शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
भारत-सीरिया राजकीय संबंधांच्या नव्या पर्वाला सुरुवात, भारताचा फायदा काय? समजून घ्या
4
भर रस्त्यात कारचं पार्किंग, स्टेअरिंगवर चक्क कुत्रा! अंधेरीच्या लोखंडवालामध्ये अजब प्रकार; व्हिडिओ व्हायरल...
5
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
6
पहिला श्रावण गुरुवार: ८ राशींना चौफेर लाभ, भाग्याची साथ; भरघोस भरभराट, स्वामींची अपार कृपा!
7
ज्योतिबा डोंगरावर चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा सुरू; पहा आईचे विलोभनीय रूप!
8
Kamchatka Tsunami : जगाचा छोटासा कोपरा बनला भूकंपाचा अड्डा, एका झटक्यात 'या' १२ देशांना हादरवलं! त्सुनामीचा अलर्ट जारी
9
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
10
महिलेचा कारनामा, एकाच वेळी २० युवकांना लावला चुना; प्रेमात फसवून प्रत्येकाकडून iPhone घेतले, मग...
11
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
12
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
13
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
14
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
15
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
16
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
17
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
18
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
19
ITR भरल्यानंतर आता तासाभरात परतावा! आयकर विभागाचा स्पीड पाहून नागरिक थक्क, जाणून घ्या कसं झालं शक्य?
20
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 

पीएचडीच्या मौखिक परीक्षेच्या जेवणावळी बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 12:14 IST

कुलगुरूंच्या आदेशानंतर पीएच.डी. विभागाने काढले परिपत्रक

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध विभागात होणाऱ्या पीएच.डी. मौखिक चाचणीनंतर संशोधक विद्यार्थ्यांना जेवणावळी द्याव्या लागतात. या जेवणावळी तात्काळ बंद करण्यात याव्यात, असे परिपत्रक पीएच.डी. विभागाने काढले आहे.  

मराठवाडा असोसिएशन फॉर स्टुडंटस् (मास) संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांची भेट घेत पीएच.डी.च्या मौखिक परीक्षेनंतर होणाऱ्या जेवणावळीकडे लक्ष वेधले. संशोधकांचा व्हायवा मोठा सोहळा असतो. मौखिक चाचणीचे परीक्षक, मार्गदर्शक आणि विभागप्रमुख यांच्या भोजनाची जबाबदारी संशोधकाला उचलावी लागते. यावेळी शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार होतात. परीक्षक विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसमध्ये न राहता महागड्या हॉटेलात राहतात. यामुळे संशोधक विद्यार्थ्याला ३० ते ४० हजार रुपयांचा खर्च सोसावा लागतो. मौखिक चाचणी ही परीक्षाच असल्यामुळे तेथे हे प्रकार कसे घडतात, असा सवाल करीत मास संघटनेचे अध्यक्ष डॉ. उल्हास उढाण यांनी कुलगुरूंसमोर तक्रारीचा पाढाच वाचला.

विद्यापीठाच्या कामकाजातील त्रुटी दूर करा, पीएच.डी. विभागात तात्काळ अतिरिक्त कर्मचारी नेमा, वसतिगृह आणि अभ्यासिकेत सुरळीत पाणीपुरवठा करा, गाईडशिपची यादी अपडेट करणारी यंत्रणा विकसित करा, संशोधन विभागातील काम किती दिवसांत होईल, याची माहिती देणारे बोर्ड लावा, अशी मागणीही करण्यात आली. सध्या पीएच.डी. विभागात एकही काम तात्काळ होत नाही. व्हायवा झाल्यानंतर तात्काळ नोटिफिकेशन मिळत नाही. ही गैरसोय टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना शिष्टमंडळाने केली. त्यावर सकाळच्या सत्रात व्हायवा आणि सायंकाळपर्यंत नोटिफिकेशन देण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. चोपडे यांनी सांगितले. शिष्टमंडळात सचिन बोराडे, अमित कुटे, प्रमोद गायकवाड, दादासाहेब कांबळे, दिगंबर जाधव, अजय पवार, आदित्य मुठ्ठे, विजय चिंचाणे यांचा समावेश होता. सूचनांची दखल घेत कुलगुरूंनी तात्काळ पीएच.डी. विभागात पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली, तसेच जेवणावळी, हार, पुष्पगुच्छ देणे-घेणे येऊ बंद करावे, असे परिपत्रक काढले.

कर्मचाऱ्यांवर नियंत्रण कुणाचे?विद्यापीठ यंत्रणेने कामकाज सुरळीत केल्यास विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याची गरज भासणार नाही; पण काम सुरळीत होत नाही. कर्मचाऱ्यांवर नियंत्रण कुणाचे आहे, असा प्रश्न डॉ. उढाण यांनी केला. कोणतेही काम निर्धारित वेळेत आणि पाठपुरावा केल्याशिवाय होत नाही, असे त्यांनी डॉ. चोपडे यांच्या निदर्शनास आणून दिले.

टॅग्स :Studentविद्यार्थीDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद