शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

शहर बदलण्यासाठी आलेले आयुक्त स्वत: बदलीच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:00 IST

मागील १३ महिन्यांमध्ये आयुक्तांना शहरात बदल घडवून आणता आला नाही.

ठळक मुद्देआयुक्तांना दिल्लीत नेमणूक हवी आयुक्तपदी किरण गिते यांच्या नावाची चर्चाकचरा प्रश्नात किंचितही सुधारणा झालेली नाही.

औरंगाबाद : शहरातील कचरा प्रश्न सोडविण्यासाठी मे २०१८ मध्ये दिल्लीहून खास डॉ. निपुण विनायक यांना औरंगाबादेत मनपा आयुक्त म्हणून आणण्यात आले. मागील १३ महिन्यांमध्ये आयुक्तांना शहरात बदल घडवून आणता आला नाही. कचरा प्रश्नात किंचितही सुधारणा झालेली नाही. आता आयुक्तच स्वत: बदलीच्या प्रयत्नात आहेत. त्यांना दिल्ली येथे नेमणूक हवी आहे. मागील चार दिवसांपासून आयुक्त मुंबई-दिल्ली दौऱ्यावर आहेत. लवकरच त्यांच्या बदलीचे आदेश मनपाला प्राप्त होतील. नवीन आयुक्त म्हणून किरण गिते यांच्या नावाची चर्चा आहे.

शहरात कचरा कोंडी, पाणी प्रश्न, मनपा दिवाळखोरीत निघालेली असताना शासनाने खास डॉ. निपुण विनायक यांना शहरात आणले. स्वच्छ भारत अभियानात काम केल्याचा त्यांना दांडगा अनुभव असून, ते शहराचा लूक बदलून टाकतील, असा विश्वासही शासनाने व्यक्त केला होता. मागील १३ महिन्यांमध्ये आयुक्तांना कचरा प्रश्न सोडविता आला नाही. पाणी प्रश्नात मार्ग काढता आला नाही. उलट पाणी प्रश्न अधिक जटिल करून ठेवण्यात आला. मनपाची दिवाळखोरी कमी होण्याऐवजी उलट वाढली आहे. कंत्राटदारांच्या कामांची बिले ३०० कोटींपर्यंत पोहोचली आहेत. प्रशासनावर आयुक्तांचा कोणताच वचक राहिलेला नाही. बीड बायपासला सर्व्हिस रोड तयार करण्याचे काम पोलीस आयुक्तांनी सुरू केले. त्यात खोडा घालण्याचे काम मनपाने केले. बायपासवर आठवड्यातून किमान दोन निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत आहे.

मनपा आयुक्तांनी शहर बसचा एक स्तुत्य उपक्रम सुरू केला. याशिवाय त्यांचे कोणतेच उल्लेखनीय काम नाही. या शहरात बदल घडविणे अशक्यप्राय आहे, असे आयुक्तांना वाटायला लागले. मागील काही दिवसांपासून त्यांनी स्वत:च बदलीसाठी प्रयत्न सुरू केले. लोकसभा निवडणुकीपर्यंत थांबा, असे शासनाने त्यांना सांगितले होते. आचारसंहिता संपताच पुन्हा आयुक्तांच्या हालचालींना वेग आला आहे. मागील चार दिवसांपासून ते सुट्टी टाकून मुंबई आणि दिल्ली दौऱ्यावर आहेत. शासनाने अलीकडेच त्यांना पदोन्नतीही दिली आहे. दिल्लीत सचिव म्हणून त्यांची काम करण्याची इच्छा आहे. लवकरच डॉ. निपुण विनायक यांच्या बदलीचे आदेश प्राप्त होतील, अशी चर्चा मनपा वर्तुळात आहे.

मराठवाड्याचे भूमिपुत्रबीड जिल्ह्यातील रहिवासी असलेले तथा २००५ च्या बॅचचे आयएएस किरण गिते यांची मनपा आयुक्तपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. अमरावतीचे जिल्हाधिकारी, जलस्वराज्य, पुण्याच्या पीएमआरडीए आदी ठिकाणी त्यांनी काम केले आहे. औरंगाबाद मनपा आयुक्तपदी त्यांची वर्णी लागण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाcommissionerआयुक्तGarbage Disposal Issueकचरा प्रश्न