शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये थंडीचा कडाका पुन्हा वाढला; तापमान १०.८ अंशांखाली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 18:57 IST

अचानक थंडी वाढते आणि अवघ्या दोन ते तीन दिवसांत थंडी गायब होत असल्याचे पाहायला मिळते.

ठळक मुद्देआठवडाभरानंतर हुडहुडी वाढली

औरंगाबाद : शहरात आठवडाभरानंतर पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढला आहे. चिकलठाणा वेधशाळेत गुरुवारी किमान १०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

हिवाळा सुरू झाल्यापासून तापमानात सतत चढ-उतार होत असल्याचा अनुभव शहरवासीयांना येत आहे. अचानक थंडी वाढते आणि अवघ्या दोन ते तीन दिवसांत थंडी गायब होत असल्याचे पाहायला मिळते. शहरात गेल्या आठवड्यात गुरुवार, २० डिसेंबर रोजी तापमानाने यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी गाठली होती. सर्वात कमी तापमान ८.० अंश सेल्सिअस इतके नोंदविल्या गेले होते. त्यानंतर किमान तापमानात वाढ होत गेली. दोन दिवसांपूर्वी किमान तापमान १५ अंशांपर्यंत वाढले होते. त्यामुळे थंडीत घट झाली होती.

आठवडाभरानंतर पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढला आहे. शहरात बुधवारपासून चांगलीच थंडी जाणवायला सुरुवात झाली. त्यात गुरुवारी तापमानात आणखी घसरण झाली. चिकलठाणा वेधशाळेत कमाल तापमान २६.३ तर किमान १०.८ अंश सेल्सिअस  नोंदविल्या गेले. गार वाऱ्याने दुपारच्या वेळीही बोचरी थंडी जाणवत आहे. त्यामुळे दुपारच्या उन्हात उभे राहून ऊब मिळविताना नागरिक दिसून येत आहेत. थंडीमुळे सकाळी आणि सायंकाळी तर घराबाहेर निघणेही शहरवासीयांना अवघड होत आहे. 

सुका मेवा खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दीवाढत्या थंडीमुळे लहान मुले आणि ज्येष्ठांची विशेष खबरदारी घेतली जात आहे. वाढत्या थंडीमुळे घरोघरी हिवाळ्यात पौष्टिक लाडू बनविण्याचीही लगबग सुरू आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या पदार्थांच्या विक्रीची दुकानेही सजली आहेत. याठिकाणी नागरिकांची खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTemperatureतापमान