शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
3
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
4
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
5
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
7
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
8
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
9
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
10
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
11
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
12
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
13
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
15
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
17
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
18
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
19
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
20
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?

थंडीचे रेकॉर्ड ब्रेक; तापमान ८ अंश

By admin | Updated: December 27, 2015 00:26 IST

औरंगाबाद : उत्तर भारताच्या थंडीचा प्रकोप मराठवाड्यावरही होत असून, मागील आठ दिवसांपासून किमान तापमानात कमालीची घसरण सुरू आहे.

औरंगाबाद : उत्तर भारताच्या थंडीचा प्रकोप मराठवाड्यावरही होत असून, मागील आठ दिवसांपासून किमान तापमानात कमालीची घसरण सुरू आहे. शनिवारी रात्री औरंगाबादचे तापमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत उतरले. या तापमानाने मागील नऊ वर्षांचे रेकॉर्ड मोडले. २००५ मध्ये २६ डिसेंबर रोजी औरंगाबादचे किमान तापमान ७ अंश सेल्सिअस होते. थंडी हळूहळू वाढू लागल्याने नागरिकांना अक्षरश: हुडहुडी भरत आहे.दिवाळीनंतर थंडी वाढते असे नेहमी बुजुर्ग मंडळी सांगत असतात. मात्र, मागील काही वर्षांपासून निसर्गाचे चक्रही बिघडत चालले आहे. यंदा थंडीचे उशिराने आगमन झाले. डिसेंबरअखेर थंडीचा प्रकोप असह्य होऊ लागला आहे. औरंगाबादचे किमान तापमान चार दिवसांपूर्वी १३ अंश सेल्सियसपर्यंत होते. शुक्रवारी तापमान थेट ९ अंशांवर आले, शनिवारी तर थंडीने कहरच केला. तापमान थेट ८ अंशांवर उतरले. तापमानातील ही घसरण आणखी वाढू शकते असा अंदाज हवामान विभागाचा आहे. नीचांकी तापमानामुळे शहरवासीयांना हुडहुडी भरली असून, दिवसभर गारठ्याचे वातावरण जाणवू लागले आहे. तापमानाचा पारा खाली उतरला तसे या वातावरणामुळे अनेक जण आजारी पडत आहेत. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी आदी आजारांमुळे नागरिक त्रस्त आहेत. या संसर्गजन्य आजाराच्या उपचारासाठी दवाखान्यांत गर्दी वाढली आहे. विशेषत: लहान मुले आणि ज्येष्ठ मंडळींमध्ये आजाराचे प्रमाण वाढले आहे. पहाटे, सकाळी आणि रात्रीच्या वेळी कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. या काळात ऊबदार आणि गरम कपडे घालूनच बाहेर पडणे नागरिक पसंत करीत आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक जण शेकोटीचाही आधार घेत आहेत. थंडीमुळे सायंकाळनंतर शहरातील वाहतूक आणि बाजारपेठेतील वर्दळीवरही परिणाम दिसून येत आहे. हिवाळ्यातील वातावरण आरोग्यदायी मानले जात असल्याने या काळात सकाळी उठून जॉगिंग, योगा, व्यायाम करण्यास प्राधान्य दिले जाते. एरवी कधीही व्यायाम न करणारेदेखील थंडीच्या काळात शुद्ध हवा घेण्यासाठी घराबाहेर पडत असतात. कडाक्याची थंडी पडल्याने जॉगिंग, योगा, व्यायाम यामध्येही नागरिकांचा खंड पडत आहे.२६ डिसेंबर रोजीचे रेकॉर्डवर्षेकमाल किमान तापमान२००५२६०७ अंश२००६२८१२२००७३२१६२००८३०११२००९२७०९२०१०२८११२०११३०११२०१२२८०९२०१३२७१४२०१४२६१३२०१५२६०८नीचांकी तापमानामुळे शहरवासीयांना हुडहुडी भरली असून, दिवसभर गारठ्याचे वातावरण जाणवू लागले आहे. तापमानाचा पारा खाली उतरला तसे या वातावरणामुळे अनेक जण आजारी पडत आहेत. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी आदी आजारांमुळे नागरिक त्रस्त आहेत. या संसर्गजन्य आजाराच्या उपचारासाठी दवाखान्यांत गर्दी वाढली आहे. विशेषत: लहान मुले आणि ज्येष्ठ मंडळींमध्ये आजाराचे प्रमाण वाढले आहे. पहाटे, सकाळी आणि रात्रीच्या वेळी कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. या काळात ऊबदार आणि गरम कपडे घालूनच बाहेर पडणे नागरिक पसंत करीत आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक जण शेकोटीचाही आधार घेत आहेत. थंडीमुळे सायंकाळनंतर शहरातील वाहतूक आणि बाजारपेठेतील वर्दळीवरही परिणाम दिसून येत आहे. हिवाळ्यातील वातावरण आरोग्यदायी मानले जात असल्याने या काळात सकाळी उठून जॉगिंग, योगा, व्यायाम करण्यास प्राधान्य दिले जाते.