शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

वैजापूरात कचऱ्यातून कंपोस्ट खतनिर्मितीवर भर; स्वच्छता सर्वेक्षणात मराठवाड्यात पटकावला दुसरा क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 17:47 IST

सर्वेक्षणात शहराने महाराष्ट्रात बारावा, तर मराठवाड्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. 

ठळक मुद्दे350 टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून १०० टन खत तयार केले.32कंपोस्ट खड्डे नगर परिषदेने येवला रस्त्यावर तयार केले आहेत. 

- मोबीन खान 

वैजापूर (जि. औरंगाबाद) : कचऱ्याच्या प्रश्नामुळे स्मार्ट सिटी औरंगाबाद गेल्या वर्षभरापासून चर्चेत असतानाच जिल्ह्यातील वैजापूरने कचरामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. कचऱ्याच्या वर्गीकरणापासून ते कंपोस्ट खत निर्मितीपर्यंत नगरपालिकेने भर दिला आहे. वैजापूरकरांना लागलेल्या स्वच्छतेच्या वेडामुळे स्वच्छता सर्वेक्षणात शहराने महाराष्ट्रात बारावा, तर मराठवाड्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. 

४५ हजार लोकसंख्येच्या या वैजापूर शहरात ११ घंटागाड्या आणि ७७ कामगार कचरा उचलण्याचे काम करतात. लोकसंख्येच्या तुलनेत कामगारांचे प्रमाण कमीच पण, तरीही शहरातून ३.६ मेट्रिक टन कचरा संकलित होतो. यासाठी जीपीएस यंत्रणा लावण्यात आली. ज्यामुळे कचरा संकलनाला मदतच झाली. नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, मुख्याधिकारी विठ्ठल डाके, नगरसेवक व कर्मचाऱ्यांनी प्लास्टिकबंदीची कठोर अंमलबजावणी केली. त्यामुळे शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यात घट झाली. घरातील कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी सातत्याने प्रयत्न केले. याचा परिपाक म्हणून ६ महिन्यांत ५५० टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात नगर परिषद यशस्वी ठरली. 

खतविक्री शहरातील एकूण कचऱ्यापैकी 2.4 टन ओला कचरा कंपोस्ट खतनिर्मितीसाठी वापरला जातो. यासाठी येवला रोडवर 32 खड्डे तयार केलेले आहेत. तसेच पाला-पाचोळ्याचेही कंपोस्ट खत केले जात आहे. याचबरोबर विंड्रो कंपोस्टिंगचाही प्रयोग केला जात आहे. इथे तयार होणाऱ्या खताची विक्री पालिकेने आता सुरू केली आहे. सुक्या कचऱ्यातही काच, प्लास्टिक, लोखंडाच्या वस्तू गोळा करून नेण्याचे काम कचरा वेचक महिलांकडून होते. प्लास्टिक  पिशव्या वेगळ्या करून त्या कंपनीस पाच रुपये प्रतिकिलो दराने विकल्या जात आहेत. 

प्रशासकीय, राजकीय इच्छाशक्तीजिल्ह्याबाहेर फारसे परिचित नसलेले वैजापूर २०१८ मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्वच्छता सर्वेक्षणात देशात २३ व्या स्थानी, तर राज्यात १२ व्या आणि मराठवाड्यातून दुसऱ्या क्रमांकावर आले. शहराच्या विकासासाठी आवश्यक प्रशासकीय आणि राजकीय इच्छाशक्तीने नागरिकांच्या मदतीने वैजापूरला हे यश मिळवून दिले. 

शहरातील कचऱ्यापासून तयार करण्यात आलेल्या कंपोस्ट खताचे मार्केटिंग व प्रत्यक्ष विक्री करण्यासाठी ‘हरित कंपोस्ट खत’ हा ब्रँड वापरण्यास राज्य शासनाने वैजापूर नगर परिषदेस परवानगी दिली आहे. राज्यातील मोजक्या नगरपालिकांना ही परवानगी मिळाली असून त्यात येथील पालिकेचा समावेश आहे. डंपिंगग्राऊं ड हद्दपार करीत मोजक्या मनुष्यबळाच्या जोरावर नगर परिषदेने ‘तीन स्टार’ मिळवत स्वच्छतेत शहराचा ठसा उमटविला आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानAurangabadऔरंगाबाद