शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मोठा दिलासा! बीएस्सी नर्सिंगला बारावीच्या गुणांआधारे प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे खंडपीठाचे आदेश

By प्रभुदास पाटोळे | Updated: November 24, 2022 17:48 IST

राज्यातील उर्वरित ५,१६४ जागांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी राज्य शासनाला औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

औरंगाबाद : भारतीय परिचर्या परिषदेच्या निवेदनानुसार राज्यातील बी.एस्सी. नर्सिंगच्या उर्वरित ५,१६४ जागांसाठी बारावीच्या गुणांआधारेच नव्याने प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. संजय देशमुख यांनी गुरुवारी (दि. २४) राज्य शासनास दिले. राज्य शासनाने ऑनलाइन नोंदणीसाठी ५ दिवसांचा अवधी देऊन प्रवेश प्रक्रिया पार पाडावी, असेही आदेशात म्हटले आहे.

त्यामुळे ‘नीट यूजी’मध्ये ५० पर्सेंटाईलपेक्षा कमी गुणांकन असलेल्या विद्यार्थ्यांनाही १२वीच्या गुणांनुसार या प्रवेश प्रक्रियेत भाग घेता येईल. रितू गायकवाड व प्रतीक्षा पाटील या दोन विद्यार्थिनींनी ॲड. प्रल्हाद बचाटे यांच्यामार्फत व प्रायव्हेट नर्सिंग स्कूल्स अँड काॅलेज मॅनेजमेंट असोसिएशन व असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट अनएडेड नर्सिंग काॅलेजकडून डाॅ. बाळासाहेब पवार, डाॅ. धनंजय कुलकर्णी यांनी ज्येष्ठ विधिज्ञ विनायक होन व ॲड. अश्विन होन यांच्यामार्फत याचिका दाखल केल्या होत्या.

भारतीय परिचर्या परिषदेच्या १५ जुलै २०२१ च्या अद्यादेशानुसार बी.एस्सी. नर्सिंगच्या प्रवेशासाठी १२वीमध्ये ‘पीसीबी’ गटात इंग्रजी विषयासह ४५ टक्के गुण आवश्यक होते किंवा राज्य सरकार अथवा आरोग्य विज्ञान विद्यापीठाने ‘पीसीबी’, इंग्रजी व ‘ॲप्टिट्यूड’ या ५ विषयांची प्रत्येकी २० गुणांची अशी १०० गुणांची परीक्षा घ्यावी. या परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळणारे प्रवेशासाठी पात्र होते.

असे असताना परिचर्या परिषदेने ८ एप्रिल २०२२ रोजी आणखी एक अद्यादेश जारी केला. सर्वसामान्य (जनरल) गटातील विद्यार्थ्यांना ‘५० पर्सेंटाइल’ आणि एससी, एसटी, ओबीसी गटातील विद्यार्थ्यांना ‘४० पर्सेंटाइल’ गुणांकन असेल तरच बी.एस्सी. नर्सिंगला प्रवेश मिळेल, असे त्यात म्हटले होते. त्याआधारे सीईटी सेलने १७ ऑक्टोबर २०२२ रोजी ‘नीट-यूजी’ परीक्षेचे माहिती पत्रक (ब्राउशर) प्रसिद्ध करून बीएस्सी नर्सिंग प्रवेशासाठी वरीलप्रमाणे पात्रता घोषित केली. याचिकाकर्त्यांनी वरील माहिती पत्रक आणि ८ एप्रिलच्या अध्यादेशाला आव्हान दिले होते. ‘पर्सेंटाइल’ची अट लागू करू नये. १२ वीच्या गुणांच्या आधारेच प्रवेश द्यावेत, अशी विनंती केली होती.

खंडपीठाने काल (बुधवारी) केलेल्या विचारणेनुसार ॲड. दीपक मनूरकर यांनी आजच्या सुनावणीदरम्यान भारतीय परिचर्या परिषदेचा १६ जून २०२२ चा अद्यादेश आणि २३ नोव्हेंबर २०२२ चे शुद्धिपत्रक दाखल करून बी.एस्सी. नर्सिंगच्या प्रवेशासाठी १२वीमध्ये ‘पीसीबी’ गटात इंग्रजी विषयासह ४५ टक्के गुण किंवा राज्य सरकार अथवा आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतलेल्या १०० गुणांच्या परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळवणारे प्रवेशासाठी पात्र आहेत, असे निवेदन केले.

उर्वरित ५,१६४ जागांसाठी नवी प्रवेश प्रक्रियाराज्यातील नर्सिंग अभ्यासक्रमाच्या ६,४०० जागांपैकी पहिल्या फेरीत ‘नीट-यूजी’नुसार १,२३६ विद्यार्थांचे प्रवेश झाले आहेत. आता उर्वरित ५,१६४ जागांसाठी नवीन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठEducation Sectorशिक्षण क्षेत्र