शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या राज्यस्तरीय श्रमिक साहित्य संमेलनाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 01:01 IST

आधुनिक भांडवलदारांनी एनजीओच्या नावाखाली नवीन स्वतंत्र व्यवस्था तयार केली आहे. त्यामुळे श्रमिकांनी लिखाण आणि वाचनाची कास धरावी, असे आवाहन प्रख्यात साहित्यिक उत्तम कांबळे यांनी येथे केले.

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना (कॉ.प्रभाकर संझगिरी साहित्य नगरीतून) : श्रमिक आणि कामगार संघटित राहू नये. म्हणून त्यांचे विविध संघटनांमध्ये तुकडे करण्यात आले. व्यवस्थाच तशी तयार करण्यात आली आहे. आता तर आधुनिक भांडवलदारांनी एनजीओच्या नावाखाली नवीन स्वतंत्र व्यवस्था तयार केली आहे. त्यामुळे श्रमिकांनी लिखाण आणि वाचनाची कास धरावी, असे आवाहन प्रख्यात साहित्यिक उत्तम कांबळे यांनी येथे केले.जालन्यात सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या (सीटू) वतीने कॉ. प्रभाकर संझगिरी साहित्य नगरीतील गौरी लंकेश सभागृहात सोमवारी आयोजित पहिल्या राज्यस्तरीय श्रमिक साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. विचारपीठावर विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, शेतमजूर युनियनचे कुमार शिराळकर, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, सीटूचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. डी.एल.कराड, शम्स जालनवी, किशोर घोरपडे स्वागताध्यक्ष साईनाथ पवार, कॉ. अण्णा सावंत यांच्यासह संघटनेचे राज्यातून आलेले पदाधिकारी उपस्थित होते.कांबळे म्हणाले की, गत तीन वर्षांत साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, इतिहास बदलण्याचा प्रयत्न होण्याच्या घटना घडतात. या पार्श्वभूमीवर श्रमिक साहित्य संमेलनाला खूप अर्थ प्राप्त होतो. आतापर्यंत दर सहा महिन्यांनी निषेध सभा, शोकसभा, मूक मोर्चा आदी काढणे सुरु होते. देशातील प्रतिष्ठित अशा जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सोमवारी पुरोगामी विचारांचा झालेला विजय ही समाधानाची बाब मानली पाहिजे. यातून एकच संदेश गेला आहे. तो म्हणजे सर्व पुरोगागी विचारांच्या संघटना व व्यक्तींनी एकत्र आले तरच धर्मांध शक्तींचा बीमोड शक्य आहे. १९९० नंतर भांडवलदारांनी श्रमिकांच्या श्रमावर चालणारी पृथ्वी कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर ‘मायग्रेट’ केली. नवीन भांडवलशाही ही कमीत कमी कामगारांत अधिकाधिक नफा कमावत आहे.रावसाहेब कसबे म्हणाले की, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य वाचल्याशिवाय क्रांती करता येणार नाही. त्यामुळे श्रमिकांनी सर्वप्रथम वाचन वाढविण्याची गरज आहे. आपण का जगतो आहोत, हा प्रश्न श्रमिकांना आणि कामगारांना विचारला पाहिजे.कुमार शिराळकर म्हणाले की, सांस्कृतिक बदलाची जबाबदारी ही आता श्रमिकांवर येऊन ठेपली असून, श्रमिकांकडे माणूस म्हणून पाहण्याची गरज आहे. कार्यक्रमात जालन्यातील प्रसिद्ध शायर शम्स जालन्वी आणि साहित्यिक किशोर घोरपडे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. संमेलनास महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.