शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पीएचडीच्या मौखिक परीक्षेच्या जेवणावळी बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 12:14 IST

कुलगुरूंच्या आदेशानंतर पीएच.डी. विभागाने काढले परिपत्रक

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध विभागात होणाऱ्या पीएच.डी. मौखिक चाचणीनंतर संशोधक विद्यार्थ्यांना जेवणावळी द्याव्या लागतात. या जेवणावळी तात्काळ बंद करण्यात याव्यात, असे परिपत्रक पीएच.डी. विभागाने काढले आहे.  

मराठवाडा असोसिएशन फॉर स्टुडंटस् (मास) संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांची भेट घेत पीएच.डी.च्या मौखिक परीक्षेनंतर होणाऱ्या जेवणावळीकडे लक्ष वेधले. संशोधकांचा व्हायवा मोठा सोहळा असतो. मौखिक चाचणीचे परीक्षक, मार्गदर्शक आणि विभागप्रमुख यांच्या भोजनाची जबाबदारी संशोधकाला उचलावी लागते. यावेळी शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार होतात. परीक्षक विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसमध्ये न राहता महागड्या हॉटेलात राहतात. यामुळे संशोधक विद्यार्थ्याला ३० ते ४० हजार रुपयांचा खर्च सोसावा लागतो. मौखिक चाचणी ही परीक्षाच असल्यामुळे तेथे हे प्रकार कसे घडतात, असा सवाल करीत मास संघटनेचे अध्यक्ष डॉ. उल्हास उढाण यांनी कुलगुरूंसमोर तक्रारीचा पाढाच वाचला.

विद्यापीठाच्या कामकाजातील त्रुटी दूर करा, पीएच.डी. विभागात तात्काळ अतिरिक्त कर्मचारी नेमा, वसतिगृह आणि अभ्यासिकेत सुरळीत पाणीपुरवठा करा, गाईडशिपची यादी अपडेट करणारी यंत्रणा विकसित करा, संशोधन विभागातील काम किती दिवसांत होईल, याची माहिती देणारे बोर्ड लावा, अशी मागणीही करण्यात आली. सध्या पीएच.डी. विभागात एकही काम तात्काळ होत नाही. व्हायवा झाल्यानंतर तात्काळ नोटिफिकेशन मिळत नाही. ही गैरसोय टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना शिष्टमंडळाने केली. त्यावर सकाळच्या सत्रात व्हायवा आणि सायंकाळपर्यंत नोटिफिकेशन देण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. चोपडे यांनी सांगितले. शिष्टमंडळात सचिन बोराडे, अमित कुटे, प्रमोद गायकवाड, दादासाहेब कांबळे, दिगंबर जाधव, अजय पवार, आदित्य मुठ्ठे, विजय चिंचाणे यांचा समावेश होता. सूचनांची दखल घेत कुलगुरूंनी तात्काळ पीएच.डी. विभागात पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली, तसेच जेवणावळी, हार, पुष्पगुच्छ देणे-घेणे येऊ बंद करावे, असे परिपत्रक काढले.

कर्मचाऱ्यांवर नियंत्रण कुणाचे?विद्यापीठ यंत्रणेने कामकाज सुरळीत केल्यास विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याची गरज भासणार नाही; पण काम सुरळीत होत नाही. कर्मचाऱ्यांवर नियंत्रण कुणाचे आहे, असा प्रश्न डॉ. उढाण यांनी केला. कोणतेही काम निर्धारित वेळेत आणि पाठपुरावा केल्याशिवाय होत नाही, असे त्यांनी डॉ. चोपडे यांच्या निदर्शनास आणून दिले.

टॅग्स :Studentविद्यार्थीDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद