शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

ऑनलाईन अध्यापनाचा गोंधळ थांबेना; धोरण स्पष्ट न करताच उच्चशिक्षण विभागाने मागवला अहवाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 15:50 IST

वर्क फ्रॉम होममध्ये प्राध्यापकांनी काय करावे? याविषयी निश्चित असे कोणतेही धोरण नसल्यामुळे आॅनलाईन अध्यापन सुरूच झालेले नाही.

ठळक मुद्देमार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून महाविद्यालये बंद २९ जुलै रोजी शासन निर्णयाद्वारे शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला.  

औरंगाबाद  : राज्य शासनाने ८ मे रोजी शासन निर्णयाद्वारे महाविद्यालयांसह शाळांमध्ये आॅनलाईन शिक्षणासंदर्भात विविध मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. यानुसार विद्यापीठ प्रशासनाने १५ जूनपासून प्रक्रिया राबविण्यासाठी तयारी सुरू केली होती. मात्र, याविषयीचे स्पष्ट धोरण अद्यापही जाहीर केले नाही. उलट  शुक्रवारी उच्चशिक्षण विभागाने पत्र पाठवून आॅनलाईन अध्यापन कशा पद्धतीने सुरू आहे, याची आकडेवारी सादर करण्याची सूचना केली. त्यामुळे महाविद्यालयातील आॅनलाईन अध्यापनाच्या गोंधळात वाढ झाल्याचे समोर आले आहे.

कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत अंतिम सत्राच्या परीक्षा घेणे आणि रद्द करण्यावरून राज्य शासन विरुद्ध यूसीजी, असा वाद सर्वोच्च न्यालयालयात रंगला आहे. या वादाचा अद्यापही निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे अनेक अडथळे निर्माण झालेले आहेत. राज्य शासनाने ८ मे रोजी समग्र शासन निर्णयाद्वारे आॅनलाईन शिक्षणासंदर्भात मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. मात्र, कोरोनाचे संकट लांबल्यामुळे अनलॉकच्या काळात शासनाने महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. १ आॅगस्टपासून आॅनलाईन अध्यापन सुरू करण्याची तयारी झालेली असताना २९ जुलै रोजी शासन  निर्णयाद्वारे शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला.  

यानुसार विद्यापीठ प्रशासनाने ३१ जुलै रोजी पत्र काढत महाविद्यालयात प्राध्यापकांनी जाऊन आॅनलाईन किंवा आॅफलाईन अध्यापन करू नये, अशा सूचना केल्या. मात्र, हे करतानाच वर्क फ्रॉम होम आणि प्राचार्यांच्या मागणीनुसार महाविद्यालयात १५ टक्के कर्मचारी, प्राध्यापकांनी उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या. वर्क फ्रॉम होममध्ये प्राध्यापकांनी काय करावे? याविषयी निश्चित असे कोणतेही धोरण नसल्यामुळे आॅनलाईन अध्यापन सुरूच झालेले नाही. यातच सरसकट पुढील वर्गात प्रवेश देण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. मात्र, एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांचे काय करायचे? याविषयी स्पष्टता नाही. बारावीचे निकाल जाहीर झाल्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. काही विषयांचे निकालही जाहीर झाले असून, ३१ आॅगस्टपर्यंत ही प्रवेश प्रक्रियाच चालणार आहे. 

हा सर्व गोंधळ सुरू असतानाच उच्चशिक्षण विभागाने पाच प्रश्न  उपस्थित करून आॅनलाईन अध्यापन सुरू आहे की नाही,  झाले असेल तर कोणत्या माध्यमातून, केव्हापासून, किती विद्यार्थी सहभागी झाले आणि  शैक्षणिक वेळापत्रकाचे नियोजन काय? असे प्रश्न उपिस्थत करून माहिती मागविली आहे. यात ८ मेच्या शासन निर्णयाचा उल्लेख केला आहे. मात्र, त्यानंतरच्या शासन निर्णयाचा उल्लेख नाही. त्यामुळे गोंधळ सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विद्यापीठाने उत्तर तयार केलेउच्चशिक्षण विभागाने उपस्थित केलेल्या पाच प्रश्नांची समर्पक उत्तरे विद्यापीठ प्रशासनाने तयार केली आहेत. याशिवाय आॅनलाईन अध्यापनात एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यादृष्टीने नियोजन करण्यासाठी टास्क फोर्सची नियुक्ती केली होती. या टास्क फोर्सचा अहवाल अंतिम टप्प्यात असल्याची माहिती प्रकुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :onlineऑनलाइनAurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र