शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

आचारसंहितेपूर्वी समाजाच्या २१ मागण्या मान्य करा; मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 16:04 IST

मागण्या मान्य न झाल्यास सरकार विरोधी भूमिका घेणार

औरंगाबाद : मराठा समाजाच्या आरक्षण आणि इतर २१ मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. सहज मान्य होणाऱ्या मागण्यासुद्धा मान्य करण्यात आल्या नाहीत यावर सरकारने आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निर्णय घ्यावा अन्यथा मराठा क्रांती मोर्चा सरकारच्या विरोधात भूमिका घेईल असा इशारा आज मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी दिला. 

राज्यात सुरू असलेल्या नोकर भरतीत खुल्या प्रवर्गातील पदे न भरण्याचा आणि मराठा समाजाला देऊ केलेल्या आरक्षणानुसार पदभरती न करण्याचा निर्णय शासनाने घेतला. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांची महत्त्वपूर्ण बैठक आज मंगळवारी सकाळी औरंगाबादेत झाली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात समन्वयकांनी घेतलेया भूमिकेची माहिती देण्यात आली. 

मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, यासह अन्य मागण्यांसाठी मराठा समाजाने राज्यात ५८ मूक मोर्चे काढले. या आंदोलनानंतर शासनाने मराठा समाजाला एसईबीसी या नव्या प्रवर्गानुसार १६ टक्के  आरक्षण दिले; मात्र या आरक्षणाला न्यायालयात आव्हान देण्यात आले. शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने जाहिराती देण्यास सुरुवात केली. शासनाने परिपत्रक काढून एसईबीसी आरक्षणानुसार पदे भरण्यास सक्त मनाई केली; मात्र या जाहिरातीमध्ये मराठा आरक्षणासाठी स्वतंत्र रिक्त पदे दर्शविण्यात आलेली नाहीत. यामुळे मराठा समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या मागण्या मान्य न केल्याने सरकारने समाजाचा अपमान केला आहे, यामुळे आम्ही सरकारचा निषेध करत आहोत. शासनाने भरतीबाबत काढलेले परिपत्रक मागे घ्यावे, आरक्षणाची अंमलबजावणी करावी, तसेच  समाजाच्या २१ मागण्या आचारसंहितेपूर्वी मान्य कराव्यात. अन्यथा मराठा क्रांती मोर्चा सरकारच्या विरोधात भूमिका घेईल असा इशारा समन्वयकांनी दिला. 

पहा व्हिडीओ :

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाreservationआरक्षणState Governmentराज्य सरकारAurangabadऔरंगाबाद