शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

दिलासा, कोरोना लसीकरणानंतर आता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:05 IST

२८ नव्हे, १४ दिवसांनी करा रक्तदान नवा बदल : रक्ताचा तुटवडा दूर होण्यास लागणार हातभार औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधात्मक ...

२८ नव्हे, १४ दिवसांनी करा रक्तदान

नवा बदल : रक्ताचा तुटवडा दूर होण्यास लागणार हातभार

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर २८ दिवसांनंतरच रक्तदान करता येत होते. दुसरा डोसही २८ दिवसांनंतरच येतो. त्यामुळे किमान दोन महिने रक्तदान करता येत नव्हते. परंतु, आता कोरोना लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी रक्तदान करता येणार आहे. त्यामुळे रक्ताचा तुटवडा दूर होण्यास हातभार लागण्यास मदत होणार आहे.

देशभरात कोरोनाला प्रतिबंधक लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. आता तर १८ वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. रक्तदान करण्यात तरुणाई आघाडीवर असते. यात लसीकरणानंतर नागरिकांना २८ दिवसांआधी रक्तदान करता येणार नसल्याचे यापूर्वी राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने सूचित केले होते. परंतु, नियमात बदल करीत उपलब्ध लस घेल्यानंतर १४ दिवसांनी रक्तदान करू शकता येणार असल्याचे राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने जाहीर केले आहे. त्यामुळे रक्तदान करण्यासाठी आता केवळ १४ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण सुरू होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात रक्तदानाचे आवाहन करण्यात आले. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे शहरात बऱ्यापैकी रक्तसाठा असल्याचे रक्तपेढ्यांतर्फे सांगण्यात आले. मागील महिन्यांत रक्तपेढीत येऊन ९०४ दात्यांनी रक्तदान केल्याचे दत्ताजी भाले रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी आप्पासाहेब सोमासेे म्हणाले.

--

गाईडलाईन बदलली

राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने गाईडलाईन बदलली. त्यामुळे आता लस घेतल्यानंतर १४ दिवसांनंतर रक्तदान करता येणार आहे. रक्तदान केल्यानंतर केल्यानंतरही लस घेता येऊ शकते. जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे.

-डाॅ. मंजूषा कुलकर्णी, वैद्यकीय संचालक, दत्ताजी भाले रक्तपेढी

-----

१५ दिवसांचा साठा

रक्तपेढीत सध्या १५ दिवस पुरेल इतका रक्तसाठा आहे. नव्या बदलानुसार आता १४ दिवसांनंतर रक्तदान करता येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करावे.

-हनुमान रुळे, जनसंपर्क अधिकारी, विभागीय रक्तपेढी, घाटी