शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दिलासा ! गुंठेवारीतील पाडापाडीला तूर्त स्थगिती; पालकमंत्री सुभाष देसाईंची मनपाला सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2021 15:01 IST

Subhash Desai : दिवाळीत पाडापाडी नको, अशा सूचना सोमवारी पालकमंत्री सुभाष देसाई  ( Subhash Desai) यांनी प्रशासकांना दिल्या.

ठळक मुद्देबांधकामे अधिकृत करण्यासाठी शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर देण्यात आली आहे.गुंठेवारीतील अनधिकृत बांधकामे नियमित करून घ्यावीत, असे आवाहनही त्यांनी केले

औरंगाबाद : गुंठेवारी कायद्याअंतर्गंत ३१ डिसेंबर २०२०पूर्वी बांधलेली अनधिकृत घरे अधिकृत करून देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहरात दोन लाखांहून अधिक घरे अनधिकृत आहेत. महापालिकेकडे ( Aurangabad Municipal Corporation) अत्यंत कमी प्रस्ताव आल्याने १ नोव्हेंबरपासून पाडापाडी सुरू करण्याचा इशारा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी मागील आठवड्यात दिला होता. दिवाळीत पाडापाडी नको, अशा सूचना सोमवारी पालकमंत्री सुभाष देसाई  ( Subhash Desai) यांनी प्रशासकांना दिल्या. त्यामुळे औरंगाबादकरांना किंचित दिलासा मिळाला आहे.

बांधकामे अधिकृत करण्यासाठी शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर देण्यात आली आहे. १ नोव्हेंबर रोजी महापालिकेतून जेसीबी, बुलडोझर बाहेर निघेल. शहरातील किमान एक तरी मालमत्ता जमीनदोस्त करून यंत्रणा परत येईल, असे प्रशासक पाण्डेय यांनी जाहीर केले होते. पहिल्या टप्प्यात व्यावसायिक बांधकामांवर हातोडा टाकण्यात येईल, असेही प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते. या निर्णयामुळे गुंठेवारी भागातील व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. दरम्यान, पालकमंत्री सुभाष देसाई हे शहरात आले असता आमदार, माजी नगरसेवकांनी त्यांना हा प्रकार सांगितला. तेव्हा याची दखल घेत पालकमंत्री देसाई यांनी गुंठेवारीधारकांना दिलासा देण्यासंदर्भातील निर्देश प्रशासकांना दिले.

त्रिमूर्ती चौकात कारवाईची तयारी...पहिल्या टप्प्यात महापालिकेने शहरातील त्रिमूर्ती चौक ते आकाशवाणी चौक या रस्त्यावर गुंठेवारी क्षेत्रातील व्यावसायिक बांधकामे तोडण्याची तयारी केली होती. तूर्त ही तोडफोड होणार नसली तरी गुंठेवारीतील अनधिकृत बांधकामे नागरिकांनी राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा उपयोग करून नियमित करून घ्यावीत, असे आवाहनही त्यांनी केले आहे, अशी माहिती आ. अंबादास दानवे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली. 

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाईAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका