शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

विद्यापीठातील स्पॉट ॲडमिशनलाही विद्यार्थ्यांचा थंड प्रतिसाद

By राम शिनगारे | Updated: August 3, 2024 12:14 IST

किचकट अर्ज प्रक्रियेसह असहकार्याचा मोठा परिणाम प्रवेश संख्येवर झाल्याची माहिती

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांना स्पॉट ॲडमिशनच्या दिवशीही काही अपवादात्मक विभाग सोडता उर्वरित विभागांमध्ये थंड प्रतिसाद मिळाला आहे. संगणकशास्त्र, रसायनशास्त्रासह इतर काही व्यावसायिक अभ्यासक्रम वगळता इतर विभागांमध्ये पूर्ण भरल्या गेल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. विद्यापीठ प्रशासनाने मात्र नेहमीप्रमाणे आकडेवारी देण्यास टाळाटाळ केली.

विद्यापीठात अडीच महिन्यांपासून पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. सीईटीनंतर जाहीर केलेल्या दोन फेऱ्यांमध्ये अवघे ४३९ प्रवेश झाले होते. अनेक नामांकित विभागाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र होते. त्या पार्श्वभूमीवर स्पॉट प्रवेशाला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, विद्यापीठातील काही विभागवगळता इतर विभागांमधील प्रवेशाला अतिशय थंड प्रतिसाद मिळाला. विज्ञान विद्याशाखेतील काही विभागांमधील प्रवेश पूर्ण क्षमतेने झाले आहेत. मात्र, अर्ध्यांपेक्षा अधिक विभागांमध्ये निम्म्यापेक्षा कमी जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. स्पॉट ॲडमिशनच्या संख्येची माहिती विद्यापीठ प्रशासनाने देण्यास असमर्थता दर्शविली.

दहा ते बारा पानांचा ऑनलाइन अर्जविद्यापीठाने विद्यार्थ्यांचा प्रतिसाद नसतानाही सीईटीद्वारे प्रवेश प्रक्रिया राबविली. त्यानंतर उपलब्ध संख्यापेक्षाही कमी नोंदणी असतानाही दोन प्रवेश फेऱ्या जाहीर केल्या. त्यानंतरही २ ऑगस्ट रोजी स्पॉट ॲडमिशन जाहीर केले आहे. स्पॉट ॲडमिशनला येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन नोंदणी अनिवार्य केली होती. वेगवेगळी कागदपत्रे अपलोड करण्यासह दहा ते बारा पानांची ऑनलाइन माहिती भरणे अनिवार्य होते. त्यामुळे जे विद्यार्थी प्रवेशाला आले त्यांनाही मनस्ताप सहन करावा लागल्याची परिस्थिती 'लोकमत'च्या पाहणीत आढळून आली.

विद्यापीठ बंद पाडण्याचा डाव; प्रक्रियेची चौकशी कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या विद्यापीठात पुरोगामी विचार जोपासला जातो. त्यामुळे उजव्या विचारसणीच्या सत्ताधाऱ्यांचा हे विद्यापीठ बंद पाडण्याचा डाव आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठात प्रवेश घेऊ नयेत, यासाठीच किचकट प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासाठी विद्यार्थ्यांना सहकार्यही केले गेले नाही. या प्रवेश प्रक्रियेत दोषी असलेल्यांची चौकशी करावी, अशी मागणी करणारे निवेदन अधिसभा सदस्य प्रा. हरिदास ऊर्फ बंडू सोमंवशी यांनी कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांना दिले. या निवेदनावर प्रा. सोमवंशी यांच्यासह विद्यार्थी संघटनेचे दिग्विजय शिंदे, सादिक शेख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण