शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोरोनाबरोबर शहरात थंडीची लाट, गार वारे, ढगाळ वातावरणाने हुडहुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 13:47 IST

गाळ वातावरणाबरोबर वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे नागरिकांना बोचऱ्या थंडीला सामोरे जावे लागले.

औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबरोबर शहरात थंडीची लाट आली असून, मंगळवारी कडाक्याच्या थंडीने संपूर्ण शहराला हुडहुडी भरली. शहरावर दिवसभर धुक्याची चादर पसरली होती.

शहरात मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत संपूर्ण शहर सकाळी धुक्यात बुडाले. अगदी दुपारपर्यंत धुक्याची चादर शहरावर कायम होती. शहर परिसरातील डोंगर दिसेनासे झाले होते. ढगाळ वातावरणाबरोबर वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे नागरिकांना बोचऱ्या थंडीला सामोरे जावे लागले. दुपारी काही मिनिटांसाठी सूर्यदर्शन झाले. शहरात सोमवारच्या तुलनेत मंगळवारी किमान तापमानात वाढ झाली, परंतु वातावरणातील बदलामुळे कडाक्याच्या थंडीला नागरिकांना तोंड द्यावे लागले. उबदार कपडे परिधान करूनच नागरिकांनी घराबाहेर पडण्यास प्राधान्य दिला. शहरात नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून थंडी गायब झाली होती. मात्र, गेल्या ३ दिवसांपासून थंडीने पुनरागमन केले आहे.

असे राहिले तापमानशहरात सोमवारी कमाल तापमान २७.८ आणि किमान तापमान ११.० अंश सेल्सिअस होते. मंगळवारी कमाल तापमान २५.५ आणि किमान तापमान १४.६ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. तापमानात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होत आहे.

महिनाभरापूर्वीच अशीच स्थितीशहरात १ डिसेंबर रोजीही अचानक थंडी वाढली होती. या दिवशीही शहरात ढगाळ वातावरणामुळे गारव्यात प्रचंड वाढ झाली होती. अशाच वातावरणाचा नागरिकांना मंगळवारी पुन्हा एकदा अनुभव आला.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याenvironmentपर्यावरण