शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

एमपीएससी मार्फतच घ्याव्यात स्पर्धा परीक्षा; छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांचा एल्गार

By विजय सरवदे | Updated: January 16, 2024 17:49 IST

विद्यार्थी कृती समितीच्या वतीने स्पर्धा परीक्षांत होणाऱ्या पेपर फुटी प्रकरणाच्या विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर : तलाठी भरतीसह वेगवेगळ्या नोकर भरती परीक्षा तसेच बार्टी, सारथी आणि महाज्योती फेलोशिप पात्रता परीक्षांत पेपर फुटी प्रकरणांमुळे दहा-दहा तास अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय झाले आहेे. त्या प्रकरणाची चौकशी ‘एसआयटी’मार्फत करावी व यापुढे सर्व स्पर्धा परीक्षा खाजगी संस्थांऐवजी ‘एमपीएससी’च्या मार्फतच घ्याव्यात, असा एल्गार संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारी क्रांतीचौकात पुकारला.

विद्यार्थी कृती समितीच्या वतीने स्पर्धा परीक्षांत होणाऱ्या पेपर फुटी प्रकरणाच्या विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात स्पर्धा परीक्षांची तसेच बार्टी, सारथी आणि महाज्योती फेलोशिप पात्रता परीक्षांची तयारी करणारे हजारो विद्यार्थी सकाळी साडेअकरा वाजेपासून जमा झाले. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या संतप्त भावना मांडल्या. तलाठी स्पर्धा परीक्षा पेपर फुटी प्रकरणाची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करुन शासनाने दोषींना स्पर्धा परीक्षा प्रक्रियेतून आजन्म हद्दपार करावे, असा सूर या आंदोलनात निघाला. ग्रामीण भागातील गरीब शेतकरी, शेतमजुरांची मुलं स्पर्धा परीक्षेची दहा- दहा तास अभ्यास करीत आहेत. मात्र, ऐन परीक्षांमध्ये काही मंडळी पेपर फोडतात. पैसे घेऊन नोकरी लावण्याचे आमिष दाखवतात, याचा शासनाने शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करावी. मागील पाच- सात वर्षांपासून नोकरीच्या अपेक्षेत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा परीक्षांतील घोटाळ्यामुळे भ्रनिराश होत आहे. अनेकांचे आई- वडिला आपल्या मुलाच्या भवितव्याकडे आस लावून बसले आहेत, त्यांना न्याय मिळण्यासाठी परीक्षा घोटाळे करणाऱ्या समाजकंटकांविरूद्ध शासनाने कठोर पाऊले उचलावीत, दरवर्षी भरती प्रक्रिया राबवावी, फेलोशिपचा पेपर का व कोणी फोडला, याचे स्पष्टीकरण शासनाने द्यावे, अशा भावना विद्यार्थी नेते प्रकाश उजगरे, राहुल मकासरे, सिद्धार्थ पानबुडे, सचिन वाघमारे, धम्मा मिसाळ, चंचल जगताप, दीपाली पाटील, किरण अंभोरे, आदींनी मांडली.

यावेळी प्रा. विठ्ठल कांगणे व बाळासाहेब शिंदे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी तलाठी पेपर फुटी प्रकरणाची चौकशी ‘एसआयटी’मार्फत चौकशी करावी, ही परीक्षा ‘एमपीएससी’द्वारे घेऊन महिनाभराच्या आत निकाल जाहीर करावा व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMPSC examएमपीएससी परीक्षाEducationशिक्षण