शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

समारंभांमध्ये थर्माकोल पत्रावळींचा सर्रास वापर; शासनाच्या आदेशाला ‘खो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 20:09 IST

शहरात शासनाच्या आदेशाला ‘खो’ दिला जात असून, विविध समारंभांमध्ये थर्माकोल पत्रावळींचा (प्लेट) आणि २०० मिलिपर्यंतच्या बाटल्यांचा सर्रास वापर होत आहे.

ठळक मुद्देराज्यात २३ जूनपासून प्लास्टिक बंदी लागू झाली आहे. शासनाने लावलेली प्लास्टिक बंदी केवळ कागदावरच असल्याचे दिसते.

औरंगाबाद : शहरात शासनाच्या आदेशाला ‘खो’ दिला जात असून, विविध समारंभांमध्ये थर्माकोल पत्रावळींचा (प्लेट) आणि २०० मिलिपर्यंतच्या बाटल्यांचा सर्रास वापर होत आहे. त्यामुळे शासनाने लावलेली बंदी केवळ कागदावरच असल्याचे दिसते.

राज्यात २३ जूनपासून प्लास्टिक बंदी लागू झाली आहे. प्लास्टिकच्या पिशव्या, चहाचे कप, ग्लास, चमचे, थर्माकोल ग्लास, पत्रावळी आदींवर बंदी आली आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील प्लास्टिक कप, पत्रावळी, ग्लास,  कॅरिबॅग, शॉपिंग बॅग आदींची निर्मिती करणाऱ्या छोटे-मोठ्या उद्योगांकडून सध्या उत्पादन बंद असल्याचे सांगण्यात येते. बाजारपेठेतही बंदी असलेल्या साहित्यांची विक्री होत नसल्याचे सांगण्यात येते. एखाद्याने बंदी असलेल्या साहित्यांची मागणी केल्यानंतर विक्रेत्यांकडून नकार दिला जात आहे. तरीही समारंभांमध्ये थर्माकोल पत्रावळींचा बोलबाला दिसत आहे.

२०० मिलिपर्यंतच्या बाटलीबंद पाणी विक्रीवर बंधने आणली आहेत. त्यामुळे २०० ऐवजी २५०, ३०० आणि ५०० मिलिपर्यंतच्या बाटल्यांच्या निर्मितीला प्राधान्य दिले जात आहे. विविध कार्यक्रमांमध्ये २०० मिलिपर्यंतच्या बाटलीबंद पाण्याचा वापर होताना दिसतो. समारंभांप्रसंगी पर्यावरणाला अत्यंत घातक ठरणाऱ्या थर्माकोलच्या पत्रावळीचा सध्या बिनधास्त वापर सुरू आहे. स्टीलच्या प्लेटस्, वाट्या, ग्लास वापरले तर त्यांना स्वच्छ करण्याचा त्रास, या सर्व गोष्टींपासून सुटका मिळावी या सबबीखाली या पत्रावळींचा वापर सुरूच आहे.

थर्माकोलच्या पत्रावळी फेकून देण्यात आल्यानंतर त्यामध्ये उरलेले अन्न जनावरेदेखील खातात. अशावेळी पत्रावळीही जनावरांच्या पोटात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पर्यावरणासह जनावरांच्या जिवालाही हे धोकादायक ठरत आहे.  शहरात आधीच कचऱ्याने राक्षसी रूप धारण केले आहे. बंदीनंतरही थर्माकोलच्या पत्रावळींचा वापर सुरूच आहे. परिणामी पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. त्यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. समारंभ, अन्य कार्यक्रमांदरम्यान वापरण्यात येणाऱ्या या पत्रावळींचा कचरा ठिकठिकाणी आढळून येत आहे.

थर्माकोलने घोटला नाल्याचा गळा अख्ख्या औरंगाबाद शहराचा जणू कचरा डेपो बनला आहे. चौकाचौकात, गल्लीगल्लीत कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. यातून शहरातून वाहणारे नालेही सुटले नाहीत. सिटीचौक ते कालादरवाजा या मार्गावरील मोठ्या नाल्याचा गळाच थर्माकोल व प्लास्टिकने घोटला आहे. मोठ्या प्रमाणात कचरा नाल्यात तरंगत आहे. यावरून नष्ट न होणाऱ्या थर्माकोल, प्लास्टिकच्या प्रदूषणाची कल्पना येऊ शकते; मात्र अजूनही महानगरपालिकेचे याकडे लक्ष गेले नाही. येत्या काळात जोरदार पाऊस झाला तर नाल्याचे पाणी आसपासच्या रहिवासी परिसरात शिरू शकते. मनपाच्या अधिकाऱ्यांनी वेळातवेळ काढून थोडे इकडेही लक्ष द्यावे, थर्माकोल काढून नाला मोकळा करावा, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे. 

उत्पादन की, जुना साठाप्लास्टिक, थर्माकोल उत्पादनांचा साठा संपविण्यासाठी शासनाकडून वेळ देण्यात आला होता, तरीही अनेकांकडे अद्यापही बंदी असलेल्या उत्पादनांचा साठा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातून छुप्या पद्धतीने त्याची विक्री आणि वापर होत आहे. साठा जरी जुना असला तरी त्याचा वापर केला तर कारवाई होऊ शकते. बंदी असलेल्या वस्तंूचे उत्पादन होत नसल्याचा दावा संघटनांकडून केला जात आहे.

उत्पादन, विक्री बंदथर्माकोल प्लेटचे उत्पादन आणि विक्री सध्या बंद आहे. व्यापाऱ्यांकडून त्याची कोणत्याही प्रकारे विक्री होत नाही. केटरिंग व्यावसायिकांसह अनेकांनी समारंभांसाठी अनेक दिवसांपूर्वी थर्माकोल प्लेट घेऊन ठेवलेल्या असू शकतात. अशांकडून त्यांचा वापर होऊ शकतो.- प्रवीण काला, सचिव, मराठवाडा प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न