शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

औरंगाबाद शहरातील संपूर्ण कचरा उचलण्यासाठी कंपनी नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 11:36 IST

शहरातील प्रत्येक मालमत्ताधारकांकडून कचरा जमा करण्यासाठी महापालिकेने बंगळुरू येथील कंपनी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देमहिना अडीच कोटी खर्च : प्रत्येक घरातून कचरा जमा करणार

औरंगाबाद : शहरातील प्रत्येक मालमत्ताधारकांकडून कचरा जमा करण्यासाठी महापालिकेने बंगळुरू येथील कंपनी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. एक टन कचरा उचलण्यासाठी १८७२ रुपये खर्च घेण्याचे कंपनीने महापालिकेला निविदा प्रक्रियेद्वारे कळविले आहे. वाटाघाटीत दर आणखी कमी होणार असले तरी मनपाला दरमहा या उपक्रमातून तब्बल अडीच कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. बंगळुरू येथील कंपनीच्या कागदपत्रांची छाननी सुरू असून, लवकरच निविदा अंतिम करण्यात येणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.

शहरात दररोज ४५० मेट्रिक टन कचरा जमा होतो. हा कचरा उचलण्यासाठी महापालिकेला दरवर्षी तब्बल ६५ ते ७० कोटी रुपये खर्च येत आहे. कचरा उचलण्यासाठी महापालिकेने ८० टक्के वाहने भाडेतत्त्वावर लावली आहेत. त्यामुळे अवाढव्य खर्च होत आहे. मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी खर्च कमी करण्याच्या दृष्टीने शहरातील संपूर्ण कचरा उचलणे, नागरिकांकडून जमा करणे यासाठी खाजगी कंपनी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. तीन महिन्यांपासून निविदा प्रक्रिया सुरू होती. तिसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध केल्यानंतर तीन कंपन्यांनी काम करण्याची इच्छाशक्ती दाखविली. त्यातील दोन कंपन्यांच्या निविदा उघडण्यात आल्या. बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीने सर्वात कमी दर भरले आहेत. १८७२ रुपयांमध्ये एक टन कचरा जमा करणे, प्रक्रिया केंद्रापर्यंत तो नेऊन पोहोचण्याची तयारी दर्शविली आहे. या दरानुसार कंपनीला ४५० मेट्रिक टन कचरा उचलण्यासाठी दररोज ८ लाख ४२ हजार रुपये मिळतील. महिना अडीच कोटी रुपये कंपनीला द्यावे लागणार आहेत. या उपक्रमामुळे महापालिकेचा ताण बराच कमी होणार आहे.

दररोज एक रुपया घेणारबंगळुरू येथील कंपनी दररोज शहरातील प्रत्येक मालमत्ताधारकांकडून कचरा जमा करणार आहे. नागरिकांनी कंपनीस दररोज एक रुपया द्यावा लागणार आहे. इंदूर महापालिका २ रुपये नागरिकांकडून जमा करीत आहे. एका मालमत्ताधारकाला महिना ३० रुपये द्यावे लागतील. या माध्यमातून महापालिकेला किमान १० कोटी रुपये वर्षाला मिळतील, अशी अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.

हर्सूल येथे १५० मेट्रिक टनाचा प्रकल्पहर्सूल येथे कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र निविदा प्रसिद्ध केली आहे. या निविदा प्रक्रियेत कचºयावर कोणत्या तंत्रज्ञानाने प्रक्रिया करायची हे कंत्राटदारानेच ठरवावे, अशी मुभा देण्यात आली आहे. या निविदेलाही प्रतिसाद न मिळाल्याने तिसºयांदा पुनर्निविदा काढण्यात आली आहे.

सीएनजी गॅससाठी पुनर्निविदाकांचनवाडी येथे सीएनजी गॅस प्रकल्प उभारण्यासाठी मनपाने निविदा प्रसिद्ध केली होती. ४ सप्टेंबरपर्यंत एकाही कंपनीने निविदा भरली नाही. मनपाने दुस-यांदा निविदा प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.

छोट्या मशीन लवकरच सुरू होणाररमानगर, पडेगाव, चिकलठाणा येथे १६ मेट्रिक टन क्षमतेच्या मशीन बसविण्याचे काम सुरू आहे. आठ दिवसांत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर लगेचच कचºयावर प्रक्रिया करण्याचे कामही सुरू होईल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्न