शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीला सक्षम पर्याय उभा राहावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 18:26 IST

राज्यातील बाजारपेठ ३ लाख कोटींची

ठळक मुद्देअर्थचक्र कोलमडण्याची भीती सर्व कृउबात एकाच वेळी राबवा ई-नाम योजना 

औरंगाबाद : राज्यात आजघडीला ३०६ कृषी उत्पन्न बाजार समित्या, तर ६०९ उपबाजार समित्या कार्यरत आहेत. येथे येणाऱ्या शेतीमालाची एकूण वार्षिक उलाढाल सुमारे ३ लाख कोटींपेक्षा अधिक आहे. या बाजार समित्या एकदम बरखास्त केल्या, तर संपूर्ण कृषीचे अर्थचक्र कोलमडेल. यासाठी या कृउबांना सक्षम असा पर्याय निर्माण करणे आवश्यक आहे, तसेच या बाजार समित्यांची कोट्यवधीची मालमत्ता, कर्मचाऱ्यांचे काय, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होतील. 

शेतकऱ्यांना शेतीमालाचा योग्य भाव मिळावा, शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्या अस्तित्वात आल्या. मात्र, शेतकऱ्यांचे भले होण्याऐवजी व्यापाऱ्यांच्या हितासाठीच कृउबा प्रशासन काम करू लागले. कृउबात राजकीय अड्डे निर्माण झाले आणि भ्रष्टाचाराचे केंद्र बनले, असा आरोप वर्षानुवर्षांपासून केला जात आहे. खरेदीदारांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी, त्यातून शेतीमालास जास्तीत जास्त भाव मिळावा, व्यवहारात पारदर्शकता यावी आणि विक्री केलेल्या शेतमालाची रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा व्हावी, अशा चांगल्या हेतूने केंद्र सरकारने ई-नाम (इलेक्ट्रॉनिक नॅशनल अ‍ॅग्रिकल्चर मार्केट)ची घोषणा केली. महाराष्ट्रात पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात मिळून ६० बाजार समित्यांमध्ये २०१७-२०१८ दरम्यान ई-नाम लागू करण्यात आले. मात्र, ‘ई-नाम’ राबविताना प्रत्यक्षात अनेक अडचणी येत असल्याने बहुतांश कृउबामध्ये नावापुरतेच ई-नामची अंमलबजावणी होत आहे. असे असतानाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी राज्य शासनांना म्हटले आहे की, सर्व बाजार समित्या बंद करून फक्त ‘ई-नाम’ व्यवहार पद्धतीचा वापर करावा. यामुळे कृषी क्षेत्रात विशेषत: बाजार समित्यांमध्ये एकच खळबळ माजली आहे आणि अर्थमंत्र्यांच्या सूचनेच्या विरोधात सूरही निघू लागला आहे.

कारण, ‘ई-नाम’ची अंमलबजावणी करण्यात बाजार समित्यांना अनंत अडचणी येत आहेत. इंटरनेटपासून ते बँक कमिशनपर्यंत एक ना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ई-नाम प्रकल्पात शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यास थेट त्याच्या बँक खात्यात माल जमा होतो; पण त्या शेतकऱ्याला हातात रोख रक्कम त्वरित मिळत नाही. यामुळे ज्या बाजार समितीमध्ये ‘ई-नाम’ नाही तिथे शेतकरी शेतमाल विकत आहेत. यामुळे ज्या बाजार समित्यांमध्ये ई-नाम सुरू आहे, तेथील उलाढालीवर मोेठा परिणाम झाला आहे. 

जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार मे-२०१८ मध्ये ‘ई-नाम’ची अंमलबजावणी सुरू झाली. मागील वर्षभरात याद्वारे १,०२४ शेतकऱ्यांकडून शेतीमाल खरेदी करण्यात आला व २९ लाख ३० हजार २२२ रुपयांचे ई-पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. मात्र, त्वरित रोख रक्कम मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी फुलंब्री, सिल्लोड, लासूर स्टेशन, जालना आदी आसपासच्या कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये शेतमाल विक्री केला. यात जाधववाडीतील कृउबातील वार्षिक उलाढाल १ लाख ७ हजार १५४ क्विंटलने घटली. याचा फटका बाजार समितीला व येथील व्यापाऱ्यांना बसला. अन्य बाजार समित्या नसत्या, तर शेतकऱ्यांनी त्यांचा माल कुठे विकला असता, असा प्रश्नही कृउबाच्या संचालकांनी उपस्थित केला आहे. शेतीमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांसमोर दुसरा मोठा पर्याय नाही.

