शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

Lumpy Skin Disease Virus: आता जनावरांनाही क्वारंटाइन करणार; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश

By मुकेश चव्हाण | Updated: September 16, 2022 18:11 IST

Lumpy Skin Disease Virus: देशपातळीवर सध्या लम्पी चर्मरोगाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात देखील हळूहळू हा रोग पाय पसरू लागला आहे.

- मुकेश चव्हाण

औरंगाबाद- देशपातळीवर सध्या लम्पी चर्मरोगाने थैमान घातले आहे. खेड्यापाड्यातील अनेक पशुपालकांचे पशुधन विशेषतः गाई आणि काही प्रमाणात म्हशी या रोगाला बळी पडताना दिसतात. देशातील १२ राज्यात जवळजवळ १६५ जिल्ह्यातील ११.२५ लाख गाई-म्हशींमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. साधारणपणे ५० हजार जनावरांचा मृत्यू झाला आहे. 

महाराष्ट्रात देखील हळूहळू हा रोग पाय पसरू लागला आहे. औरंगाबादमध्ये ३२ पशुधनाला लम्पी रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे पशुधन पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने या रोगाने एकाही जनावराचा मृत्यू झालेला नाही. याचपार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लम्पी आजाराबाबत मोठी घोषणा केली आहे. लम्पी आजारामुळे आता जनावरांसाठी क्वारंटाईन सेंटर सुरु करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

एकनाथ शिंदे आज यांनी औरंगाबादमध्ये माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी लम्पी रोगाबाबत उपययोजनेविषयी माहिती दिली. लम्पी आजारावर लस उपलब्ध केली आहे. लम्पी आजारासाठी लशीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. ज्यांचे जनावरे मृत्युमुखी पडले त्यांना एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत राज्य सरकार करेल. तसेच लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढु नये म्हणुन, जनावरांना क्वारंटाईन करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. 

सांगलीत आतापर्यंत ३८ जनावरांना लम्पीची लागण

सांगली जिल्ह्यात आतापर्यंत ३८ जनावरांना लम्पीची लागण झाल्याची माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी दिली. बाधित ३८ जनावरापैकी २० जनावरांवर उपचार करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत २० हजार जनावरांचे लसीकरण करण्यात आले असून आत्तापर्यंत एकही जनावरांचा मृत्यू झालेला नाही, अशी माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी दिली आहे.

संसर्ग कळवा, अन्यथा कारवाई

या रोगाची लक्षणे आढळून आल्यास संबंधित पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेत लेखी स्वरूपात माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. माहिती लपविल्यास कार्यवाही करण्यात येणार आहे. उपचारासाठी शासकीय पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार उपचार करण्यात यावेत. संसर्गित पशू मृत झाल्यास त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ग्रामपंचायत, नगर पंचायत, महापालिका यांच्यावर राहणार आहे. याच्या उपाययोजनेसाठी जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय रॅपिड ॲक्शन टीम तयार करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Lumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोगEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार