शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

समारंभांमध्ये थर्माकोल पत्रावळींचा सर्रास वापर; शासनाच्या आदेशाला ‘खो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 20:09 IST

शहरात शासनाच्या आदेशाला ‘खो’ दिला जात असून, विविध समारंभांमध्ये थर्माकोल पत्रावळींचा (प्लेट) आणि २०० मिलिपर्यंतच्या बाटल्यांचा सर्रास वापर होत आहे.

ठळक मुद्देराज्यात २३ जूनपासून प्लास्टिक बंदी लागू झाली आहे. शासनाने लावलेली प्लास्टिक बंदी केवळ कागदावरच असल्याचे दिसते.

औरंगाबाद : शहरात शासनाच्या आदेशाला ‘खो’ दिला जात असून, विविध समारंभांमध्ये थर्माकोल पत्रावळींचा (प्लेट) आणि २०० मिलिपर्यंतच्या बाटल्यांचा सर्रास वापर होत आहे. त्यामुळे शासनाने लावलेली बंदी केवळ कागदावरच असल्याचे दिसते.

राज्यात २३ जूनपासून प्लास्टिक बंदी लागू झाली आहे. प्लास्टिकच्या पिशव्या, चहाचे कप, ग्लास, चमचे, थर्माकोल ग्लास, पत्रावळी आदींवर बंदी आली आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील प्लास्टिक कप, पत्रावळी, ग्लास,  कॅरिबॅग, शॉपिंग बॅग आदींची निर्मिती करणाऱ्या छोटे-मोठ्या उद्योगांकडून सध्या उत्पादन बंद असल्याचे सांगण्यात येते. बाजारपेठेतही बंदी असलेल्या साहित्यांची विक्री होत नसल्याचे सांगण्यात येते. एखाद्याने बंदी असलेल्या साहित्यांची मागणी केल्यानंतर विक्रेत्यांकडून नकार दिला जात आहे. तरीही समारंभांमध्ये थर्माकोल पत्रावळींचा बोलबाला दिसत आहे.

२०० मिलिपर्यंतच्या बाटलीबंद पाणी विक्रीवर बंधने आणली आहेत. त्यामुळे २०० ऐवजी २५०, ३०० आणि ५०० मिलिपर्यंतच्या बाटल्यांच्या निर्मितीला प्राधान्य दिले जात आहे. विविध कार्यक्रमांमध्ये २०० मिलिपर्यंतच्या बाटलीबंद पाण्याचा वापर होताना दिसतो. समारंभांप्रसंगी पर्यावरणाला अत्यंत घातक ठरणाऱ्या थर्माकोलच्या पत्रावळीचा सध्या बिनधास्त वापर सुरू आहे. स्टीलच्या प्लेटस्, वाट्या, ग्लास वापरले तर त्यांना स्वच्छ करण्याचा त्रास, या सर्व गोष्टींपासून सुटका मिळावी या सबबीखाली या पत्रावळींचा वापर सुरूच आहे.

थर्माकोलच्या पत्रावळी फेकून देण्यात आल्यानंतर त्यामध्ये उरलेले अन्न जनावरेदेखील खातात. अशावेळी पत्रावळीही जनावरांच्या पोटात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पर्यावरणासह जनावरांच्या जिवालाही हे धोकादायक ठरत आहे.  शहरात आधीच कचऱ्याने राक्षसी रूप धारण केले आहे. बंदीनंतरही थर्माकोलच्या पत्रावळींचा वापर सुरूच आहे. परिणामी पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. त्यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. समारंभ, अन्य कार्यक्रमांदरम्यान वापरण्यात येणाऱ्या या पत्रावळींचा कचरा ठिकठिकाणी आढळून येत आहे.

थर्माकोलने घोटला नाल्याचा गळा अख्ख्या औरंगाबाद शहराचा जणू कचरा डेपो बनला आहे. चौकाचौकात, गल्लीगल्लीत कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. यातून शहरातून वाहणारे नालेही सुटले नाहीत. सिटीचौक ते कालादरवाजा या मार्गावरील मोठ्या नाल्याचा गळाच थर्माकोल व प्लास्टिकने घोटला आहे. मोठ्या प्रमाणात कचरा नाल्यात तरंगत आहे. यावरून नष्ट न होणाऱ्या थर्माकोल, प्लास्टिकच्या प्रदूषणाची कल्पना येऊ शकते; मात्र अजूनही महानगरपालिकेचे याकडे लक्ष गेले नाही. येत्या काळात जोरदार पाऊस झाला तर नाल्याचे पाणी आसपासच्या रहिवासी परिसरात शिरू शकते. मनपाच्या अधिकाऱ्यांनी वेळातवेळ काढून थोडे इकडेही लक्ष द्यावे, थर्माकोल काढून नाला मोकळा करावा, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे. 

उत्पादन की, जुना साठाप्लास्टिक, थर्माकोल उत्पादनांचा साठा संपविण्यासाठी शासनाकडून वेळ देण्यात आला होता, तरीही अनेकांकडे अद्यापही बंदी असलेल्या उत्पादनांचा साठा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातून छुप्या पद्धतीने त्याची विक्री आणि वापर होत आहे. साठा जरी जुना असला तरी त्याचा वापर केला तर कारवाई होऊ शकते. बंदी असलेल्या वस्तंूचे उत्पादन होत नसल्याचा दावा संघटनांकडून केला जात आहे.

उत्पादन, विक्री बंदथर्माकोल प्लेटचे उत्पादन आणि विक्री सध्या बंद आहे. व्यापाऱ्यांकडून त्याची कोणत्याही प्रकारे विक्री होत नाही. केटरिंग व्यावसायिकांसह अनेकांनी समारंभांसाठी अनेक दिवसांपूर्वी थर्माकोल प्लेट घेऊन ठेवलेल्या असू शकतात. अशांकडून त्यांचा वापर होऊ शकतो.- प्रवीण काला, सचिव, मराठवाडा प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न