शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

कंत्राटदाराशी भेटीगाठी बंद

By admin | Updated: July 22, 2014 00:37 IST

शांतीलाल गायकवाड , औरंगाबाद राज्य सरकारने ‘ई-निविदा’ पद्धती अमलात आणून यापूर्वीच विकासकामे वाटपाच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची मोहीम हाती घेतली होती.

शांतीलाल गायकवाड , औरंगाबादराज्य सरकारने ‘ई-निविदा’ पद्धती अमलात आणून यापूर्वीच विकासकामे वाटपाच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची मोहीम हाती घेतली होती. आता कंत्राटदाराने निविदा फी व इसारा रक्कम धनाकर्षाद्वारे (डीडी) देण्याऐवजी आरटीजीएसद्वारे थेट बँकेत भरावी आणि युनिक ट्रान्झिक्शन रजिस्ट्रेशन क्रमांक नोंदवून तांत्रिक लिफाफ्यासोबत अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या प्रक्रियेनंतर जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराला कोणत्याही सबबीखाली प्रत्यक्ष भेटण्यास बोलावू नये, अशी सक्त ताकीद दिली आहे. ग्रामविकास विभागाने १५ जुलै २०१४ रोजी हा निर्णय जाहीर केला असून १ आॅगस्टपासून निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना केल्या आहेत. या शासन निर्णयात म्हटले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून विविध विकासकामे घेतली जातात. त्यासाठी बांधकाम साहित्य व सेवा पुरवठा कामे वाटप करताना तसेच वस्तूंचा व सेवांचा पुरवठा करून घेताना प्रक्रियेत सुटसुटीतपणा व पारदर्शकता आणण्यासाठी ई टेंडरिंग सुरू केली आहे. आता ई टेंडरिंगअंतर्गत आॅनलाईन रिसिप्ट, पेमेंट स्वीकृती व अदागीची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.बॅँक खातेही उघडावे लागणार, प्रक्रिया पारदर्शक1 ई- निविदा प्रणालीअंतर्गत कंत्राटदाराकडून स्वीकारावयाच्या निविदा फी व इसारा रक्कमेसाठी सर्व जिल्हा परिषदांनी स्टेट बँक आॅफ इंडियात स्वतंत्र खाते उघडावे.2 निविदा फी व इसारा रक्कम धनाकर्षाद्वारे स्वीकारण्याची पद्धत दि. ३१ जुलैपासून बंद करावी.3 दि. १ आॅगस्टपासून ई- निविदा प्रणालीअंतर्गत विकास कामांची निविदा सूचना प्रसिद्ध करताना त्यामध्ये जि.प.ने यासाठी बँकेत उघडलेल्या खात्याचा उल्लेख करावा व कंत्राटदारांनी फी व इसारा रक्कम सदर खात्यात जमा करण्याची अट समाविष्ट करावी. 4 सदर निविदा फी व इसारा रक्कम आरटीजीएसद्वारे बँकेत भरल्याचे विहित प्रमाणपत्र व युनिक ट्रान्झिक्शन रजिस्ट्रेशन क्रमांक नोंदवून तांत्रिक लिफाफ्यासोबत अपलोड करण्यास कंत्राटदारांना सांगावे.5 कंत्राटदाराने तांत्रिक लिफाफ्यासोबत सदरील प्रमाणपत्र अपलोड केल्यानंतर त्याची मूळप्रत कार्यालयात जमा करण्याची आवश्यकता नाही व त्यासाठी कंत्राटदारास कार्यालयात बोलावू नये.6 ज्या कंत्राटदारांच्या निविदा स्वीकारल्या जाणार नाहीत व जे कंत्राटदार प्रक्रियेत अपात्र ठरतील, त्यांनी भरलेली इसारा रक्कम निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यापासून एक महिन्याच्या आत संबंधित कंत्राटदारांच्या बँक खात्यामध्ये आरटीजीएसद्वारे परत करण्याची जबाबदारी संबंधित मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांची राहणार आहे. भेटीची आवश्यकता नाहीचई- निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या कंत्राटदाराने निविदा फी व इसारा रक्कम आरटीजीएसमार्फत जिल्हा परिषदेच्या खात्यामध्ये भरल्यावर जिल्हा परिषदेच्या कार्यालयास कुठल्याही प्रकारे भेट देण्याची आवश्यकता राहणार नाही व संपूर्ण प्रक्रियेची कारवाई ही ई- निविदा प्रणालीद्वारेच होईल, अशी सक्त ताकीद राज्य सरकारने दिली आहे.