शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद शहरातील संपूर्ण कचरा उचलण्यासाठी कंपनी नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 11:36 IST

शहरातील प्रत्येक मालमत्ताधारकांकडून कचरा जमा करण्यासाठी महापालिकेने बंगळुरू येथील कंपनी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देमहिना अडीच कोटी खर्च : प्रत्येक घरातून कचरा जमा करणार

औरंगाबाद : शहरातील प्रत्येक मालमत्ताधारकांकडून कचरा जमा करण्यासाठी महापालिकेने बंगळुरू येथील कंपनी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. एक टन कचरा उचलण्यासाठी १८७२ रुपये खर्च घेण्याचे कंपनीने महापालिकेला निविदा प्रक्रियेद्वारे कळविले आहे. वाटाघाटीत दर आणखी कमी होणार असले तरी मनपाला दरमहा या उपक्रमातून तब्बल अडीच कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. बंगळुरू येथील कंपनीच्या कागदपत्रांची छाननी सुरू असून, लवकरच निविदा अंतिम करण्यात येणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.

शहरात दररोज ४५० मेट्रिक टन कचरा जमा होतो. हा कचरा उचलण्यासाठी महापालिकेला दरवर्षी तब्बल ६५ ते ७० कोटी रुपये खर्च येत आहे. कचरा उचलण्यासाठी महापालिकेने ८० टक्के वाहने भाडेतत्त्वावर लावली आहेत. त्यामुळे अवाढव्य खर्च होत आहे. मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी खर्च कमी करण्याच्या दृष्टीने शहरातील संपूर्ण कचरा उचलणे, नागरिकांकडून जमा करणे यासाठी खाजगी कंपनी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. तीन महिन्यांपासून निविदा प्रक्रिया सुरू होती. तिसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध केल्यानंतर तीन कंपन्यांनी काम करण्याची इच्छाशक्ती दाखविली. त्यातील दोन कंपन्यांच्या निविदा उघडण्यात आल्या. बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीने सर्वात कमी दर भरले आहेत. १८७२ रुपयांमध्ये एक टन कचरा जमा करणे, प्रक्रिया केंद्रापर्यंत तो नेऊन पोहोचण्याची तयारी दर्शविली आहे. या दरानुसार कंपनीला ४५० मेट्रिक टन कचरा उचलण्यासाठी दररोज ८ लाख ४२ हजार रुपये मिळतील. महिना अडीच कोटी रुपये कंपनीला द्यावे लागणार आहेत. या उपक्रमामुळे महापालिकेचा ताण बराच कमी होणार आहे.

दररोज एक रुपया घेणारबंगळुरू येथील कंपनी दररोज शहरातील प्रत्येक मालमत्ताधारकांकडून कचरा जमा करणार आहे. नागरिकांनी कंपनीस दररोज एक रुपया द्यावा लागणार आहे. इंदूर महापालिका २ रुपये नागरिकांकडून जमा करीत आहे. एका मालमत्ताधारकाला महिना ३० रुपये द्यावे लागतील. या माध्यमातून महापालिकेला किमान १० कोटी रुपये वर्षाला मिळतील, अशी अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.

हर्सूल येथे १५० मेट्रिक टनाचा प्रकल्पहर्सूल येथे कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र निविदा प्रसिद्ध केली आहे. या निविदा प्रक्रियेत कचºयावर कोणत्या तंत्रज्ञानाने प्रक्रिया करायची हे कंत्राटदारानेच ठरवावे, अशी मुभा देण्यात आली आहे. या निविदेलाही प्रतिसाद न मिळाल्याने तिसºयांदा पुनर्निविदा काढण्यात आली आहे.

सीएनजी गॅससाठी पुनर्निविदाकांचनवाडी येथे सीएनजी गॅस प्रकल्प उभारण्यासाठी मनपाने निविदा प्रसिद्ध केली होती. ४ सप्टेंबरपर्यंत एकाही कंपनीने निविदा भरली नाही. मनपाने दुस-यांदा निविदा प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.

छोट्या मशीन लवकरच सुरू होणाररमानगर, पडेगाव, चिकलठाणा येथे १६ मेट्रिक टन क्षमतेच्या मशीन बसविण्याचे काम सुरू आहे. आठ दिवसांत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर लगेचच कचºयावर प्रक्रिया करण्याचे कामही सुरू होईल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्न