शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

तडजोडीच्या राजकारणाचा पुन्हा एकदा प्रत्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 00:09 IST

जिल्ह्याच्या विकासाला आतापर्यंत मारक ठरलेले तडजोडीचे राजकारण पुन्हा एकदा परभणीकरांना मनपातील स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून पहावयास मिळाले असून, निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले पक्षाचे स्थानिक नेते एका विशिष्ट मुद्यावर पक्षीय बंधने बाजूला सारून अप्रत्यक्षरीत्या एकत्र आल्याचे दिसून आले़

अभिमन्यू कांबळे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्याच्या विकासाला आतापर्यंत मारक ठरलेले तडजोडीचे राजकारण पुन्हा एकदा परभणीकरांना मनपातील स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून पहावयास मिळाले असून, निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले पक्षाचे स्थानिक नेते एका विशिष्ट मुद्यावर पक्षीय बंधने बाजूला सारून अप्रत्यक्षरीत्या एकत्र आल्याचे दिसून आले़परभणी महानगरपालिकेत स्वीकृत सदस्याच्या निवडीवरून काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाला आहे़ पक्षश्रेष्ठींनी सूचविलेल्या नावाला स्थानिक नगरसेवक व पदाधिकाºयांनी विरोध दर्शविल्यामुळे मोठे वादंग निर्माण झाले़ शुक्रवारची सर्वसाधारण सभा मनपा आयुक्त उशिरा आल्याचे कारण पुढे करून तहकूब करण्यात आली असली तरी खरे कारण स्वीकृत सदस्यांच्या निवडीचेच असल्याचे स्पष्ट झाले आहे़ पक्षश्रेष्ठींनी सूचविलेल्या नावाला स्थानिक नेत्यांनी जाहीरपणे विरोध न करता पडद्यामागे राजकारण करून विरोध दर्शविला़ काँग्रेसमधील अंतर्गत वाद समजू शकतो़ परंतु, काँग्रेसच्या विरोधात ज्या शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक लढविली़, भ्रष्टाचाराचे आरोप केले़ त्याच काँग्रेस पक्षाच्या मदतीसाठी अप्रत्यक्षरित्या या पक्षांचे सदस्य कसे काय धावून गेले? असा प्रश्न उपस्थित झाला आहे़ राष्ट्रीय व राज्य पातळीवर काँग्रेस व भाजपा एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत़ परंतु, परभणीत मात्र काँग्रेसच्या महापौरांच्या मतदानाच्या वेळी भाजपच्या नगरसेवकांनी समर्थनार्थ हात उंचावल्याची घटना सहा महिन्यांपूर्वी घडलेली आहे़ एरव्ही कारवाईचा बडगा उगारण्याची भाषा करणाºया भाजपाने या प्रकरणात मात्र मूग गिळून गप्प बसण्याची भूमिका घेतली़ आता या पक्षाचे ८ पैकी ६ सदस्य शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेच्या वेळी सभागृहात उपस्थित नव्हते, का नव्हते? याचा जाब या सदस्यांना कोण विचारणार? दुसरीकडे महानगरपालिकेत अनेक दिवसानंतर पहिल्यांदाच विरोधी बाकावर बसलेल्या राष्ट्रवादीचीही अशीच अवस्था पहावयास मिळाली़ शहरातील समस्यांवर काही दिवसांपूर्वी निवेदने देणाºया राष्ट्रवादीला सर्वसाधारण सभेत सत्ताधाºयांना जाब विचारण्याची संधी होती़ परंतु, या संधीचे सोने न करता सभागृहाबाहेर राहून अप्रत्यक्षपणे काँग्रेसला मदत करण्याचीच भूमिका राष्ट्रवादीने घेतली़ या पक्षाचे १८ पैकी फक्त ३ सदस्य सभागृहात होत़े़ आता उरलेले १५ सदस्य सभागृहात का गेले नाहीत, याचा जाब वरिष्ठ मंडळी विचारणार का? असा सवाल उपस्थित होत आहे़अंतर्गत राजकारणाने पोखरलेल्या शिवसेनेतही अशीच अवस्था पहावयास मिळाली़ पक्षाचे ६ पैकी तब्बल ५ नगरसेवक गैरहजर होते़ विशेष म्हणजे, या पक्षाचे गटनेतेच सभागृहात आले नाहीत़ त्यामुळे या गैरहजर सदस्यांविषयी जाब कोण विचारणार? एरव्ही काँग्रेसच्या नावाने शंख फुंकणाºया शिवसेनेने अप्रत्यक्षरित्या काँग्रेसला मदतच केली़ मग, शिवसेना काँग्रेसची विरोधक म्हणायची की समर्थक म्हणायची, असा सवाल उपस्थित झाला आहे़दरम्यान, परभणी जिल्ह्याचे आतापर्यंतचे राजकारण हे तडजोडीचेच राहिलेले आहे़ निवडणुकीत दिवसा एका पक्षाच्या व्यासपीठावरून भाषण झाडलेला नेता रात्रीच्या वेळी दुसºया पक्षातील नेत्याच्या बैठकीत कधी जाऊन बसेल, याचा नेम नाही़ स्वपक्षातील उमेदवाराला पराभूत करून विरोधी पक्षातील उमेदवाराच्या विजयात आनंद मानण्याचे राजकारण परभणी जिल्ह्यात आतापर्यंत चालत आले आहे़ याचा सातत्याने प्रत्यय परभणीकरांना आला आहे़ परिणामी परभणीतील नेत्यांचे मुंबईत वजन राहत नाही़मुंबईतून काही तरी पदरात पाडून घेण्यासाठी पक्षनिष्ठा व वैचारिक बांधिलकी महत्त्वाची असते़ परंतु, नेमके येथेच घोडे पाणी पिते आणि पक्षीय निष्ठा व वैचारिक बांधिलकी बाजूला सारून विरोधाभास निर्माण करणारी भूमिका घेतली जाते़ परिणामी मोठी पदे परभणीकरांच्या हाती पडत नाहीत़ त्यामुळे जिल्ह्याचा विकास होत नाही, हे त्रिकालाबाधीत सत्य आहे़