शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कुलगुरू चोपडे यांची चौकशी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:11 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कारभारावर विविध संघटना, लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतले होते.

ठळक मुद्देआरोप : समितीने राज्य सरकारला सादर केला अहवाल

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कारभारावर विविध संघटना, लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतले होते. यावर राज्यपालांच्या परवानगीने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी डॉ. चोपडे यांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी २३ मार्च रोजी शासन निर्णयाद्वारे माजी कुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या तीन सदस्यीय समितीने चौकशी अहवाल २० आॅगस्ट रोजी राज्य सरकारला सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत आ. सतीश चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या विद्यापीठातील अभ्यास मंडळांच्या नेमणुकीच्या घोटाळ्या संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना सर्व तक्रारींच्या चौकशीसाठी माजी कुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती. या समितीमध्ये जळगाव येथील विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बी. बी. पाटील आणि नांदेड येथील विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कथलाकुट्टे यांचा सदस्य म्हणून समावेश होता.

शासन निर्णय निघाल्यानंतर दोन महिन्यांनी पूर्ण समितीचे गठण करण्यात आले होते. या समितीला चौकशीची पत्रे मिळाल्यानंतर अध्यक्षांसह सदस्यांनी अनेक वेळा विद्यापीठात येऊन कागदपत्रांची तपासणी केली. यातच पावसाळी अधिवेशनात हा विषय पुन्हा येण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे समितीने वेगाने काम केले.विद्यापीठ प्रशासनाने अनेक वेळा समितीला सहकार्य न केल्यामुळे चौकशीला उशीर झाल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.२० आॅगस्ट रोजी समितीने चौकशी अहवाल बंद पाकिटामध्ये राज्य सरकारला सादर केला आहे.

यांनी केल्या होत्या तक्रारीविद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कारभाराविरोधात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार सतीश चव्हाण यांच्यासह विद्यापीठातील मागासवर्गीय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष बोरीकर, मराठवाडा कृती समितीचे प्रा. दिगंबर गंगावणे, अ‍ॅड. शिरीष कांबळे, अ‍ॅड. मनोज सरीन, मनसेचे गौतम आमराव, श्रीरंग वारे, बुद्धप्रिय कबीर आदींनी राज्यपाल कार्यालयाकडे तक्रारी केल्या होत्या. या सर्व तक्रारींची शहानिशा समितीने केली आहे.

सत्य अहवाल दिलासमितीने प्रत्येक तक्रारीची शहानिशा केली. त्यात आढळलेल्या त्रुटींचा अहवालात समावेश केला आहे.यात सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे अभ्यास मंडळावरील नेमणुकांमध्ये अधिक गडबड झालेली असल्याचे समजते. काही खरेदींच्या प्रकरणातही ताशेरे ओढल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र