शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

औरंगाबाद शहरातील संपूर्ण कचरा उचलण्यासाठी कंपनी नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 11:36 IST

शहरातील प्रत्येक मालमत्ताधारकांकडून कचरा जमा करण्यासाठी महापालिकेने बंगळुरू येथील कंपनी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देमहिना अडीच कोटी खर्च : प्रत्येक घरातून कचरा जमा करणार

औरंगाबाद : शहरातील प्रत्येक मालमत्ताधारकांकडून कचरा जमा करण्यासाठी महापालिकेने बंगळुरू येथील कंपनी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. एक टन कचरा उचलण्यासाठी १८७२ रुपये खर्च घेण्याचे कंपनीने महापालिकेला निविदा प्रक्रियेद्वारे कळविले आहे. वाटाघाटीत दर आणखी कमी होणार असले तरी मनपाला दरमहा या उपक्रमातून तब्बल अडीच कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. बंगळुरू येथील कंपनीच्या कागदपत्रांची छाननी सुरू असून, लवकरच निविदा अंतिम करण्यात येणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.

शहरात दररोज ४५० मेट्रिक टन कचरा जमा होतो. हा कचरा उचलण्यासाठी महापालिकेला दरवर्षी तब्बल ६५ ते ७० कोटी रुपये खर्च येत आहे. कचरा उचलण्यासाठी महापालिकेने ८० टक्के वाहने भाडेतत्त्वावर लावली आहेत. त्यामुळे अवाढव्य खर्च होत आहे. मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी खर्च कमी करण्याच्या दृष्टीने शहरातील संपूर्ण कचरा उचलणे, नागरिकांकडून जमा करणे यासाठी खाजगी कंपनी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. तीन महिन्यांपासून निविदा प्रक्रिया सुरू होती. तिसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध केल्यानंतर तीन कंपन्यांनी काम करण्याची इच्छाशक्ती दाखविली. त्यातील दोन कंपन्यांच्या निविदा उघडण्यात आल्या. बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीने सर्वात कमी दर भरले आहेत. १८७२ रुपयांमध्ये एक टन कचरा जमा करणे, प्रक्रिया केंद्रापर्यंत तो नेऊन पोहोचण्याची तयारी दर्शविली आहे. या दरानुसार कंपनीला ४५० मेट्रिक टन कचरा उचलण्यासाठी दररोज ८ लाख ४२ हजार रुपये मिळतील. महिना अडीच कोटी रुपये कंपनीला द्यावे लागणार आहेत. या उपक्रमामुळे महापालिकेचा ताण बराच कमी होणार आहे.

दररोज एक रुपया घेणारबंगळुरू येथील कंपनी दररोज शहरातील प्रत्येक मालमत्ताधारकांकडून कचरा जमा करणार आहे. नागरिकांनी कंपनीस दररोज एक रुपया द्यावा लागणार आहे. इंदूर महापालिका २ रुपये नागरिकांकडून जमा करीत आहे. एका मालमत्ताधारकाला महिना ३० रुपये द्यावे लागतील. या माध्यमातून महापालिकेला किमान १० कोटी रुपये वर्षाला मिळतील, अशी अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.

हर्सूल येथे १५० मेट्रिक टनाचा प्रकल्पहर्सूल येथे कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र निविदा प्रसिद्ध केली आहे. या निविदा प्रक्रियेत कचºयावर कोणत्या तंत्रज्ञानाने प्रक्रिया करायची हे कंत्राटदारानेच ठरवावे, अशी मुभा देण्यात आली आहे. या निविदेलाही प्रतिसाद न मिळाल्याने तिसºयांदा पुनर्निविदा काढण्यात आली आहे.

सीएनजी गॅससाठी पुनर्निविदाकांचनवाडी येथे सीएनजी गॅस प्रकल्प उभारण्यासाठी मनपाने निविदा प्रसिद्ध केली होती. ४ सप्टेंबरपर्यंत एकाही कंपनीने निविदा भरली नाही. मनपाने दुस-यांदा निविदा प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.

छोट्या मशीन लवकरच सुरू होणाररमानगर, पडेगाव, चिकलठाणा येथे १६ मेट्रिक टन क्षमतेच्या मशीन बसविण्याचे काम सुरू आहे. आठ दिवसांत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर लगेचच कचºयावर प्रक्रिया करण्याचे कामही सुरू होईल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्न