शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

दिलासा, कोरोना लसीकरणानंतर आता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:05 IST

२८ नव्हे, १४ दिवसांनी करा रक्तदान नवा बदल : रक्ताचा तुटवडा दूर होण्यास लागणार हातभार औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधात्मक ...

२८ नव्हे, १४ दिवसांनी करा रक्तदान

नवा बदल : रक्ताचा तुटवडा दूर होण्यास लागणार हातभार

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर २८ दिवसांनंतरच रक्तदान करता येत होते. दुसरा डोसही २८ दिवसांनंतरच येतो. त्यामुळे किमान दोन महिने रक्तदान करता येत नव्हते. परंतु, आता कोरोना लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी रक्तदान करता येणार आहे. त्यामुळे रक्ताचा तुटवडा दूर होण्यास हातभार लागण्यास मदत होणार आहे.

देशभरात कोरोनाला प्रतिबंधक लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. आता तर १८ वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. रक्तदान करण्यात तरुणाई आघाडीवर असते. यात लसीकरणानंतर नागरिकांना २८ दिवसांआधी रक्तदान करता येणार नसल्याचे यापूर्वी राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने सूचित केले होते. परंतु, नियमात बदल करीत उपलब्ध लस घेल्यानंतर १४ दिवसांनी रक्तदान करू शकता येणार असल्याचे राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने जाहीर केले आहे. त्यामुळे रक्तदान करण्यासाठी आता केवळ १४ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण सुरू होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात रक्तदानाचे आवाहन करण्यात आले. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे शहरात बऱ्यापैकी रक्तसाठा असल्याचे रक्तपेढ्यांतर्फे सांगण्यात आले. मागील महिन्यांत रक्तपेढीत येऊन ९०४ दात्यांनी रक्तदान केल्याचे दत्ताजी भाले रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी आप्पासाहेब सोमासेे म्हणाले.

--

गाईडलाईन बदलली

राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने गाईडलाईन बदलली. त्यामुळे आता लस घेतल्यानंतर १४ दिवसांनंतर रक्तदान करता येणार आहे. रक्तदान केल्यानंतर केल्यानंतरही लस घेता येऊ शकते. जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे.

-डाॅ. मंजूषा कुलकर्णी, वैद्यकीय संचालक, दत्ताजी भाले रक्तपेढी

-----

१५ दिवसांचा साठा

रक्तपेढीत सध्या १५ दिवस पुरेल इतका रक्तसाठा आहे. नव्या बदलानुसार आता १४ दिवसांनंतर रक्तदान करता येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करावे.

-हनुमान रुळे, जनसंपर्क अधिकारी, विभागीय रक्तपेढी, घाटी