आजही ९० टक्के शेतीमाल हा बाजार समितीमध्येच विकला जातो. यामुळे पहिले पर्यायी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे, तसेच बाजार समित्या बरखास्त केल्यास संपूर्ण शेतीचे अर्थचक्रच कोलमडेल. मोठे व्यापारी शेतमाल खरेदी करून नंतर गायब झाले, तर त्यांच्या व्यवहाराची हमी कोण घेणार. ‘ई-नाम’मध्ये येणाऱ्या अनेक अडचणींमुळे शेतकऱ्यांना जर या प्रणालीत माल विकायचा नसेल तर मोठ्या व्यापाऱ्यांशिवाय पर्याय उरणार नाही. शेतकरी कवडीमोल भावात शेतीमाल खरेदी करतील, अशीही भीती व्यक्त केली जात आहे. 

कृउबा बंद करणे अव्यवहार्यबाजार समितींतर्गत शेतमालाचे व्यवहार झाले व कोणी व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचे पैसे देण्यास नकार दिला, तर कृउबा समिती त्या संबंधित व्यापाऱ्यावर कारवाई करून शेतकऱ्यांचे पैसे वसूल करुन देऊ शकते. तशा घटना घडल्याही आहेत. बाजार समितीने त्या व्यापाऱ्यांची मालमत्ता विकून शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत. जाधववाडीत ‘ई-नाम’ योजना राबविली; पण वर्षभरात १ लाख ७ हजार १५४ क्विंटलने आवक घटली. याचा फटका कृउबाला बसला व शेतकऱ्यांनाही दुसऱ्या तालुक्यात किंवा परजिल्ह्यात जाऊन शेतीमाल विक्री करावा लागला. अतिरिक्त गाडीभाड्याचा फटका त्यांना बसला. उत्पादित होणारा ९० टक्के शेतमाल कृउबात विक्री होतो, यामुळे कृउबा बंद करणे अव्यवहार्य ठरले.  - राधाकिसन पठाडे,  सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती

कृउबाच्या ६,८७७ कर्मचाऱ्यांचे काय राज्यात ३०६ बाजार समिती व ६०९ उपबाजार समिती आहेत. त्यांची कोट्यवधीची मालमत्ता आहे. जर कृउबा बंद केल्या तर या मालमत्तेचे करायचे काय, तसेच सर्व कृउबा समित्यांमध्ये मिळून ६,८७७ कर्मचारी काम करतात, त्यांचे पुढे काय होणार. त्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करावे. ही आमची जुनी मागणी आहे. - पुरुषोत्तम खंडागळे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र बाजार समिती कर्मचारी                                     संघटना उपोषणकृती समिती

...तर शेतकऱ्यांना लुटण्याचा परवानाच व्यापाऱ्यांना मिळेलशेतमालाचा हमीभाव शेतकऱ्यांना मिळायला हवा. तो त्यांचा कायदेशीर हक्क आहे. त्यासाठी सरकार उपाययोजना करीत नाही आणि असलेली व्यवस्थाही काढून घेत आहे. त्यामुळे ९५ टक्के शेतकऱ्यांची लुबाडणूक होईल. बाजार समित्या अधिक सक्षम करायला हव्यात. हमीभावापेक्षा भाव पडल्यास संघाने हस्तक्षेप करणे अभिप्रेत आहे. मात्र, आज  हे खरेदी विक्री-संघच लुळे-पांगळे करून ठेवले आहेत. हा खाजगीकरणाचा  परिणाम आहे.  कृउबा बरखास्त केल्या, तर मोठ्या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना लुटण्याचा परवानाच मिळेल.  - सुभाष लोमटे, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ 

टॅग्स :market yardमार्केट यार्डAurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्र