शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

पाण्यासाठी काँग्रेसचा आज मनपावर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 01:05 IST

किराडपुरा, रहेमानिया कॉलनी, शरीफ कॉलनी, बारी कॉलनी, अल्तमश कॉलनी आदी पाच वॉर्डांना तीन दिवसाआड पाणी द्यावे, या मुख्य मागणीसाठी बुधवारी सकाळी काँग्रेसतर्फे मनपावर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : किराडपुरा, रहेमानिया कॉलनी, शरीफ कॉलनी, बारी कॉलनी, अल्तमश कॉलनी आदी पाच वॉर्डांना तीन दिवसाआड पाणी द्यावे, या मुख्य मागणीसाठी बुधवारी सकाळी काँग्रेसतर्फे मनपावर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक इब्राहीमभैया पटेल यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण, धरणे आंदोलन करण्यात येईल.आझाद चौैक ते रोशनगेटपर्यंतच्या पाच वॉर्डांना मागील काही महिन्यांपासून तब्बल सहाव्या आणि सातव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीपुरवठा विभागाला यापूर्वी अनेकदा निवेदने देण्यात आली. तीन दिवसाआड पाणी द्या, या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे आंदोलन करावे लागत असल्याचे पटेल यांनी सांगितले.इब्राहीम पटेल यांनी चार दिवसांपूर्वीच मनपा प्रशासनाला आंदोलानाचे पत्र दिले आहे. सध्या शहरात कचराकोंडी निर्माण झाली आहे. प्रशासन ही कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. या परिस्थितीत पाण्यासाठी आंदोलन करू नये, अशी विनंती मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी एका पत्राद्वारे पटेल यांना केली आहे.आंदोलन होणारच....पाच वॉर्डांमध्ये तब्बल ५० ते ६० हजार नागरिक राहतात. पाण्यासाठी आबालवृद्धांचे मोठे हाल होत आहेत. सत्ताधारीही या प्रश्नाकडे डोळेझाक करीत आहेत. मनपा आयुक्तांचा आम्ही आदर करतो; पण बुधवारचे आंदोलन होणार, असे पटेल म्हणाले.