शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

Lumpy Skin Disease Virus: आता जनावरांनाही क्वारंटाइन करणार; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश

By मुकेश चव्हाण | Updated: September 16, 2022 18:11 IST

Lumpy Skin Disease Virus: देशपातळीवर सध्या लम्पी चर्मरोगाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात देखील हळूहळू हा रोग पाय पसरू लागला आहे.

- मुकेश चव्हाण

औरंगाबाद- देशपातळीवर सध्या लम्पी चर्मरोगाने थैमान घातले आहे. खेड्यापाड्यातील अनेक पशुपालकांचे पशुधन विशेषतः गाई आणि काही प्रमाणात म्हशी या रोगाला बळी पडताना दिसतात. देशातील १२ राज्यात जवळजवळ १६५ जिल्ह्यातील ११.२५ लाख गाई-म्हशींमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. साधारणपणे ५० हजार जनावरांचा मृत्यू झाला आहे. 

महाराष्ट्रात देखील हळूहळू हा रोग पाय पसरू लागला आहे. औरंगाबादमध्ये ३२ पशुधनाला लम्पी रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे पशुधन पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने या रोगाने एकाही जनावराचा मृत्यू झालेला नाही. याचपार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लम्पी आजाराबाबत मोठी घोषणा केली आहे. लम्पी आजारामुळे आता जनावरांसाठी क्वारंटाईन सेंटर सुरु करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

एकनाथ शिंदे आज यांनी औरंगाबादमध्ये माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी लम्पी रोगाबाबत उपययोजनेविषयी माहिती दिली. लम्पी आजारावर लस उपलब्ध केली आहे. लम्पी आजारासाठी लशीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. ज्यांचे जनावरे मृत्युमुखी पडले त्यांना एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत राज्य सरकार करेल. तसेच लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढु नये म्हणुन, जनावरांना क्वारंटाईन करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. 

सांगलीत आतापर्यंत ३८ जनावरांना लम्पीची लागण

सांगली जिल्ह्यात आतापर्यंत ३८ जनावरांना लम्पीची लागण झाल्याची माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी दिली. बाधित ३८ जनावरापैकी २० जनावरांवर उपचार करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत २० हजार जनावरांचे लसीकरण करण्यात आले असून आत्तापर्यंत एकही जनावरांचा मृत्यू झालेला नाही, अशी माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी दिली आहे.

संसर्ग कळवा, अन्यथा कारवाई

या रोगाची लक्षणे आढळून आल्यास संबंधित पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेत लेखी स्वरूपात माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. माहिती लपविल्यास कार्यवाही करण्यात येणार आहे. उपचारासाठी शासकीय पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार उपचार करण्यात यावेत. संसर्गित पशू मृत झाल्यास त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ग्रामपंचायत, नगर पंचायत, महापालिका यांच्यावर राहणार आहे. याच्या उपाययोजनेसाठी जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय रॅपिड ॲक्शन टीम तयार करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Lumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोगEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार