शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
2
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
3
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
4
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
5
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
6
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
7
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
8
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
9
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
10
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
11
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
12
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
13
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
14
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
15
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
16
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
17
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
18
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
19
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

अधिक पैसेवारीमुळे सवलती हुकल्या

By admin | Updated: May 8, 2014 00:38 IST

हिंगोली : खरीप हंगामातील जिल्ह्यातील अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक आढळून आल्याने टंचाईसदृश्य गावांना मिळणार्‍या सवलतींना हिंगोली जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मुकावे लागले आहे.

हिंगोली : खरीप हंगामातील जिल्ह्यातील अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक आढळून आल्याने टंचाईसदृश्य गावांना मिळणार्‍या सवलतींना हिंगोली जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मुकावे लागले आहे. सन २०१३-१४ च्या खरीप हंगामातील ५० पैशापेक्षा कमी अंतिम पैसेवारी असलेल्या टंचाई सदृश्य गावांसाठी शासनाने विविध उपाययोजना जाहिर केल्या आहेत. त्यामध्ये जमीन महसूलात सुट देण्यात येणार असून शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगितीही देण्यात आली आहे. या शिवाय वीजबिलात ३३.५ टक्के सुट देण्यात आली असून विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफीही देण्यात आली आहे. रोहयोअंतर्गत कामांच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता आणण्यात आली असून टंचाई जाहीर केलेल्या गावांमधील शेतकर्‍यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित करण्यात येवू नये, असेही या आदेशात म्हटले आहे. या सवलती केवळ ५० पैशांपेक्षा कमी आनेवारी असणार्‍या गावांसाठी आहेत. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील ७०७ पैकी एकही गाव येत नाही. सर्व गावांची अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक आहे. शासनाच्या या आदेशाचा राज्यातील २८ हजार ९९१ गावांना लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातील यामध्ये एकही गाव नाही. (जिल्हा प्रतिनिधी)