शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

गंभीर दुष्काळतही महाविद्यालयांना जाग येईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 19:39 IST

औरंगाबाद : मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडला आहे. राज्य सरकारने परीक्षा शुल्क माफीची घोषणा केली आहे. आर्थिकदृष्ट्या मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात ५० टक्के सूट मिळण्याच्या योजनेत सहभागी होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या तब्बल ७० महाविद्यालयांनी प्रोफाईलच अपडेट केली नाही. यामुळे हजारो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडला आहे. राज्य सरकारने परीक्षा शुल्क माफीची घोषणा केली आहे. आर्थिकदृष्ट्या मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात ५० टक्के सूट मिळण्याच्या योजनेत सहभागी होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या तब्बल ७० महाविद्यालयांनी प्रोफाईलच अपडेट केली नाही. यामुळे हजारो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.

राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात दिलासा देण्यासाठी राजर्षी शाहू महाराज प्रतिपुर्ती योजना सुरू केली आहे. या योजनेत ६६५ अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी महाविद्यालयांनी स्वत:चे लॉग इन आयडी आणि पासवर्ड घेऊन जात प्रोफाईल अपडेट करण्याची गरज आहे. मात्र, मागील दोन महिन्यांपासून उच्च शिक्षण विभागाच्या विभागीय कार्यालयाने महाविद्यालयांना लॉग इन आयडी आणि पासवर्ड देऊनही तब्बल ७० महाविद्यालयांनी अद्यापही प्रोफाईल अपडेट केली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

या महाविद्यालयांशी वारंवार संपर्क साधूनही त्यास प्रतिसाद देण्यात येत नाही. या महाविद्यालांनी प्रोफाईल अपडेट केल्याशिवाय विद्यार्थ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी आॅनलाईन अर्जच दाखल करता येणार नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पारंपारिक, विधि, बीबीए, बीसीए आदी ३६४ महाविद्यालयांना लॉगिन आयडी आणि पासवर्ड देण्यात आले. यातील २९४ महाविद्यालयांनी गुरूवारपर्यंत (दि.१) प्रोफाईल अपडेट केले आहे. मात्र, उर्वरित ७० महाविद्यालये अपडेट होण्यात दिरंगाई करत असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरता येत नसल्याची माहिती उच्च शिक्षण विभागातुन देण्यात आली. ज्या महाविद्यालयांनी प्रोफाईल अपडेट केले त्या महाविद्यालयातून प्रतिदिन मोठ्या संख्येने विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईन अर्ज दाखल करत आहेत.

सर्वाधिक संख्या औरंगाबाद जिल्ह्यात

शिष्यवृत्तीसाठी प्रोफाईल अपडेट करण्यात दिरंगाई करणाऱ्या महाविद्यालयांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ४० महाविद्यालयांचा समावेश आहे. या खालोखाल बीड जिल्ह्यातील १३ तर उर्वरित उस्मानाबाद आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी ८, ९ महाविद्यालयांचा समावेश आहे. प्रोफाईल अपडेट न करणारी ही सर्व महाविद्यालये कायम विनाअनुदानित आहेत, हे विशेष!

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षण