शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससी मार्फतच घ्याव्यात स्पर्धा परीक्षा; छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांचा एल्गार

By विजय सरवदे | Updated: January 16, 2024 17:49 IST

विद्यार्थी कृती समितीच्या वतीने स्पर्धा परीक्षांत होणाऱ्या पेपर फुटी प्रकरणाच्या विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर : तलाठी भरतीसह वेगवेगळ्या नोकर भरती परीक्षा तसेच बार्टी, सारथी आणि महाज्योती फेलोशिप पात्रता परीक्षांत पेपर फुटी प्रकरणांमुळे दहा-दहा तास अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय झाले आहेे. त्या प्रकरणाची चौकशी ‘एसआयटी’मार्फत करावी व यापुढे सर्व स्पर्धा परीक्षा खाजगी संस्थांऐवजी ‘एमपीएससी’च्या मार्फतच घ्याव्यात, असा एल्गार संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारी क्रांतीचौकात पुकारला.

विद्यार्थी कृती समितीच्या वतीने स्पर्धा परीक्षांत होणाऱ्या पेपर फुटी प्रकरणाच्या विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात स्पर्धा परीक्षांची तसेच बार्टी, सारथी आणि महाज्योती फेलोशिप पात्रता परीक्षांची तयारी करणारे हजारो विद्यार्थी सकाळी साडेअकरा वाजेपासून जमा झाले. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या संतप्त भावना मांडल्या. तलाठी स्पर्धा परीक्षा पेपर फुटी प्रकरणाची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करुन शासनाने दोषींना स्पर्धा परीक्षा प्रक्रियेतून आजन्म हद्दपार करावे, असा सूर या आंदोलनात निघाला. ग्रामीण भागातील गरीब शेतकरी, शेतमजुरांची मुलं स्पर्धा परीक्षेची दहा- दहा तास अभ्यास करीत आहेत. मात्र, ऐन परीक्षांमध्ये काही मंडळी पेपर फोडतात. पैसे घेऊन नोकरी लावण्याचे आमिष दाखवतात, याचा शासनाने शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करावी. मागील पाच- सात वर्षांपासून नोकरीच्या अपेक्षेत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा परीक्षांतील घोटाळ्यामुळे भ्रनिराश होत आहे. अनेकांचे आई- वडिला आपल्या मुलाच्या भवितव्याकडे आस लावून बसले आहेत, त्यांना न्याय मिळण्यासाठी परीक्षा घोटाळे करणाऱ्या समाजकंटकांविरूद्ध शासनाने कठोर पाऊले उचलावीत, दरवर्षी भरती प्रक्रिया राबवावी, फेलोशिपचा पेपर का व कोणी फोडला, याचे स्पष्टीकरण शासनाने द्यावे, अशा भावना विद्यार्थी नेते प्रकाश उजगरे, राहुल मकासरे, सिद्धार्थ पानबुडे, सचिन वाघमारे, धम्मा मिसाळ, चंचल जगताप, दीपाली पाटील, किरण अंभोरे, आदींनी मांडली.

यावेळी प्रा. विठ्ठल कांगणे व बाळासाहेब शिंदे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी तलाठी पेपर फुटी प्रकरणाची चौकशी ‘एसआयटी’मार्फत चौकशी करावी, ही परीक्षा ‘एमपीएससी’द्वारे घेऊन महिनाभराच्या आत निकाल जाहीर करावा व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMPSC examएमपीएससी परीक्षाEducationशिक्षण