शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

भाजपाच्या वॉर्डातच स्वच्छता अभियान

By admin | Updated: October 3, 2014 00:37 IST

औरंगाबाद : शहरात आज महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्या अभियानात शिवसेना-भाजपा असे राजकारण शिरल्यामुळे अभियानाला प्रशासकीय पातळीवरच राबवावे लागले.

औरंगाबाद : शहरात आज महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्या अभियानात शिवसेना-भाजपा असे राजकारण शिरल्यामुळे अभियानाला प्रशासकीय पातळीवरच राबवावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ते अभियान देशभर राबविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली, शिवाय सोबत भाजपाची राजकीय यंत्रणाही तयारीला लागली. शहरात भाजपाबहुल वॉर्डांमध्ये ते अभियान राबविले गेले. मात्र, उर्वरित शिवसेनेच्या वॉर्डांतून त्या अभियानाला काहीही प्रतिसाद मिळाला नाही. पालिकेतील अधिकाऱ्यांनी शहरभर अभियान राबविण्यासाठी तयारी केली. काही वॉर्डांमध्येही नगरसेवकांनी पुढाकार घेतला. शिवसेना नगरसेवकांनी त्या अभियानाला ठेंगा दाखविला. महायुतीचा घटस्फ ोट झाल्यानंतर सेना-भाजपातील कार्यकर्त्यांमध्ये चुरशीचे राजकारण पेटले आहे. दोन्ही पक्षांतील कार्यकर्ते, पदाधिकारी एकमेकांकडे खुनशी वृत्तीने पाहत आहेत. त्या खुनशी वृत्तीतूनच शहरातील तिन्ही मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांची पळवापळवी सुरू झालेली आहे. दोन्ही पक्षांतील कार्यकर्ते समोरासमोरूनही जात नाहीयेत. या ईर्षेतूनच सेना वॉर्डांमध्ये स्वच्छता अभियानास फाटा देण्यात आला आहे. शिवसेना नगरसेवक असलेले वॉर्ड वगळता इतर भागांत स्वच्छता अभियानातून मोठ्या प्रमाणात कचरा संकलन करण्यात आला. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनीदेखील या मोहिमेला राजकीय रंग देऊन नगरसेवकांना अभियानापासून फटकून राहण्याचे आदेश दिल्याची चर्चा होती.