शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

वैजापूरात कचऱ्यातून कंपोस्ट खतनिर्मितीवर भर; स्वच्छता सर्वेक्षणात मराठवाड्यात पटकावला दुसरा क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 17:47 IST

सर्वेक्षणात शहराने महाराष्ट्रात बारावा, तर मराठवाड्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. 

ठळक मुद्दे350 टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून १०० टन खत तयार केले.32कंपोस्ट खड्डे नगर परिषदेने येवला रस्त्यावर तयार केले आहेत. 

- मोबीन खान 

वैजापूर (जि. औरंगाबाद) : कचऱ्याच्या प्रश्नामुळे स्मार्ट सिटी औरंगाबाद गेल्या वर्षभरापासून चर्चेत असतानाच जिल्ह्यातील वैजापूरने कचरामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. कचऱ्याच्या वर्गीकरणापासून ते कंपोस्ट खत निर्मितीपर्यंत नगरपालिकेने भर दिला आहे. वैजापूरकरांना लागलेल्या स्वच्छतेच्या वेडामुळे स्वच्छता सर्वेक्षणात शहराने महाराष्ट्रात बारावा, तर मराठवाड्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. 

४५ हजार लोकसंख्येच्या या वैजापूर शहरात ११ घंटागाड्या आणि ७७ कामगार कचरा उचलण्याचे काम करतात. लोकसंख्येच्या तुलनेत कामगारांचे प्रमाण कमीच पण, तरीही शहरातून ३.६ मेट्रिक टन कचरा संकलित होतो. यासाठी जीपीएस यंत्रणा लावण्यात आली. ज्यामुळे कचरा संकलनाला मदतच झाली. नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, मुख्याधिकारी विठ्ठल डाके, नगरसेवक व कर्मचाऱ्यांनी प्लास्टिकबंदीची कठोर अंमलबजावणी केली. त्यामुळे शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यात घट झाली. घरातील कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी सातत्याने प्रयत्न केले. याचा परिपाक म्हणून ६ महिन्यांत ५५० टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात नगर परिषद यशस्वी ठरली. 

खतविक्री शहरातील एकूण कचऱ्यापैकी 2.4 टन ओला कचरा कंपोस्ट खतनिर्मितीसाठी वापरला जातो. यासाठी येवला रोडवर 32 खड्डे तयार केलेले आहेत. तसेच पाला-पाचोळ्याचेही कंपोस्ट खत केले जात आहे. याचबरोबर विंड्रो कंपोस्टिंगचाही प्रयोग केला जात आहे. इथे तयार होणाऱ्या खताची विक्री पालिकेने आता सुरू केली आहे. सुक्या कचऱ्यातही काच, प्लास्टिक, लोखंडाच्या वस्तू गोळा करून नेण्याचे काम कचरा वेचक महिलांकडून होते. प्लास्टिक  पिशव्या वेगळ्या करून त्या कंपनीस पाच रुपये प्रतिकिलो दराने विकल्या जात आहेत. 

प्रशासकीय, राजकीय इच्छाशक्तीजिल्ह्याबाहेर फारसे परिचित नसलेले वैजापूर २०१८ मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्वच्छता सर्वेक्षणात देशात २३ व्या स्थानी, तर राज्यात १२ व्या आणि मराठवाड्यातून दुसऱ्या क्रमांकावर आले. शहराच्या विकासासाठी आवश्यक प्रशासकीय आणि राजकीय इच्छाशक्तीने नागरिकांच्या मदतीने वैजापूरला हे यश मिळवून दिले. 

शहरातील कचऱ्यापासून तयार करण्यात आलेल्या कंपोस्ट खताचे मार्केटिंग व प्रत्यक्ष विक्री करण्यासाठी ‘हरित कंपोस्ट खत’ हा ब्रँड वापरण्यास राज्य शासनाने वैजापूर नगर परिषदेस परवानगी दिली आहे. राज्यातील मोजक्या नगरपालिकांना ही परवानगी मिळाली असून त्यात येथील पालिकेचा समावेश आहे. डंपिंगग्राऊं ड हद्दपार करीत मोजक्या मनुष्यबळाच्या जोरावर नगर परिषदेने ‘तीन स्टार’ मिळवत स्वच्छतेत शहराचा ठसा उमटविला आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानAurangabadऔरंगाबाद