शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

प्रतिनियुक्त्यांचा अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

By admin | Updated: May 8, 2014 00:35 IST

हिंगोली : जिल्हा परिषदेत गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांबाबतचा अहवाल तत्काळ सादर करावा, असे आदेश दिले.

 हिंगोली : जिल्हा परिषदेत गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांबाबतचा अहवाल तत्काळ सादर करावा, असे आदेश विभागीय आयुक्त संजीवकुमार जयस्वाल यांनी बुधवारी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे यांना येथे दिले. विभागीय आयुक्त जयस्वाल बुधवारी हिंगोली जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या हस्ते समाधान योजनेंतर्गत विविध प्रमाणपत्रांचे व साहित्याचे वाटप करण्यात आल्यानंतर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेतील अनेक विभागांमध्ये गेल्या तीन ते चार वर्षांपासून काही विशिष्ट अधिकारी मोक्यांच्या पदावर प्रतिनियुक्तीवर आहेत. यासंदर्भात शासनाची काय भूमिका आहे? असा सवाल आयुक्त जयस्वाल यांना केला असता त्यांनी अडचण असल्यास तात्पुरत्या स्वरुपात प्रतिनियुक्त्या करता येतात; परंतु त्या प्रतिनियुक्त्या एका वर्षापेक्षा अधिक काळ असू नयेत, असे आदेश आहेत. तीन ते चार वर्षांपासून जिल्हा परिषदेत चुकीच्या पद्धतीने प्रतिनियुक्त्या केल्या गेल्या असतील तर याबाबतचा अहवाल तत्काळ सादर करा, असा आदेश यावेळी आयुक्त जयस्वाल यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही. बनसोडे यांना दिला. त्यामुळे आता बनसोडे या प्रकरणी विभागीय आयुक्तांना अहवाल सादर करणार की नाही? याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. मिनरल वॉटर बाबत मागितला अहवाल हिंगोली शहरात शासनाची कसलीही परवानगी न घेता अनधिकृतपणे मिनरल वॉटरचे प्लँट उभारले जात असून त्याद्वारे अशुद्ध पाणी पुरवठा केला जात असल्याची तक्रार पत्रकारांनी केली. त्यावर आयुक्त जयस्वाल यांनी जिल्हाधिकार्‍यांनी चौकशी करून अहवाल सादर करावा, असे आदेश दिले. तसेच गेल्या पाच ते सात वर्षांपासून शहरांसह जिल्ह्यात अनेक इमारती व रस्त्यांची कामे सुरू आहेत. याचीही तक्रार करण्यात आली असता त्याबाबतचाही अहवाल सादर करण्याचे आदेश जयस्वाल यांनी दिले. जिल्ह्यातील विविध विभागातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात व जिल्ह्याच्या ठिकाणी आवश्यक ती शासकीय कार्यालये सुरू करण्यासंदर्भात प्रशासकीय पातळीवरून प्रयत्न करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी) मोक्याच्या पदावर करण्यात आल्या प्रतिनियुक्त्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात सध्या उप कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असलेले राजाराम चंदाले यांची वसमत येथे शाखा अभियंता पदावर नियुक्त करण्यात आली आहे; परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांनी जिल्हा परिषदेत नियुक्ती मिळविली आहे. जिल्हा ग्राम विकास यंत्रणेत बीआरजीएफ कक्षात उप अभियंतापदी कार्यरत असलेले डोंबे यांची ग्रामीण पाणी पुरवठा विभागात नियुक्ती आहे; परंतु त्यांनीही गेल्या अनेक महिन्यांपासून बीआरजीएफ मध्ये नियुक्ती मिळविली आहे. त्यांच्याकडे औंढा येथील बीआरजीएफच्या उप अभियंत्यांचाही पदभार आहे. हिंगोली येथील जि.प. बांधकाम विभागातील उप अभियंता कार्यालयातील शाखा अभियंता मुळे यांच्याकडे एनआरएचएम योजनेच्या अभियंत्याचा अनेक महिन्यांपासून पदभार आहे. या शिवाय जिल्हा परिषदेच्या आरोग्य, समाजकल्याण, शिक्षण, कृषी आदी विभागातही मोठ्या प्रमाणात प्रतिनियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. यातून पळवाट काढण्यासाठी कामाची गरज म्हणून नियुक्त्या करण्यात आले असल्याचे कारण जिल्हा परिषद प्रशासनाकडून दाखविले जात आहे; परंतु हे कारण अत्यंत तकलादु असल्याचे जाणकारांचे मत आहे.